नाशिकमध्ये साखर कारखान्यांचा बंदला पाठिंबा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नाशिक : जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस बंद आंदोलन करण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्यातील कादवा व वसाका या साखर कारखान्यांनी या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा देऊन दोन दिवस ऊस तोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडी न घेतल्यामुळे नाशिकचे साखर कारखाने ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांना ऊसाच्या मिळणाऱ्या पैशाचे तुकडे करण्याचा घाट केंद्र आणि राज्य सरकार यांनी संगनमताने घातला असल्याचा आरोप शेतकरी संघटना करीत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »