कुटुंब (परिवार) दिवस

आज गुरुवार, मे १५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २५, शके १९४७
सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:०६
चंद्रोदय : २१:३८ चंद्रास्त : ०७:४३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – ०४:०२, मे १६ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – १४:०७ पर्यंत
योग : शिव – ०७:०२ पर्यंत
करण : वणिज – १५:१८ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०४:०२, मे १६ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : वृश्चिक – १४:०७ पर्यंत
राहुकाल : १४:१३ ते १५:५०
गुलिक काल : ०९:१९ ते १०:५७
यमगण्ड : ०६:०४ ते ०७:४२
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १०:२५ ते ११:१७
दुर्मुहूर्त : १५:३७ ते १६:३०
वर्ज्य : २२:४७ ते ००:३१, मे १६
१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता.
भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत. याचे कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही हे आहे.
या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे.
आज कुटुंब-परिवार दिवस आहे.
तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर – पाश्चात्त्य संस्कृतीच्या नव्या झगझगाटाच्या वातावरणात देवेंद्रनाथांनी भारतीय सनातन अध्यात्माची प्रतिष्ठा मानून स्वतःच्या विचाराने व आचाराने तिचा पुरस्कार केला. राममोहन रॉय यांनी सुरू केलेल्या ब्राह्मो समाजाच्या कार्याला त्यांनीच यथोचित वळण दिले.
तत्त्वबोधिनी पत्रिका (स्था. १८४०) ह्या ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिकाद्वारे बंगाली गद्याच्या वाटचालीस त्यांनी गती देऊन मोठाच हातभार लावला. भारदस्त वैचारिक गद्यलेखनाची परंपरा बंगालीत ह्या पत्रिकेने सुरू झाली. ह्या पत्रिकेचे पहिले संपादक अक्षयकुमार दत्त होते. देवेंद्रनाथांची ब्राह्मो धर्मावरील निरूपणे व ब्राह्मो समाजातील व्याख्याने ह्या पत्रिकेत नियमितपणे प्रसिद्ध होत असत. त्यामुळे लोकजागृती होऊन समाजाच्या ध्येयधोरणांचा व विचारांचा प्रसार होण्यास खूपच मदत झाली.
ऋग्वेदाच्या बंगाली अनुवादास प्रथम देवेंद्रनाथांनीच हात घातला. ब्राह्मधर्म (२ खंड, १८४९, १८५०) हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय.
त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाही सखोल अभ्यास केला होता. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत (बांगला भाषाय संस्कृत व्याकरण, १८४५) प्रथम त्यांनीच लिहिले. स्वरचित जीवनचरित (१८९८) हे त्यांचे आत्मचरित्र फारच मनोरंजक आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्राचे पुढे सत्येंद्रनाथ टागोर आणि इंदिरा देवी ह्या दोघांनी देवेंद्रनाथ ठाकूरेर स्वरचित जीवनचरित नावाने इंग्रजीत भाषांतरही केले. ब्राह्मो धर्मासंबंधीची देवेंद्रनाथांची मते व विचार त्यांच्या ब्राह्मोधर्मेर व्याख्यान (२ खंड, १८६१, १८६६) वगैरे पुस्तकांत संकलित आहेत. आत्मतत्त्वविद्या (१८५२), ब्राह्मधर्मेर मत ओ बिश्वास (१८६०) इ. त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ होत.
• १८१७: भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी ,१९०५)
फिल्ड मार्शल – करिअप्पा हे भारतातील त्या दोन सेनाधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांना फाइव्ह स्टार रँक मिळाला आहे. यातील दुसरे नाव म्हणजे फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ.
करिअप्पा १९५३ साली आपल्या सक्रिय सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर दोन वेळा लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली. पण दोन्हींत ते पराभूत झाले. पुढे १९८६ मध्ये राजीव गांधींच्या शासनात त्यांना फील्ड मार्शल करण्यात आले.
करिअप्पा यांच्याबद्दल एक किस्सा फार गाजतो. पाकिस्तानचे राष्ट्रपती फील्ड मार्शल करिअप्पांना फोन करून आपल्या मुलाबाबत काळजी नसावी असा संदेश देतात, तेव्हा करिअप्पांचे कार्य लक्षात येते. झालं असं, की १९६५ च्या भारत-पाक युद्धात त्यांचे पुत्र के. सी. करिअप्पा वायुसेनेत फ्लाइट लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते. त्यांना नंदू म्हणून ओळख होती. पाकिस्तानी सीमेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विमानावर हल्ला झाला, आणि विमानातून उडी मारल्यावर पाकिस्तानी सेनेने त्यांना ताब्यात घेतलं. पाकिस्तानी रेडियोनेही लगेचच जाहीर केले, की के. सी. करिअप्पा त्यांच्या ताब्यात आहेत.
तेव्हा पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख अयूब खान हे तत्कालीन राष्ट्रपती होते. देशाच्या फाळणीपूर्वी त्यांनी के. एम. करिअप्पांच्या नेतृत्वात काम केलं होतं. जेव्हा अयूब खान यांना कळलं की करिअप्पांचा मुलाला आपल्या सैन्याने ताब्यात घेतलं आहे, तेव्हा त्यांनी ताबडतोब करिअप्पांना फोन केला, आणि लवकरच सुटका करण्याचं आश्वासन दिलं.
त्यावेळी करिअप्पांनी त्यांना शांतपणे उत्तर दिलं, – नंदूला माझ्या मुलासारखी नाही, तर युद्धकैद्यासारखीच वागणूक द्या. त्याची सुटका करायची असेल, तर सर्व युद्धकैद्यांची सुटका करा.
पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी करिअप्पांचा आदर राखला. त्यांच्या मुलाला अयूब यांची पत्नी व मुलगा भेटायलाही गेले होते. युद्धसमाप्तीनंतर के. सी. करिअप्पा यांची सुटका करण्यात आली.
• १९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी ,१८९९)
- घटना :
१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.
१७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
१९२८: मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.
१९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४०: सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
१९६१: पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.
मृत्यू :
१९९४: जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन. ( जन्म : २७ एप्रिल, १९५५ )
•१९९४: चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.
• जन्म :
•१९०३: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)
•१९०७: क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. (हुतात्मा : २३ मार्च, १९३१)
•१९६७: अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.