इथेनॉलसाठी उसाचा वापर सुरूच राहणार : अन्न सचिव

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वापर करण्याचे धोरण कायम राहणार आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे, मात्र त्याचा परिणाम इथेनॉलवर होणार नाही, असा खुलासा केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रो यांनी केला आहे.

CNBC-TV18 शी बोलताना चोप्रा म्हणाले, ’पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट भारताला गाठायचे आहे. त्यासाठी उसापासून इथेनॉल उत्पादन यापुढेही सुरूच राहील. गेल्या वर्षभराचा विचार करता, साखरेच्या दरात ५.५ टक्के वाढ झाली आहे. मात्र एकंदरित साखर पुरवठ्यावर काहीही परिणाम झालेला नाही. देशात पुरेसा साखर साठा आहे. त्यामुळे उसापासून इथेनॉल उत्पादन करण्याचे धोरण सुरूच राहील.’

‘देशाला गरज असलेल्या इथेनॉलपैकी ५० टक्के गरज उसापासूनच भागवण्यात येईल, तर उर्वरित ५० टक्क्यांसाठी मका आणि खराब धान्यांचा वापर केला जाईल.
खाद्य तेलाची जादा दराने आयात करूनही, किरकोळ विक्री दरांमध्ये वाढ झालेली नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »