लक्ष्मणराव किर्लोस्कर

आज शुक्रवार, जून २०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक ३० शके १९४७
सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:१९
चंद्रोदय : ०१:५८, जून २१ चंद्रास्त : १४:०६
शालिवाहन शक : संवत् : १९४७
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : नवमी – ०९:४९ पर्यंत
नक्षत्र : रेवती – २१:४५ पर्यंत
योग : शोभन – २३:४७ पर्यंत
करण : गर – ०९:४९ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २०:३६ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : मीन – २१:४५ पर्यंत
राहुकाल : ११:०१ ते १२:४०
गुलिक काल : ०७:४१ ते ०९:२१
यमगण्ड : १५:५९ ते १७:३९
अभिजितमुहूर्त : १२:१४ ते १३:०७
दुर्मुहूर्त : ०८:४१ ते ०९:३४
दुर्मुहूर्त : १३:०७ ते १४:००
अमृत काल : १९:३० ते २१:००
वर्ज्य : १०:३१ ते १२:००
जागतिक निर्वासित दिवस – १९५१च्या करारामध्ये निर्वासितांसाठीच्या मूलभूत जगण्याचा अधिकार, अन्न, वस्त्र, निवारा हे अधिकार, शिक्षणाधिकार अशा स्वरुपाचे काही मूलभूत अधिकारांचा समावेश केला होता. या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी निर्वासितांना हे मूलभूत अधिकार देणे बंधनकारक होते. या करारावर सर्वप्रथम पश्चिम युरोपीय देशांनी स्वाक्षरी करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू याची संख्या वाढत गेली.
२०१५ पर्यंत १२५ देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. करारानुसार त्या देशात येणाऱ्या निर्वासितांच्या मानवाधिकाराच्या संरक्षणाची जबाबदारी त्या-त्या राष्ट्रांच्या सरकारवर आहे. यासंदर्भात नंतरच्या काळातही अनेक करार होत गेले.
आज जागतिक निर्वासित दिवस आहे.
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर – सायकलच्या दुकानापासून सुरवात करून तब्बल ७० देशात आपला बिझनेस पोहोचवणारा पहिले मराठी उद्योजक, लक्ष्मणराव किर्लोस्कर, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक
लक्ष्मण काशिनाथराव किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी बेळगाव जिल्ह्यातील गुर्लेहोसूर नावाच्या एका छोट्याशा खेड्यात झाला. लहानपणापासूनच त्यांना यांत्रिक वस्तूंचे प्रचंड आकर्षण होते, तसेच ते चित्रकलेतही पारंगत होते.
१८८५ साली वडिलांच्या इच्छेविरुद्ध आणि मोठ्या भावाच्या मदतीने लक्ष्मणराव यांनी मुंबईचा जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतली. दोन वर्षातच त्यांना रंगअंधत्व आढळुन आले, त्यामुळे त्यांना शिक्षण मधेच थांबावावे लागले. त्यामुळे यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला . चित्रकला सुटली पण रेखाचित्राचा केलेला अभ्यास त्यांच्या कामी आला आणि पुढे त्याच शिक्षणाच्या जोरावर विक्टोरिया टेक्नीकल इन्स्टिटयूटमध्ये कला शिक्षक आणि बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी केवळ ४५ रुपये महिन्यावर काम करण्यास सुरुवात केली.
त्यांना उपकरणे खोलून पुन्हा जोडण्याची सवय होती. त्यामुळे ते केवळ शिक्षकी पेशात रमले नाहीत.
त्यांनी १८८७ मध्ये मुंबईतून सायकली खरेदी करून त्या बेळगावमध्ये वडील बंधू रामण्णा यांच्या मदतीने विकण्यास सुरूवात केली.
त्यांनी इंग्लंडच्या मूळ सायकल उत्पादक कंपनीशी थेट करार केला. दरम्यान, त्यांना भारतीय म्हणून शिक्षण संस्थेत पदोन्नती नाकारली गेली आणि लक्ष्मणराव नोकरीचा राजीनामा देऊन बेळगावला आले.
त्यांनी भावासह ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ अशी कंपनी स्थापन केली. त्यांनी काही वर्षें विविध उद्योग केले. परदेशातून पवनचक्क्या आणूनही विकल्या. ते लोकांना सायकल चालवण्यास शिकवायचे. त्यांनी लाकडाच्या खिडक्या आणि दरवाजे करून विकले.
पुढे १८८८ मध्ये मुंबई सोडून ते बेळगावात आले आणि त्यांनी बेळगावात जाताच सायकल दुरुस्तीचे दुकान थाटले. या दुकानाच्या माध्यमातुन त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकले. त्यांनी आणि त्यांच्या भावांनी मिळुन किर्लोस्कर वाडीच्या वसाहतीचा प्रारंभ केला. १९१० मधे लक्ष्मणरावांनी कुंडलातील निर्जन आणि निर्जळ अशा माळरानावर “किर्लोस्कर ब्रदर्स” या नावानं कारखाना उभारला. या कारखान्यात शेतीव्यवसायासाठी लागणाऱ्या नांगर, मोटार, रहाट, चरक यांसारख्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले.
त्यांनी भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याचे ठरवले. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे. जनावरांच्या चाऱ्यातून बुडखा वेगळा करणे आणि चाऱ्याचे बारीक तुकडे करून ते जनावरांपुढे टाकणे सोपे झाले. ते यंत्र लोकांच्या पसंतीस उतरले.
किर्लोस्करवाडीत सुरुवातीला फक्त पाण्याचे पंप बनत. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे ‘पंप म्हणजे किर्लोस्करांचे’ अशी ख्याती झाली. किर्लोस्करांनी त्यांच्या उत्पादनांचा पसारा पुढे वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबर यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पादनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तेथे सुरू झाली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी प्रवासाची यातायात करावी लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली. त्यांनी परिसरात शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या आणि जणू एक गावच वसवले. त्यामुळे उद्योगाची भरभराट झाली.
हातपंपांची निर्मिती हे त्यांचे आणखी मोठे साध्य.
एकूण वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली. ती इंग्लंडच्या ऑईल कंपनीबरोबर करार करणारी पहिली भारतीय कंपनी. त्यातून ऑईल इंजिनचे उत्पादन सुरू झाले. त्या यंत्रामुळे किर्लोस्कर हे नाव समग्र शेतकरी वर्गाच्या हृदयावर कोरले गेले. कंपनी ऑईल इंजिन परदेशी निर्यात १९४६ पासून करू लागली.
१९२० साली भांडवल वाढवण्याच्या हेतूने त्यांनी कारखान्याचा रूपांतर एका छोट्याशा कंपनीत केले. त्यामार्फत आणखी विविध उत्पादनं तयार होऊ लागली. औद्योगिक कारखाना चालविण्याचे कोणतेही शिक्षण न घेता किर्लोस्कर उद्योग समूह त्यांनी अतिशय परीश्रमाने उभा केला.
अशा या आपल्या भारतातील पहिल्या मराठी उद्योजकावर २० जुन १९८९ मध्ये भारत सरकारने पोस्टाचे तिकीट सुद्धा काढले. किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.
१८६९: किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)
- घटना :
१८४०: सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.
१८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.
१८८७: देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.
१८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
१९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
१९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.
१९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
• मृत्यू :
• १९८७: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित, भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉं. सलिम अली यांचे निधन. ( जन्म : १२ नोव्हेंबर, १८९६ )
• १९९७: मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचे निधन. ( जन्म : २९ डिसेंबर, १९०८ )
• १९९७: राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन.
• २००८: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी , १९२१)
• २०१३: भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)
• २०२३ : ‘अटरली बटरली’ अमूल गर्ल मॅस्कॉटचे निर्माते सिल्वेस्टर दाकुन्हा यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. १९६६ मध्ये त्याच्या निर्मितीपासून, डाकुन्हा ची अमूल गर्ल मोहीम तिच्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेसाठी आणि स्थानिक समस्यांवर भाष्य करण्यासाठी प्रख्यात बनली.
- जन्म :
१९३९: जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल, १९९८)
१९५२: भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.