यशवंत कारखाना जमीन विक्रीप्रकरणी २० ऑगस्टला सुनावणी

पुणे : उरुळी कांचन थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संशयास्पद जमीन विक्रीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर २० ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, दाखल याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने बहुतांश प्रतिवादी न्यायालयात हजर न झाल्याने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित प्रतिवादींना पुन्हा नोटीस जारी करण्याचे आणि त्या कोर्ट बेलीफमार्फत प्रत्यक्ष बजावण्याचे आदेश दिले आहेत. सदर जनहित याचिका यशवंत बचाव व कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे, तसेच कारखान्याचे सभासद राजेंद्र चौधरी, लोकेश कानकाटे, सागर गोते आणि अलंकार कांचन यांनी दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एम., एस. कर्णिक आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान कोर्टाचा निर्णय सर्व संबंधितांना बंधनकारक राहील, अशी महत्त्वपूर्ण कोर्ट बेलीफमार्फत प्रत्यक्ष नोटीस बजावण्याचे दिले आदेश; संबंधितांची उपस्थिती बंधनकारक असल्याची टिप्पणी केली आहे. यशवंत बचाव व कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांनी सांगितले की, प्रकरण न्यायालयात असताना जमीन विक्रीसंदर्भात उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. या प्रकरणाकडे राज्यातील संपूर्ण साखर क्षेत्राचे लक्ष लागले आहे.