उसाचा दर ठरल्याशिवाय ऊस तोड घेऊ नका : धनाजी चुडमुंगे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : येत्या काही दिवसात कारखाने सुरु होणार आहेत गेल्या वर्षभरात साखर आणि उप पदार्थांना जास्त दर मिळालेला आहे त्यामुळे कारखाने मोठया नफ्यात आहेत. त्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. जो पर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही उसाची तोड घ्यायची नाही, असे आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले.
अर्जुनवाड ( ता. शिरोळ ) येथील शिवाजी चौकात आंदोलन अंकुशच्या वतीने काल शेतकरी जागृती सभा घेण्यात आली त्यामध्ये ते बोलत होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते रघुनाथ पाटील गुरुजी होते.
सभेत बोलताना धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की निवडणुकीच्या गदारोळात उसाचा दर न ठरताच काही कारखाने सुरु करण्याच्या प्रयत्नात आहेत गेल्या दोन वर्षात साखरेला 600 रुपये जादा दर मिळाला, बग्यास मळी ला पण वाढून दर मिळाला आहे. अशी पोषक परिस्थिती असताना कारखान्यांनी स्वताहून दुसरा हप्ता द्यायला पाहिजे होता पण कारखान्यांनी तो दिला नाही म्हणून आता आपल्यालाच आंदोलनाच्या रेट्यातून हे पैसे घ्यायचे आहेत त्यामुळे आम्ही सांगत नाही तोपर्यंत कोणीही कारखान्यांना उसाचे कांडे देऊ नये असेही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
कृष्णा देशमुख उदय होगले यांचीही यावेळी भाषणे झाली शेवटी आभार संजय चौगुले यांनी मानले. यावेळी दिपक पाटील, संभाजी शिंदे, अनिल सुतार, शेबीराज हेगान्ना, सुधीर मगदूम, सावकर चौगुले व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »