राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला आहे. राज्याचा हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच संपल्यानंतर श्री विघ्नहर १३ मेपर्यंत सुरू होता.
गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उत्पादन तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे अल्पावधीचा ठरलेला साखर गाळप हंगामाचा अखेर थांबला आहे. यंदा राज्यात साखर उताऱ्यातही सुमारे पाऊण टक्क्याची घट झाली, तर ९.४८ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे.
यंदा सर्वाधिक २२ लाख ४६ हजार टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे, तर याच विभागात सर्वाधिक ११ टक्के साखर उतारा मिळाला आहे. त्या खालोखाल १९ लाख ९९ हजार टन साखर उत्पादन व ९.६५ टक्के उतारा मिळाला आहे.
यंदा सात कारखान्यांची घट होऊन ९९ सहकारी व १०१ खासगी अशा एकूण २०० कारखान्यांनी साखर गाळप हंगाम एक नोव्हेंबर रोजी सुरू होणे अपेक्षित असताना विधानसभा निवडणूक व त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे हंगामास तुलनेने महिनाभराचा उशीर झाला होता. राज्यात गेल्या वर्षाच्या साखर हंगामात २०७ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता.
अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाला तुरे येण्याच्या प्रमाण वाढ तसेच गेल्या वर्षाच्या अतिपावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेने कमी होता. १५ एप्रिलपर्यंत २०० कारखान्यांपैकी पुणे जिल्ह्यातील विघ्नहर कारखान्याचा अपवाद वगळता अन्य १९९ कारखान्यांनी आपले गाळप संपविले होते.
यंदा सर्व कारखान्यांनी मिळून ८०९.५ लाख टन उसाचे गाळप केले. गत हंगामात ते ११०४ लाख टन होते. म्हणजे ऊस उपलब्धतेमध्ये यावेळी मोठी घट झाल्याचे दिसून येते.
राज्यात यंदा ८० लाख ९४००८ टन साखर उत्पादन
राज्यात यंदा ८५२ लाख ३४ हजार टन उसाच्या गाळपातून ८० लाख ९४००८ टन साखर उत्पादन झाले आहे, असून सरासरी साखर उतारा ९.४८ टक्के मिळाला आहे. सर्वाधिक २२ लाख ४६ हजार टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे, तर याच विभागात सर्वाधिक ११ टक्के साखर उतारा मिळाला आहे. त्या खालोखाल १९ लाख ९९ हजार टन साखर उत्पादन व ९.६५ टक्के उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी याचवेळी १ हजार ७३ लाख टन उसाच्या गाळपातून ११० लाख टन साखर उत्पादन व सरासरी १०.२५ टक्के उतारा मिळाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात ३० लाख टनांची घट झाली आहे. तसेच यंदा ७ कारखान्यांनी गाळप केले नाही.
विभागनिहाय साखर उत्पादन (लाख टन)
- कोल्हापूर – २२.४६
- पुणे – २०.१८
- सोलापूर – १०.७५
- अहिल्यानगर – १०.२१
- नांदेड – ९.५४
- छत्रपती संभाजीनगर – ६.५२
- अमरावती – १.७४
- नागपूर – ०.१९३