मकर संक्रांत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, जानेवारी १४, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २४ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२१
चंद्रोदय : १८:४९ चंद्रास्त : ०७:३७
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – ०३:२१, जानेवारी १५ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – १०:१७ पर्यंत
योग : विष्कम्भ – ०२:५९, जानेवारी १५ पर्यंत
करण : बालव – १५:३४ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०३:२१, जानेवारी १५ पर्यंत
सूर्य राशि : धनु – ०९:०३ पर्यंत
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १५:३४ ते १६:५७
गुलिक काल : १२:४८ ते १४:११
यमगण्ड : १०:०१ ते ११:२४
अभिजितमुहूर्त : १२:२५ ते १३:१०
दुर्मुहूर्त : ०९:२८ ते १०:१२
दुर्मुहूर्त : २३:३० ते ००:२२, जानेवारी १५
अमृत काल : ०७:५५ ते ०९:२९
अमृत काल : ०४:०१, जानेवारी १५ ते ०५:३८, जानेवारी १५
वर्ज्य : १८:२० ते १९:५७

तिलवत् स्निग्धं मनोऽस्तु वाण्यां गुडवन्माधुर्यम्।
तिलगुडलड्डुकवत् सम्बन्धेऽस्तु सुवृत्तत्त्वम्।।

भावार्थः
मकर संक्रांति पर तिल समान हम सभी के मन स्नेहमय हो, गुड़ समान हमारे शब्दों में मिठास हो और जैसे लड्डू में तिल और गुड़ कि प्रबल घनिष्ठता है वैसे हमारे संबंध हो।
“तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं कां!

मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे मकर संक्रात – Makar Sankranti (महाराष्ट्र). . . पोंगल – Pongal (तामिलनाडु) . . . उत्तरायण (गुजरात व राजस्थान) . . . लोहढी – Lohri (पंजाब) . . .माघमेला – Magh Mela (ओडिसा) . . . भोगाली बिहु – Bihu (आसाम) . . . संक्रांती – Sankranti (कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार) अशी विविध नावं या सणाला आहेत.

प्रत्येक धर्म आपापल्या प्रथांप्रमाणे या दिवसाला साजरा करत असले तरी देखील आनंद, उत्साह, जल्लोष हा सगळीकडे असतोच असतो.

आज मकर संक्रांत आहे.

आज भूगोल दिन आहे.

मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
( त्या दिवशी तिथी होती पौष शु. अष्टमी.) पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

“कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!”

घोड्याला घोडी व माणसाला माणसे भिडली. “हर हर महादेव” आणि “अल्ला हो आकबर” चा घोष होऊ लागला. रणमैदान पेटू लागले. गोविंदपंत बुंदेल्यांना ठार मारणारा अन् मराठ्यांची रसद मारणारा अताईखान यशवंतराव पवारांनी फाडून काढला. विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यात पडू लागलेली होती.

बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती. पण दैव फिरले. दुपारी १ वाजता सुर्याचे दक्षिणायन सुरू झाले. मराठी लष्कराची तोंडे देखील दक्षिण बाजूला. आधी महिनाभराचा कडकडीत उपास, त्यात वर तिरप्या सूर्यकिरणांचा मारा. पाण्याची कमतरता. त्यामूळे लढता लढता निव्वळ डोळ्यावर अंधारी येऊन उपाशी जनावरे व माणसे कोसळू लागली.

इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि धारातीर्थी पडले. मोकळ्या अंबाऱ्या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले.

हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणाऱ्या सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.

सूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल! तो एक केवळ काळा इतिहास! या युद्धात मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, जानकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, संताजी वाघ – अवघे मारले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक उंबर्यातील कमीत कमी एक जण तरी या लढाईत कामी आलेला आहे.

पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहित.

बंगाली लेखिका महाश्वेतादेवी – यांचा जन्म ढाका येथे १४ जानेवारी, इ.स. १९२६ यादिवशी झाला. त्यांचे वडील मनीष घटक हे बंगाली लेखक, तर भाऊ ऋत्विक घटक हा चित्रपट दिग्दर्शक होता. महाश्वेतादेवींनी इ.स. १९४६मध्ये भारतीय तत्त्वद्य आणि विचारवंत रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्याशांतिनिकेतनमधून इंग्रजी विषयातील पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्यामधून विश्व भरती विद्यापीठातून एम. ए. केले. पुढे इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून बिजायग्रह जोतिराय काॅलेजमध्ये त्यांनी नोकरी केली.

नोकरी करत असतानाच त्यांनी समाजसेवा आणि आदिवासींच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन केले. पुढे त्यांनी पत्रकारिता केली. युगांतर आणि वर्तिका ह्या मासिकातून स्तंभलेखन केले. इ.स. १९५०-६० च्या दशकात महाश्वेतादेवींनी साहित्य लेखनाला सुरुवात केली.
त्यांनी आपल्या सुरुवातीच्या जीवनाची काही वर्षे रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये घालविली. त्या शांतीनिकेतनच्या व्यापारीकरणाला महास्वेता देवींनी विरोध केला. त्यांनी सिंगूर आणि नंदीग्राममध्ये नंदीग्राम चळवळीचे नेतृत्व केलेवादग्रस्त भूसंपादनाच्या धोरणाविरूद्ध मोठ्या संख्येने विचारवंत, कलाकार, लेखक आणि नाटककार एकत्र आले.
अरण्येर अधिकार, नैऋते मेघ, अग्निगर्भ, गणेश महिमा, हाजार चुराशीर मा ( कैदी क्रं १९८४ची आई – या लघु-कादंबरीस्तव लेखिकेस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला) इ. विपुल लेखन आहे.

पश्चिम बंगालमधील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (माकप) -च्या नेतृत्वात सरकारच्या औद्योगिक धोरणाच्या विरोधात चळवळीचे नेतृत्व महास्वेता देवी यांनी केले.
खासकरून, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सुपीक शेतीची जमीन संपादन करून ती अत्यंत कमी किंमतीत उद्योजकांना देण्यावर त्यांनी टीका केली. २०११ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी ममता बॅनर्जी यांचे समर्थन केले. या निवडणुकीमुळे माकपचा ३४ वर्षांचा शासन संपला.

१९२६: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म. ( मृत्यू: २८ जुलै, २०१६ )

  • घटना :
    १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
    १९४८: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
    १९९४: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
    १९९८: ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
    २०००: ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

• मृत्यू :
• १७६१: पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट, १७३०)
• १७६१: पानिपतच्या ३ ऱ्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन. (जन्म: २ मार्च १७४२)
• १९९१: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर, १९१७)

  • जन्म :
    १८८२: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर, १९५३)
    १८९२: भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट, १९९३)
    १८९६: भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर, १९८२)
    १९०५: मराठी अभिनेत्री पद्मश्री दुर्गा खोटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर, १९९१)
    १९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर , २००५)
    १९१९: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म. (मृत्यू: १० मे, २००२)
    १९२३: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर, २००९)
    १९३१: ऊर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट ,२००८)
    १९७७: भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »