|| देशभक्तीच्या झळा ||

अरे मित्रा तू सर्वांनाच मदत करतो|
तु तसा सर्वांना सोबत घेऊन चालतो||
पण अखेरच्या काळामध्ये मित्रचं काय|
सावलीसुध्दा तुला सोडेल खरंकी काय ||१||
दुसऱ्याच्या आनंदात तु आनंद मानला|
दुसऱ्याचे अश्रू पुसले, तु अश्रूमय झाला||
दुसऱ्यांचे दुःख तु आपलं दुःख मानलं|
तु आपले दुःख आपल्या मनात ठेवलं ||२||
सर्वाच्या वाटेवर दीपस्तंभ उभारला|
सर्वांच्या मार्गातील अंधकार दूर केला||
पण जेंव्हा झुळूक तुझ्या अंगावर आली|
तेव्हा मात्र तुझीच ज्योत विझवली गेली ||३||
आपलं स्वत्व तु सर्वांना समर्पित केले|
प्रत्येकाच्या हाकेला तेव्हा प्रतिसाद दिला||
पण जेंव्हा संकटात तु किंकाळी फोडली|
तेव्हा मात्र सगळ्यांनी हाके लाओ टाळली |४||
आता थोडं थांबून, काही क्षण जगून घे|
एकदाच स्वतःच्या मनाला विचारुन घे||
नाही तर शेवटी संवाद काय होईल|
मग तुझी सावलीसुध्दा तुझी का राहील ||५||
आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)