समाजसुधारक सावित्रीबाई

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, जानेवारी ३, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १३ , शके १९४६
आजचे पंचांग.
सूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:१४
चंद्रोदय : ०९:५८ चंद्रास्त : २१:३९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्थी – २३:३९ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – २२:२२ पर्यंत
योग : वज्र – १२:३८ पर्यंत
करण : वणिज – १२:२५ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २३:३९ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : मकर – १०:४७ पर्यंत
राहुकाल : ११:२० ते १२:४३
गुलिक काल : ०८:३५ ते ०९:५८
यमगण्ड : १५:२८ ते १६:५१
अभिजितमुहूर्त : १२:२१ ते १३:०५
दुर्मुहूर्त : ०९:२५ ते १०:०९
दुर्मुहूर्त : १३:०५ ते १३:४९
अमृत काल : १२:१९ ते १३:५१
वर्ज्य : ०५:१६, जानेवारी ०४ ते ०६:४८, जानेवारी ०४

आज बालिकादिन दिन आहे.

आज अॅक्युपेशन थेरेपी दिन आहे.

समाजसुधारक सावित्रीबाई फुले – सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना तसेच त्यांची मावस बहीण सगुणाऊ या दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.१८४७-१८४८ साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या.

स्त्रियांचा आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी त्यांनी व जोतिरावांनी अनेक प्रयत्न केले. त्यापैकी बाल विधवा मुलींचा. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत.

सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर

सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. तसेच केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

त्यांच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठ नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ असे करण्यात आले.

१८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च१८९७)

प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे –

साधनेत आपले सर्वस्व ओतल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही, असे ते नेहमी सांगत, “Put your soul into it” हे त्यांचे शब्द होते.

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक – बाबांनी आपल्या साधनेचा नव्हे, जीवनाचाच वृतांत कोणताही आडपडदा न ठेवता आनंदसाधना या आत्मचरित्रात सांगितला आहे. साधनेतील अडचणी, विविध टप्पे, अनुभव आणि एकूण साधनप्रवास यांचे ज्ञान बाबांनी सामान्य साधकांसाठी खुले केले. विचार, विवेक आणि गुरूभक्ती या तीन पायांवर पेलवलेली बाबांची आनंदसाधना सामान्य साधकास अंतःस्फूर्ती देणारी व मार्गदर्शक आहे. पत्नी सौ. इंदिराबाई यांची प्रेमळ साथ त्यांना जन्मभर लाभली. बाबांप्रमाणेच त्यांनाही साध्या आणि सुसंस्कृत जीवनाची आवड होती. बाबांप्रमाणेच बुद्धीने तल्लख, सदाचरणी आणि लोकप्रिय. श्रीमहाराजांवर निष्ठा आणि शक्य तितका जप सांभाळून त्या ही संसारातील सर्व कर्तव्ये पार पाडीत.

• १९९८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी, १९०९)

अष्टपैलू सिंधी साहित्यिक व पत्रकार बाबाणी, कीरत चोइथराम – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. काही काळ त्यांना सिंधमधून हद्दपारही करण्यात आले होते. देशाच्या फाळणीनंतर ते मुंबईला येऊन स्थायिक झाले व त्यांनी ‘ सिंध मॉडेल हायस्कूल’ येथे शिक्षकाची नोकरी पतकरली. तेथे नोकरी सांभाळून त्यांनी आपले अपुरे राहिलेले शिक्षण पुरे केले. ते १९५० मध्ये बी.ए. व १९५२ मध्ये एल्एल्. बी. झाले.

फाळणीमुळे भारतात आलेले सिंधी हिंदू आपल्या घरादाराला तर मुकले होतेच शिवाय भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत स्थायिक होण्यासाठी अनेकविध अडचणींना तोंड देण्यात गुंतल्यामुळे ते आपल्या भाषा-साहित्य आणि संस्कृती यांपासूनही दुरावले होते. याची खंत बाळगणाऱ्या काही तरुण सिंधी लेखकांनी एक सहकारी संघटना स्थापन करून त्याद्वारे सिंधी भाषा, साहित्य, संस्कृती इत्यादींच्या संरक्षण-संवर्धनासाठी एक मोहीम सुरू केली. या मोहिमेचे बाबाणी हे एक अध्वर्यू होत. सिंधी भाषेला एक स्वतंत्र म्हणून भारतीय संविधानात स्थान मिळावे, हे या मोहिमेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. १९६८ मध्ये हे उद्दिष्ट साध्य झाले. सिंधी भाषा-साहित्याच्या अभिवृद्धीसाठीही या संघटनेकडून प्रयत्न करण्यात आले. या अनुषंगाने सिंधी साहित्याला वाहिलेले सिंधुधारा हे साप्ताहिक व नई दुनिया हे मासिक १९५॰ च्या सुमारास मुंबईहून सुरू करण्यात आले. त्यातही बाबाणींनी पुढाकार घेतला. १५वर्षे ते सिंधुधाराचे संपादक होते.

बाबाणी १९७३ ते १९८0 च्या दरम्यान ‘अखिल भारत सिंधी बोली व साहित्य सभा’ या संस्थेचे अध्यक्ष होते. १९७३ मध्ये भरलेल्या ‘ अखिल भारत सिंधी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सिंधी साहित्यक्षेत्रात एक सिद्धहस्त कथाकार म्हणून त्यांचे विशिष्ट स्थान आहे. याशिवाय चरित्र, निबंध, एकांकिका इ. साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. हूअ (म.शी.ती) आणि दर्द जो दिलिमें समाइजो न सध्यो (म.शी. दु:ख हृदयी सामावेना!) हे अनुक्रमे १९५६ व १९६६मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे दोन प्रमुख कथासंग्रह होत. याशिवाय त्यांच्या अनेक कथा विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत व कथासंकलन ग्रंथातूनही त्या अंतर्भूत झाल्या आहेत.

त्यांच्या १९७२ मध्ये प्रकाशित झालेल्या एकांकिकासंग्रहातील ‘सूरीअ सडु कयो’ (सुळाचे निमंत्रण) ही प्रमुख एकांकिका सिंधी स्वातंत्र्यवीर हेमू कालाणी यांच्या जीवनावर आधारित आहे, तर इतर एकांकिकांत सामाजिक दोषांवर मार्मिक टीका आहे. ‘सिंधी जातीअ जो आईंदो’ (सिंधी जातीचे भवितव्य) हा प्रदीर्घ निंबंध बाबाणींनी १९६९ साली लिहिला. १९७८ मध्ये त्यांचा अमन जे उफक डांहुं (शांतीच्या गगनाप्रत) हा निबंधसंग्रह प्रकाशित झाला. १९८१ मध्ये साहित्य अकादेमीने प्रसिद्ध कलेल्या निवडक सिंधी निबंधसंग्रहाचे (चूंड सिंधी मज्मून) बाबाणी संपादक होत.

१९२२: सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.

  • घटना :

१४९६: लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.
१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
१९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
२००४: नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.

• मृत्यू :

• १९७५: भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी, १९२३)
• १९९४: मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन. ( जन्म : २५ जून , १९१९ )
• २०००: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
• २००२: भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर, १९२०)
• २००५: भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन. ( जन्म : ८ जानेवारी, १९३६ )
२०२३ : रवींद्र संगीतातील लोकप्रिय गायिका सुमित्रा सेन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.

  • जन्म :

१९२१: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै, १९९७)
१९३१: मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी , २००८)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »