संत गाडगे महाराज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, डिसेंबर २०, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २९, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०७ सूर्यास्त : १८:०६
चंद्रोदय : २२:५४ चंद्रास्त : ११:१०
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – १०:४८ पर्यंत
नक्षत्र : मघा – ०३:४७, डिसेंबर २१ पर्यंत
योग : विष्कम्भ – १८:१२ पर्यंत
करण : तैतिल – १०:४८ पर्यंत
द्वितीय करण : गर – २३:२९ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : ११:१४ ते १२:३६
गुलिक काल : ०८:२९ ते ०९:५२
यमगण्ड : १५:२१ ते १६:४३
अभिजितमुहूर्त : १२:१४ ते १२:५८
दुर्मुहूर्त : ०९:१९ ते १०:०३
दुर्मुहूर्त : १२:५८ ते १३:४२
अमृत काल : ०१:१२, डिसेंबर २१ ते ०२:५५, डिसेंबर २१
वर्ज्य : १४:५३ ते १६:३६

एकात्मतेच्या संकल्पनेने संस्थेच्या जन्मापासून संयुक्त राष्ट्रांच्या कार्याचे वर्णन केले आहे. शांती, मानवाधिकार आणि सामाजिक आणि आर्थिक विकासास प्रोत्साहन देण्यासाठी युनायटेड नेशन्सच्या निर्मितीने जगातील लोक आणि राष्ट्रांना एकत्र आणले. “आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी” त्याच्या संघटनेच्या एकतेवर अवलंबून असणाऱ्या सामूहिक सुरक्षेच्या संकल्पनेत व्यक्त केलेल्या सदस्यांमधील संघटनेमधील एकतेच्या मूलभूत आधारावर संस्थेची स्थापना केली गेली. एकात्मतेच्या भावनेने ही संस्था “आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा मानवीय पात्रतेच्या आंतरराष्ट्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी सहकार्य” यावर अवलंबून आहे.

२२ डिसेंबर २००५ रोजी महासभेने ६०/२०९ संकल्पनेद्वारे एकसमान आणि सार्वभौमिक मूल्यांकडे एकनिष्ठा म्हणून ओळखले ज्याने २० व्या शतकात लोकांमध्ये संबंध निर्माण केले पाहिजे आणि त्या संदर्भात प्रत्येक वर्षी २० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस जाहीर करण्याचे ठरविले.

आज जागतिक आंतरराष्ट्रीय मानवता दिन आहे.

“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“
संत गाडगे महाराज – १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.
‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.

‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही.
आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात‘
आज महाराष्ट्रात सरकारी पातळीवर संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते.

१९५६ : थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक.संत गाडगेबाबा यांचे निधन.

‘शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा……’

  • लेखक दगडू मारुती तथा दया पवार

‘कोंडवाडा’चा अर्थ परिसरातील अशी एखादी बंदिस्त जागा जिथे त्या भागातील भटकी वा बेवारस जनावरे आणून कोंडली जातात. कवितेचं हे शीर्षकच विषयाची कल्पना देऊन जातं.कवी दया पवार यांची ‘कोंडवाडा’ या नावाने असणारया काव्यसंग्रहातील ही कविता आहे. कवितालेखनाच्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि सद्य सामाजिक स्थिती यात बराच फरक पडला असला मानसिकता मात्र अजूनही तिथेच घुटमळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे साठ वर्षांपूर्वी जो विषाद कवीच्या मनी दाटून आला आज तो तितक्या तीव्रतेने दाटून येत नसला तरी ती प्रक्रिया थांबलेलीही नाही हे ही खरेच आहे. जातीधर्माच्या शृंखला तोडून आम्ही अजून एकमेकांना कवेत घेतलेले नाही हेच खरे.

जेंव्हा आपण कैदेत असतो तेंव्हा आपली कामे आपल्यालाच करावी लागतात त्यात कोणी मदत नाही. मात्र हीच कैद जातीयतेच्या पोलादी भिंतीआडची असेल तेंव्हाची वागणूक अधिक क्लेशदायक असते. इतकी की आपल्याला अस्पृश्य ठरवले जाते, आपल्याला कुणी स्पर्श करत नाही अन आपण स्पर्श केलेली चीजवस्तू देखील अस्पृश्य ठरवली जाते. आपलं नशीब आपल्यालाच बुलंद करावं लागतं, जग आपल्याला हसत असतं अन आपण परत परत पडत उठून उभं रहायचं असतं. जबरदस्त रूपक इथं पवारांनी वापरली आहेत- ‘कैद्यासारखी ताटवाटी आपणच आपली लखलखीत करावी !” पवारांच्या प्रतिभाशक्तीला फुटलेले हे धुमारे वाचकाला बेचैन करतात.

पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाचे पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.

पवार यांना पद्मश्री पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरवले आहे.

१९९६ : ‘बलुतं’कार, दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार यांचे निधन ( जन्म : १५ सप्टेंबर, १९३५ )

  • घटना :
    १९२४ : अडॉल्फ हिटलर यांची लॅंडस्बर्ग तुरुंगातून सुटका
    १९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी फोजांनी कलकत्ता शहरावर बॉम्ब वर्षाव केला
    १९४५ : मुंबई – बेंगलोर प्रवासी विमान सेवेस सुरवात
    १९७१ : झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष झाले
    १९९९ : पोर्तुगालने मकाऊ हे बेत चीनला परत केले.
  • मृत्यू :

१७३१ : बुंदेलखंडाचे महाराजा छत्रसाल बुंदेल यांचे निधन ( जन्म : ४ मे, १६४९ )
१९१५ : भारतीय चित्रकार व संगीतकार उपेंद्र किशोर रे यांचे निधन ( जन्म : १२ मे, १८६३ )
१९३३ : संस्कृत विद्वान, भाषांतकार व शास्त्र सुधारक विष्णू वामन बापट यांचे निधन (जन्म : २२ मे, १८७१ )
१९९३ : जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण भट यांचे निधन
१९९८ : जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरु वेंकट तथा बी व्ही रमण यांचे निधन ( जन्म : ८ ऑगस्ट, १९१२ )
२०१० : अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे निधन ( जन्म : १८ फेब्रुवारी, १९२६ )
२०१० : लेखक सुभाष भेंडे यांचे निधन ( जन्म : १४ ऑक्टोबर, १९३६ )

  • जन्म :

१९०९ : भारतीय पत्रकार व राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म ( मृत्यू : १० जुलै, २००० )
१९४० : पद्म विभूषण पुरस्कार मिळवलेल्या भारत नाट्यम व कथ्यक नर्तिका यामिनी कृष्ण मूर्ती यांचा जन्म
१९४५ : भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म ( मृत्यू : २६ जुलै, २०१० )

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »