मोरया गोसावी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, डिसेंबर २१, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ३०, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०७ सूर्यास्त : १८:०६
चंद्रोदय : २३:४३ चंद्रास्त : ११:४४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – १२:२१ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – ०६:१४, डिसेंबर २२ पर्यंत
योग : प्रीति – १८:२३ पर्यंत
करण : वणिज – १२:२१ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०१:२२, डिसेंबर २२ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : ०९:५२ ते ११:१४
गुलिक काल : ०७:०७ ते ०८:३०
यमगण्ड : १३:५९ ते १५:२२
अभिजितमुहूर्त : १२:१५ ते १२:५९
दुर्मुहूर्त : ०७:०७ ते ०७:५१
दुर्मुहूर्त : ०७:५१ ते ०८:३५
अमृत काल : २३:११ ते ००:५७, डिसेंबर २२
वर्ज्य : १२:३६ ते १४:२२

।। मोरया गोसावी म्हणे मज आली प्रचिती। म्हणुनी तुम्हाप्रती सांगतसे बाप।।

मोरया गोसावी हे १४ व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत व गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. ते संत एकनाथ यांचे समकालीन होते. त्यांनी पुण्यातील चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. असे म्हटले जाते की,गणपतीने मोरयास असा सक्षात्कार करुन दिला की “मी (गणपती) तुझ्या पूजे करीता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.

मोरया गोसावी यांना कऱ्हा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती प्राप्त झाली.त्यानंतर मोरया गोसावी मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले.तेथे त्यांनी गणपती मंदीर उभारले व त्यात कर्हेत प्राप्त झालेल्या गणेशमुर्तीची स्थापना केली काही कळाने मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. मोरयाला चिंतामणी नावाचा मुलगा होता,तो गणेशावतार होता.

आज मोरया गोसावी समाधी दिन आहे. ( मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३, साल १५६१ )

आप्पाजी जोशी एक संघ समर्पित जीवन. – ( हरी कृष्णराव उपाख्य आप्पाजी जोशी )
आप्पाजी १२ वर्षाचे असताना त्यांचे वडील, काका व तीन भावांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे घरी विधवा आई , लहान भाऊ तसेच चूलत भावंडे. कष्टपूर्वक दहावी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे शिकायची इच्छा पण आर्थिक अडचणी. तत्कालीन प्रथेप्रमाणे लहान वयातच विवाह बंधनात अडकले.

पुढे नानासाहेब केदार ह्या वकिलांकडे नोकरी तर पुढे पौरोहित्य सुरु केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी सामाजिक कार्यात सहभाग हा होताच . त्यामुळे व्यायाम शाळेशी त्यांचा संबंध नेहमी येत असे. त्या आखाड्यात डॉ हेडगेवार यांचेशी परिचित / सहकारी असणारे अण्णा सोहनी यांचेशी परिचय झाला. त्यांचे बरोबर वारंवार होणाऱ्या चर्चेतून अप्पाजींना डॉक्टरांविषयी आकर्षण वाढू लागले. त्यातून भक्ती भावना उत्पन्न झाली.
स्वातंत्र्य लढ्याशी अप्पाजींचा सहभाग होता. ऍम्युचर क्लब या नाट्य संस्थे मार्फत नाटक सादर होत होती. आप्पाजींनी या नाटकात स्त्री भूमिका करणाऱ्या कलाकारांचा उपयोग करून घेत त्यांचे मार्फत डॉ हेडगेवार यांनी जमवलेली साधन सामुग्री पंजाब व राजस्थान कडे पाठवत असत. पहिल्या महायुद्धाच्या समाप्ती नंतर क्रांतिकारकांची व्यवस्था जबाबदारी आप्पाजींवर सोपवण्यात आली. ती त्यांनी कुशलतेने निभावली.
असहकार आंदोलनात डॉ हेडगेवार यांनी भाग घेतला. तुरुंगवास भोगून झाल्या नंतर कायम स्वरूपी एखादे राष्ट्र कार्य उभे करण्यासाठी कार्य दिशा ठरवण्यासाठी डॉ हेडगेवार वारंवार बैठक घेत त्यात आप्पाजींचा सहभाग असे.

संघ स्थापना झाल्या नंतर आप्पाजींनी वर्ध्यात पहिली संघ शाखा १८/०२/१९२६ रोजी सुरु केली. व पुढे वर्धा जिल्हा संघचालक दायित्व त्यांचेकडे आले.
संघ समर्पित होऊन कार्य करण्यासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून आप्पाजींनी वेगवेगळ्या ५६ संस्थांचा राजीनामा दिला.

खरं म्हणजे आप्पाजी जोशी व डॉ हेडगेवार हे एक गुरु शिष्याचे असे अतूट नाते होते. डॉ हेडगेवार आप्पाजींचा सल्ला घेऊन पुढील रचना ठरवत.
म गांधी यांनी २५ जानेवारी, १९३८ रोजी वर्धा येथे संघ शिबिराला भेट दिली. अप्पाजींच्या पाठीवर हात ठेऊन म गांधी म्हणाले ” मी खुपच भारावलो आहे. संपूर्ण देशात असे दृश्य मी कधी पाहिले नाही. ” कोणतेही भेद भाव, जातिभेद न बाळगता आपण एकतेची भावना कशी निर्माण केली असा प्रश्न म गांधी यांनी केल्यानंतर ” सर्व हिंदूंमध्ये भावा भावाचे नाते आहे, हा भाव जागृत केल्यास सर्व भेदभाव नष्ट होतात. भातृभाव शब्दांपुरता न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणल्यावर हि जादू होते. याचे संपूर्ण श्रेय डॉ हेडगेवार यांना आहे.
संघ कार्याची दिशा दिशा व कार्य पध्द्ती ठरवण्यासाठी सिंदी येथे महत्वपूर्ण बैठक झाली त्यात बाळासाहेब देवरस, श्री गुरुजी, तात्याराव तेलंग याचे बरोबर आप्पाजी जोशी यांचाही सहभाग होता. त्या बैठकीत डॉक्टरांनी आप्पाजींना विचारले “माझ्या जागी श्री गुरुजींना सरसंघचालक नेमले तर काय होईल ?” आप्पाजींनी लगेच उत्तर दिले ” माझ्या मनातील गोष्ट सांगितली !”

डॉक्टरांच्या निधनानंतर सरसंघचालक पदाची जबाबदारी श्री गुरुजींकडे आल्या नंतर आप्पाजींकडे ही जबाबदारी येणार असे सगळे जण मानत होते. पण दयित्व श्रीगुरुंजींकडे दिले गेले. आप्पाजी अनेकांना सांगत मी जरी उजवा हात असलो तरी श्रीगुरुजी डॉक्टरांहात आत्मा आहेत. उजवा हृदयाला जवळ जाऊन आत्म्याला वंदन करतो. श्रीगुरुजींच्या निर्वाणानंतर सरसंघचालक दायित्व श्री बाळासाहेब देवरस यांचे कडे आले. तीनही सरसंघचालकांचा पदग्रहण समारंभात उपस्थित रहाण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
वाढत्या कार्याबरोबर आप्पाजींवर जबाबदारी सुध्दा वाढली. १९४६ पासून त्यांचेकडे सरकार्यवाह हे दायित्व आले. १९४८ च्या संघबंदी नंतर सरकार्यवाह पदाची जबाबदारी श्री भैय्याजी दाणी यांचे कडे सुपूर्त करून वर्धा जिल्ह्यात परत आले.

संघकार्यावर अविचल निष्ठा असल्यानेच १९७५ च्या आणीबाणीत प्रकृती खालावली, मरणासन्न अवस्था झाली तरी माफीनामा / वचन पत्र सादर करून सुटकेसाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. त्यांचे स्पष्टच मत होते की मी काहीही चांगले लिहून दिले तरी सरकार त्यांच्या पत्राचा गैरवापर करून अर्थाचा अनर्थ करणार. संघ स्वयंसेवक तुरूंगात असताना मी बाहेर पडून काय करू ? त्या पेक्षा स्वयंसेवकांच्या सानिध्यात मृत्यू आला तर केव्हाही चांगलेच. त्यांच्या अशा दृढ निश्चयामुळे अनेकांचे मनोधैर्य वाढले.
आप्पाजी सदैव परमेश्वराकडे मागणे मागत – ” विना दैन्येन जीवनम – अनायासेन मृत्यू: ” या दोन्ही गोष्टी त्यांनी खऱ्या करून दाखविल्या. ज्या तेजस्वीपणाने स्वातंत्र्य सैनिकांना पाळणारे पेन्शन आणि ताम्रपट नाकारले.तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जमनालाल बजाज यांची नोकरी नाकारलीत्यांनी . त्याच दृढतेने त्यांनी सरकारतर्फे मिळणारी ” मीसा बंदींना ” दिली गेलेली मदत ( अनुदान ) सुद्धा त्यांनी नाकारले.

काया थकली तरी त्यांचा देशाभिमान व तेजस्वितता तिळमात्र कमी झाली नाही. त्यांची इच्छाच अशी होती की संघ कार्य करताना आपल्याला मृत्यू यावा. ते इच्छामरणी ठरले. मृत्यूच्या एक आठवडा आधी ते त्यांच्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी मंगळूरच्या मंगळाईला जाऊन आले. धामण गाव येथे बैठक घेतली. सरसंघचालकांवर नुकतीच शस्त्र क्रिया झाली. त्याची भेट घेण्यासाठी नागपूरला जाऊन आले. बैठक झाली. सोमवारी सकाळी निरोप घेताना “अच्छा बंधूंनो चलतो आता ” असे म्हणत कार्यालयातून निरोप घेऊन बाहेर पडले. काही स्वयंसेवकांच्या गाठी भेटी घेतल्या . नागपूरचे तत्कालीन सह प्रांत संघचालक श्री बापूराव वऱ्हाडपांडे यांच्या निवासा समोरच काळाने त्यांचेवर झडप घातली. नियतीने जणू आप्त स्वकियांच्या गाठी भेटीगाठी वेळ दिला होता. ज्या संघचालकांच्या स्थानाबद्दल आदरभाव होता त्याच संघचालकांसमोर त्यांनी प्राण सोडले. संघामध्ये त्यांच्या कडे एक विशेष अधिकार होता. तो त्यांनी स्वतःच्या त्याग , तपस्या आणि समर्पण या गुणांच्या बळावर मिळवला. त्याच आपले आधिकारात आपले परमप्रिय व परमश्रेष्ठ संघ कार्य करत शेवटचा श्वास घेतला.

२१ डिसेंबर, १९७९ : आप्पाजी जोशी यांचे निधन झाले. . १९२५ च्या संघ स्थापने पासून संघ समर्पित झालेला गतिमान , तेजस्वी व प्रेरक अध्याय समाप्त झाला. ( जन्म : ३० मार्च, १८९७)

प्रसिद्ध कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती – त्यांची पहिली कादंबरी संस्कार एक अशी विलक्षण साहित्यकृती आहे की, जिला आधुनिक भारतीय साहित्यातील एक चिरंतन रचना म्हणून मान्यता मिळाली. त्या कादंबरीने त्यांना भारतीय विचारवंतांमध्ये अग्रस्थान प्राप्त करून दिले. धर्म आणि मान्यता हे अंतर्द्वंद या कादंबरीत मांडून त्यांनी साहित्य विश्वात खळबळ उडवून दिली. त्यांचा पहिला कथासंग्रह एन्देन्दु मुगियद कथे प्रकाशित झाला आणि आधुनिकतावादी विचारधारेतील महत्वाचे लेखक म्हणून त्यांना प्रश्ने या त्यांच्या दुसऱ्या कथासंग्रहापासून मान्यता मिळाली. समकालीन स्थितीवर आपल्या बहुआयामी अभिजात दृष्टीने, तसेच सूक्ष्म अध्यात्मिक चेतनेच्या माध्यमातून अनंतमूर्ती यांनी आधुनिक जीवनातील अंतर्विरोध आणि तणाव यावर मौलिक चिंतन आणि संशोधन केले आहे. जे त्यांच्या साहित्यातून प्रकट झाले. कवीच्या रूपातील अनंतमूर्ती यांची अंतर्दृष्टी अगाध आहे. त्याचे प्रमाण त्यांच्या सर्व कवितासंग्रहातून मिळते. एक समीक्षक म्हणून अनंतमूर्ती यांनी साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक अंगावर भर देऊन कन्नड समीक्षेची दिशा बदलण्याची भूमिका पार पाडली आहे.

अनंतमूर्ती हे कुवेंपु (कुप्पलि वेंकटप्प पुट्टप्प) आणि शिवराम कारंथ या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित यशस्वी साहित्यिकांनी निर्माण केलेल्या आधुनिक कन्नड साहित्याच्या महान परंपरेचे खरे उत्तराधिकारी होते. आधुनिक कन्नड साहित्याची गौरवशाली परंपरा निर्माण करण्यासंबंधी दोन परस्पर विरोधी मते आहेत. जसे वैज्ञानिक बुद्धिवाद आणि रहस्यात्मक अंत:प्रज्ञावाद, आक्रमक अतिवाद आणि मानवतावादी रूढीवाद. गंमतीची गोष्ट अशी की, विरोधी दृष्टीकोन एकाच लेखकाच्या सृजनात्मक आयुष्यामध्ये आपल्याला पहायला मिळतात. आणि हेच एक मोठ्या परंपरेचे सार देखील आहे. पण आश्च्यर्याची गोष्ट अशी की, कोणत्याही परमतत्वावर विश्वास न ठेवणाऱ्या अनंतमूर्ती यांनी या परंपरेचे कवच त्याच्या सगळ्या गुणदोषांसहित धारण केलेले होते. त्यांचा संपूर्ण सृजनात्मक प्रवास एका रागीट विद्रोही तरूणापासून सुरु होऊन, पारंपरिक रुढींनी युक्त अशा मानवतावादी लेखकापर्यंतचा महान रचनात्मक प्रवास होता.

रवींद्र भारती विश्वविद्यालय कोलकाता यांच्याकडून डी. लीट. या मानद उपाधीने सन्मानित (१९९५), पद्मभूषण (१९९८), १९७४ ते ९३ या कालावधीतील भारतीय साहित्यातील योगदानासाठी साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

१९३२ : भारतीय लेखक , समीक्षक यु एन अनंतमूर्ती यांचा जन्म ( मृत्यू : २२ ऑगस्ट, २०१४ )

  • घटना :
    १९०९ : अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला
    १९१३ : ऑर्थर वेन यांनी तयार केलेले जगातील पहिले शब्द कोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रसिद्ध झाले
    १९६५ : विच्छा माझी पुरी करा ह्या नाटकाचा पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ झाला.

• मृत्यू :

• १९७९ : चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक , संत साहित्याचे अभ्यासक, लेखक नरहर रघुनाथ तथा न.र. फाटक यांचे निधन ( जन्म : १५ एप्रिल, १८९३ )
१९९३ : स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार मल्हार रघुनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी यांचे निधन
१९९७ : सनई वादक पं प्रभाशंकर गायकवाड यांचे निधन.

  • जन्म :
    १९०३ : प्लॅस्टिक व नॉयलॉन उद्योगाचे जनक “पद्मभूषण भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा जन्म ( मृत्यू : २ नोव्हेंबर, १९९०)
    १९२१ : भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी एन भगवती यांचा जन्म
    १९५९ : भारतीय क्रिकेट पटू के श्रीकांत यांचा जन्म
    १९६३ : हिंदी अभिनेता गोविंदा यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »