बालकामगार विरोधी दिवस

आज गुरुवार, जून १२, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक २२ , शके १९४७
सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१६
चंद्रोदय : २०:२७ चंद्रास्त : ०६:३१
शक सम्वत : १९४७ विश्वावसु
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – १४:२७ पर्यंत
नक्षत्र : मूळ – २१:५७ पर्यंत
योग : शुभ – १४:०५ पर्यंत
करण : कौलव – १४:२७ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०२:५६, जून १३ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १४:१८ ते १५:५७
गुलिक काल : ०९:१९ ते १०:५९
यमगण्ड : ०६:०० ते ०७:४०
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १३:०५
दुर्मुहूर्त : १०:२६ ते ११:१९
दुर्मुहूर्त : १५:४४ ते १६:३७
अमृत काल : १५:०४ ते १६:४८
वर्ज्य : २०:१४ ते २१:५७
चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल, कपडे यांसारख्या वस्तूंची दुकाने आदी ठिकाणी आजही बालकामगार हमखास सापडतात. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करावयास लावणे ही खरे तर अत्यंत अनिष्ठ प्रथा आहे. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच पण शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात.
समाजामध्ये बालमजूर हा अत्यंत उपेक्षित घटक आहे. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे त्या वयात या मुलामुलींना धोकादायक उद्योगात ढकलले जाते. गरीबी, निरक्षरता, अंधश्रध्दा इत्यादी कारणे आहेत. पण यामुळे लाखो मुलांचे जीवन कोमेजून जात आहे. ज्या उद्योग, व्यवसायामध्ये बालमजुरांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करुन त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.
बालकामगार प्रथा बंद झाली पाहिजे. त्यांची पिळवणूक थांबली पाहिजे. त्यांचे हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे. केवळ चरितार्थ चालत नाही म्हणून बालवयात कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना त्यांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
आज जागतिक बालकामगार विरोधी दिवस आहे.
.
१९३२ : पद्म विभुषण पुरस्कार सन्मानित इलाट्टुवालापिल श्रीधरन हे एक भारतीय अभियंता आणि राजकारणी आहेत. भारतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम करण्यासाठी आणि कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापन करण्यासाठी ते ओळखले जातात . ते १९९५ ते २०१२ दरम्यान दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) चे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांना जन्म दिन शुभेच्छा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. – लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे.
लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते . अशा अनेक क्षेत्रात त्यांचे प्रभुत्व होते.
गुळाचा गणपती या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले.
१९३७पासून पुलंचा नभोवाणी संबंध आलाच होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.
१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.
• २०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर , १९१९)
- लेखक भा.द. खेर यांनी इ.स. १९४१ ते इ.स. १९८४ या काळात त्यांनी विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले. मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांचे ‘अधांतरी’, दे प्रिन्सेस’ हे त्यांनी केलेले अनुवादही गाजले. शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’, किंग लियर, विंटर्स टेल’ इत्यादी नाटकांचे अनुवाद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राची व साहित्याची ओळख करून देणारे ग्रंथ, श्री गुलाबराव महाराज, गजानन महाराज, साईबाबा आदी महात्म्यांची महती पटवून देणारी पुस्तके, ऐतिहासिक गुजगोष्टी, नाना नवलकथा’ असे त्यांचे संकीर्ण लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांची एकूण पृष्ठसंख्या २५०००हून अधिक आहे. ’समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंडी ग्रंथाचे भा.द.खेर एक सहसंपादक होते.
कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङमय, संतचरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारात खेर यांनी बहुमोल योगदान दिले. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना सर्जनशील साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळविणारे खेर ‘केसरी’चे सहसंपादक आणि ‘सह्याद्री’चे संपादक होते. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाला. १९३९मध्ये वकिलीची पदवी मिळवतानाच त्यांचा ‘नादलहरी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. १९६८ पर्यंत त्यांच्या जवळपास पन्नास सामाजिक, कौटुंबिक कादंबऱ्या, चरित्रे आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली.
त्यांचे आतेबंधू ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून ते चरित्रात्मक कादंबऱ्यां वळले. ‘यज्ञ’ ही त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील लिहिलेल्या पहिल्या चरित्रात्मक कादंबरीची प्रकाशनापूर्वीच ११ हजार प्रतींची नोंदणी झाली होती. त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतींचे गारूड आजही रसिक वाचकांच्या मनावर कायम आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी लिहिण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ताश्कंदला आणि ‘हिरोशिमा’ ही कादंबरी लिहिण्यासाठी जपानला राज्य अतिथी (स्टेट गेस्ट) म्हणून पाठविले होते.
साहित्यसम्राट न.चिं. केळकर पुरस्कार(१९९२-९३), महाराष्ट्र सरकारचा हरि नारायण आपटे पुरस्कार, शिवाजी सावंत स्मृति मृत्युंजय पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते.
१९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून , २०१२)
- घटना :
१८९६: जे. टी. हर्न हे प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू ठरले.
१८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
१९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
१९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
२००१: कोनेरु हंपी बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारताच्या सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू ठरल्या.
• मृत्यू :
• १९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी,१८९२ )
• १९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च, १९०१)
२०१५: भारतीय मूर्तिकार पद्म श्री नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर १९२४)
- जन्म :
४९९: भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म.
१८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)