आजचे पंचांग

आज शनिवार, ऑक्टोबर १९, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २७ शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३४ सूर्यास्त : १८:१३
चंद्रोदय : १९:४२ चंद्रास्त : ०८:२०
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वितीया – ०९:४८ पर्यंत
नक्षत्र : भरणी – १०:४६ पर्यंत
योग : सिद्धि – १७:४२ पर्यंत
करण : गर – ०९:४८ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २०:१३ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : मेष – १६:१० पर्यंत
राहुकाल : ०९:२९ ते १०:५६
गुलिक काल : ०६:३४ ते ०८:०१
यमगण्ड : १३:५१ ते १५:१८
अभिजितमुहूर्त : १२:०० ते १२:४६
दुर्मुहूर्त : ०६:३४ ते ०७:२०
दुर्मुहूर्त : ०७:२० ते ०८:०७
अमृत काल : ०६:२१, ऑक्टोबर २० ते ०७:४८, ऑक्टोबर २०
वर्ज्य : २१:३९ ते २३:०६
तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले – त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.
श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे `दादा’ म्हणजेच मा.पांडुरंग शास्त्री आठवले यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला.
त्यांना जगभरातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात १९८७ साली इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार’ १९८८ साली महात्मा गांधी पुरस्कार’, १९९२ साली
लोकमान्य टिळक सन्मान, १९९६ साली रेमॉन मॅगसेसे पुरस्कार’ आणि १९९९ साली भारत सरकार तर्फे
पद्मविभूषण पुरस्कार’ अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.
१९२०: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर, २००३)
वीराग्रणी, उत्कृष्ट वक्ते, – डॉ. नारायण दामोदर सावरकर – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू ही झाली त्यांची एक ओळख. पण त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं स्वतःची ओळख निर्माण केली ती वीराग्रणी डॉ. नारायण सावरकर म्हणून.
अभिनव भारत या वीर सावरकरांनी सुरु केलेल्या क्रान्तिकारी संघटनेचे ते कृतिशील सदस्य होते. दोघे बंधू अंदमानात असताना त्यांनी क्रान्तिकार्यात खंड पडू दिला नाही. अभिनव भारतच्या शाखा विस्तारतच राहिल्या. कुठलीही हत्या, बॉम्ब फेकीनंतर नारायणरावांनी अटक, झडती, जप्ती ठरलेली असे. १३ नोव्हेंबर १९०९ ला कर्णावती (अहमदाबाद) येथे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकण्यात आला. संशयावरून नारायणरावांना अटक करण्यात आली. १८ डिसेंबर १९०९ ला त्यांची सुटका झाली. पण २१ डिसेंबर १९०९ ला अनंत कान्हेरे यांनी नाशिकमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध केला आणि २३ डिसेंबरला नारायणरावांना पुन्हा अटक झाली. या कटातील मुख्य आरोपी होते विनायक दामोदर सावरकर. अडतीस आरोपींपैकी सर्वात लहान आरोपी होते नारायणराव.
या अभियोगात वीर सावरकरांना झाली ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा तर नारायणरावांना सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा. २२ जून १९११ ला शिक्षा भोगून परत आल्यावर त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. इतर कुठल्याच महाविद्यालयांनी प्रवेश दिला नाही पण कलकत्त्यातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि ते दंत विशारद झाले.
अभ्यास सुरु असतानाही १९१२ मध्ये दिल्लीत, लॉर्ड हार्डिंग्जवरील बॉम्बफेक प्रकरणात नारायणरावांना पकडण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ झाला आणि नंतर पुराव्याअभावी त्यांची मुक्तताही झाली. दोन्ही बंधू अंदमानात असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी नारायणरावांवर होती. गरजेपुरता वैद्यकीय व्यवसाय करून त्यांनी आपले राजकीय, सामाजिक आणि क्रान्तिकार्य सुरूच ठेवले. सरकारी ससेमिरा होताच त्यात समाजही चार हात दूरच राहू पहात होता अशावेळी त्यांच्या मदतीला धावून आल्या त्या मादाम भिकाजी रुस्तम कामा.
१९१७ मध्ये मुंबईत स्थायिक झाल्यावर ते लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सामील झाले. टिळकांच्या मृत्यूनंतर गांधींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह चळवळीतही त्यांनी उडी घेतली. पण पुढे काँगेसच्या स्वराज्य धोरणाला वेगळेच वळण लागलेले पाहून आणि काँग्रेसमध्ये राहून सशस्त्र क्रांती घडवून आणणे कठीण आहे हे जाणवल्यावर ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि हिंदुमहासभेच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालाही हातभार लावला. संघाच्या बैठका डॉ. सावरकरांच्या औषधालयातच होत असत.
गांधींनी अफगाणिस्थानच्या अमानुल्लाखानला हिंदुस्थानवर स्वारी करण्यासाठी पाचारण केलेले पाहून सावरकर बंधू अवस्थ झाले होतेच. पण या कटाचे कारस्थान सर्वप्रथम उघड केले ते आर्य समाज नेते स्वामी श्रद्धानंद यांनी पण त्यांचा खून झाला. त्यांच्या या बलिदानाचे स्मारक म्हणून डॉ. सावरकरांनी इतर सामजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने श्री स्वामी श्रद्धानंद महिलाश्रमाची स्थापना केली. तसेच श्रद्धानंद वृत्तपत्र सुरू केले. साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत श्रद्धानंद मधून सावरकर बंधू परखड मतप्रदर्शन करीत राहिले. ते इतके गाजले की त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. त्यासाठी बाबाराव आणि नारायणरावांनी अथक परिश्रम घेतले. हे पत्र चालविण्यासाठी नारायणरावांना आपले घरही विकावे लागले. परंतु अखेरीस सरकारने त्यावर बंदी आणली. वृत्तपत्र इतिहासातील श्रद्धानंदचे योगदान अनन्यसाधारण आहे.
पंजाब आणि बंगालमधील गुप्त संघटनांबरोबर त्यांचा नियमित संपर्क होता. त्यांचे औषधालय म्हणजे दुर्गाभाभी व्होरा, पृथ्वीसिंह आझाद आणि असंख्य क्रान्तिकारकांचे मुंबईतील आश्रयस्थानच होते.
अत्यंत प्रसन्नवदन, हसतमुख असल्यामुळे अच्युतराव कोल्हटकर नारायणरावांना ‘हसरं कमळ’ म्हणत असत. शीतल चांदण्यासारखा त्यांचा स्वभाव होता. लहान वयातच अंगावर आलेली संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलताना, आपले हिंदुराष्ट्र पुन्हा एकदा बलशाली समर्थ राष्ट्र व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
पण त्यांचा अंत मात्र अत्यंत दुर्दैवी झाला. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीत त्यांच्या घरावर हल्ला झाला. मुलांना, घराला वाचविण्यासाठी, आजारी असूनही मागच्या दाराने ते घराबाहेर पडले. त्यांच्यावर दगडफेक झाली, मोठा दगड त्यांच्या डोक्यात घालण्यात आला. ( अहिंसेच्या पुजाऱ्यांची अहिंसा तत्वे त्यांचे बरोबर संपली. अहिंसेच्या पुजाऱ्याच्या चेल्यांनीच हे कृत्य केलं. ) त्यातून डॉक्टर काही सावरले नाहीत आणि १९ ऑक्टोबर १९४९ या थोर देशभक्ताचा अंत झाला. त्यांना विनम्र अभिवादन!!
१९४९ : वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे निधन ( जन्म : २५ मे, १८८८ )
- घटना :
१२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्री हा राजेपदी आरुढ झाला.
१८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
१९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
१९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
१९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.
१९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.
१९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
१९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
२०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
२००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.
• मृत्यू :
• १९३४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर, १८६४)
• १९९५ बाल कलाकार व अभिनेत्री सलमा बेग ऊर्फ बेबी नाझ यांचे निधन. ( जन्म: २० ऑगस्ट, १९४४ )
• २०११: भारतीय लेखक कक्कणदन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल , १९३५)
- जन्म :
- १९०२: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे, १९७३ )
- १९१०: ताऱ्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट, १९९५)
- १९२५: वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल, २००१)
- १९३६: गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै, २००९)
- १९५४: रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर , २००२)