चाफेकर बंधू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, जून २२, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १, शके १९४७
सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:१९
चंद्रोदय : ०३:३२, जून २३ चंद्रास्त : १६:१२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : ( योगिनी ) द्वादशी – ०१:२१, जून २३ पर्यंत
नक्षत्र : भरणी – १७:३८ पर्यंत
योग : सुकर्मा – १६:५७ पर्यंत
करण : कौलव – १४:५६ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०१:२१, जून २३ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : मेष – २३:०३ पर्यंत
राहुकाल : १७:३९ ते १९:१९
गुलिक काल : १६:०० ते १७:३९
यमगण्ड : १२:४१ ते १४:२०
अभिजित मुहूर्त : १२:१४ ते १३:०७
दुर्मुहूर्त : १७:३३ ते १८:२६
अमृत काल : १३:१६ ते १४:४४
वर्ज्य : ०४:२७, जून २३ ते ०५:५४, जून २३

|| भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे |
| गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥ – स्वा.वि.दा. सावरकर

वासुदेव चाफेकर व त्यांचे बंधू हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात. मूळचे कोकणातील असणारे कीर्तनकार हरिपंतांचे कुटुंब पुण्याजवळ चिंचवड येथे स्थायिक झाले.

पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले.

ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.

रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.

चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चाफेकर बंधू शहीद झाले.

१८९७: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले. आज या घटनेला १२८ वर्ष पूर्ण झाली.

विष्णू भिकाजी कोलते – यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या नरवेल या गावी झाला. त्यांचे वडील कास्तकरी, वाणी होते. ज्ञानार्जनाची, साहित्याची फार मोठी परंपरा त्यांच्या घरामध्ये नव्हती. परंतु, तत्कालीन परिस्थितीची जाणीव, शिक्षणासंबंधी नवीन संधी याची कल्पना भिकाजी कोलते यांना होती.

 विष्णू कोलते स्वत: सत्यशोधक समाजाचे होेते. त्या कार्यकर्त्यांची ये-जा, उठबस त्यांच्या घरी होती. त्यामुळे भिकाजी कोलते यांनी लहानग्या विष्णूला शिकवण्याचे ठरवले होते. त्यांंनी आपले लहानसे खेडे सोडले आणि ते मलकापूर येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी कापडाचे दुकान घातले. पंचक्रोशीतील समाजप्रबोधन करणारी मंडळी येथेही त्यांनी जोडली. उदा. ज्योतिराव फुल्यांचे चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील, ‘आत्मोद्धार’ नियतकालिक काढणारे जळगावचे सीताराम पाटील, एल.एस. भटकर इत्यादी. या काळात विष्णूला वाचनाची गोडी लागली होती. फुल्यांचे चरित्र वाचल्यावर तर विष्णूने शिक्षण घेण्याचे ठरवले. विष्णू मलकापूरच्या शाळेत दाखल झाले. सत्यशोधक चळवळीच्या जोडीला घरात वारकरी संप्रदायाचे वातावरणही होते. त्यामुळे विष्णूच्या बालमनावर संतांचे संस्कार झाले. तुकारामांचे अभंग त्याने मुखोद्गत केले.

 मलकापूरचे शिक्षण संपवून १९२२ साली माध्यमिक शिक्षणासाठी विष्णूची रवानगी खामगाव येथे झाली. तेथील वास्तव्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे ठरले. शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब गणेश मोरेश्वर गोरे यांनी त्याला प्राचीन मराठी कवितेची गोडी लावली. कविता वाचता वाचता विष्णू स्वत: कविता करू लागला. पुढे नामवंत कवी म्हणून तो प्रसिद्ध झाले. मॅट्रिकनंतर नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये त्याने प्रवेश घेतला. १९३१ साली ‘एम.ए. मराठी’ या परीक्षेमध्ये त्याने प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक पटकावला. याच परीक्षेमध्ये त्यांना तीन सुवर्णपदके मिळाली.

 पुढे, अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजमध्ये विष्णू कोलते यांना प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. खरा पिंड अध्यापकाचा असल्यामुळे कोलते पाठाची पूर्ण तयारी करूनच वर्गात जात असत. याच काळात महानुभाव पंथियांच्या वाङ्मयाकडे त्यांचे मन आकृष्ट झाले. ते साहित्य मराठी वाङ्मयाच्या प्रमुख प्रवाहात आणावे, असे त्यांना वाटू लागले. त्या दृष्टीने त्या साहित्याचा अभ्यास सुरू झाला. त्यांनी संशोधन, संपादन हेही क्षेत्र स्वीकारले. महानुभाव पंथाचे काही साहित्य कूटलिपींमध्ये बद्ध होते. त्यामुळे सामान्यांपर्यंत ते पोहोचत नसे. त्या पंथाचे महंत त्यातच समाधान मानीत. 

कोलते यांनी या कूटलिपी अभ्यासल्या. महानुभावांच्या अनेक ग्रंथांचे चिकित्सक संपादन केले. उदा. भास्कर भट्ट बोरीकर विरचित ‘उद्धवगीता’, ‘स्थानपोथी’, नरेंद्र विरचित ‘रुक्मिणी स्वयंवर’, महाई भट्ट संकलित श्री गोविंदप्रभू चरित्र इत्यादी अशा एकूण पंधरा महानुभावीय ग्रंथांचे विष्णू कोलते यांनी संपादन केले.
या संपादनाचे वैशिष्ट अनेक प्रकारे सांगता येईल. संपादन करताना डॉ. वि.भि. कोलते यांनी कोणताही ग्रह, कल न ठेवता तटस्थवृत्तीने काम केले. पोथ्यांची चिकित्सक प्रत तयार केली. त्या-त्या ग्रंथाचा कर्ता, त्याचा काळ, तत्कालीन सामाजिक, धार्मिक स्थिती इत्यादी अंगांनी ग्रंथांचा अभ्यास केला. महानुभाव तत्त्वज्ञानावर प्रबंध लिहून त्यांनी ‘आचार्य’ ही सन्मानाची उपाधी मिळवली.

 अर्थनिर्णयपर टीपा, पारिभाषिक संज्ञा, महानुभावांचे आचारविचारांचे संकेत, त्यांचा अन्वयार्थ, या सर्वांकडे लक्ष दिलेले दिसते. संपादित ग्रंथाच्या शेवटी शब्दकोश देणे हे तर त्यांचे खास वैशिष्ट्य होय.

संपादनशास्त्रालाच त्यांनी एक वैचारिक, सैद्धान्तिक बैठक घालून दिली. पुढील काळातील संपादनाला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली हे नि:संशय.
यथावकाश डॉ. वि.भि. कोलते प्राचार्य झाले. अमरावती, नागपूर असा त्यांचा हा प्राचार्यपदाचा प्रवास होता. कामाचा उरक, जिद्द, शिस्त, पुरोगामी दृष्टी ही त्यांच्या कारभाराची वैशिष्ट्ये होती. या पदावरून काम करताना उत्तम प्रशासक, सल्लागार म्हणूनही त्यांचे वैशिष्ट जाणवले होते.

यानंतर नागपूर विद्यापीठाचे पहिले सरकार नियुक्त पूर्णवेळ कुलगुरू म्हणून डॉ. वि.भि. कोलते यांची निवड झाली. शिक्षण क्षेत्राचा भरघोस अनुभव असल्यामुळे नागपूर विद्यापीठाचे कार्य जोरात सुरू झाले. पदव्युत्तर परीक्षेसाठी नागपूर विद्यापीठाने मराठी माध्यमाचा अवलंब केला. विद्यापीठातील शिक्षण हे अधिक प्रयोजनपूर्ण, समाजाभिमुख झाले. विद्यापीठातील प्राध्यापकांचा व्यासंग वाढावा यासाठी वार्षिक परिषदा, उन्हाळी अभ्यासवर्ग, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येऊ लागले.
 महानुभाव साहित्याचे संशोधन, संपादन यांसंबंधी महत्त्वाचे काम झाल्यानंतर विदर्भ संशोधन मंडळाच्या १९५८ सालच्या वार्षिकामध्ये त्यांनी एक वेगळ्या विषयावरील लेख प्रसिद्ध केला. प्राचीन भारतीय इतिहासविषयक संशोधनाचा हा त्यांचा पहिला लेख म्हणता येईल. ‘झरिका दानपत्र’ हा त्या लेखाचा विषय होता.

१९०८: पद्मश्री पुरस्कार सन्मानित महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल, १९९८)

घटना :
१६३३: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.
१७५७: प्लासीची लढाई सुरू झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
१९७६: कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
१९७८: जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.
१९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्यात महिलांना ३० टक्के आरक्षण.
२००७: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.

• मृत्यू :
• १९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)
• १९९३: चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन.
• १९९४: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी , १९०८)
• २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रामा नारायणन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल ,१९४९)

  • जन्म :
    १८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: ०९ नोव्हेंबर १९६७)
    १९२७: भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५)
    १९३२: आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी, २००५ )
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »