सरोजिनी बाबर

आज मंगळवार, जानेवारी ७, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १७ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१६
चंद्रोदय : १२:३१ चंद्रास्त : ०१:३०, जानेवारी ०८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – १६:२६ पर्यंत
नक्षत्र : रेवती – १७:५० पर्यंत
योग : शिव – २३:१६ पर्यंत
करण : बव – १६:२६ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०३:२६, जानेवारी ०८ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : मीन – १७:५० पर्यंत
राहुकाल : १५:३१ ते १६:५३
गुलिक काल : १२:४५ ते १४:०८
यमगण्ड : ०९:५९ ते ११:२२
अभिजितमुहूर्त : १२:२३ ते १३:०७
दुर्मुहूर्त : ०९:२६ ते १०:१०
दुर्मुहूर्त : २३:२७ ते ००:१९, जानेवारी ०८
अमृत काल : १५:३३ ते १७:०४
महाराष्ट्राच्या अक्का' डॉ.सरोजिनी बाबर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोकसाहित्य आणि लोकशिक्षण यासाठीच आपुले आयुष्य वाहून घेणार्या , या विषयांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या महाराष्ट्राच्या
अक्का’!
मनुष्याच्या मनात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून असतो असे म्हणतात, त्याचप्रमाणे समाजाचा अभ्यास करायचा झाल्यास त्यांच्या संस्कृतीतून जावे लागते. विज्ञान, तंत्रज्ञान यामुळे मनुष्याच्या भौतिक सुखात वाढ होते. परंतु मानवी जीवन हे कल्पना, भावना, विचार याआधारेच प्रवाहीत होत असते. त्यामुळे लोकसंस्कृती, लोकमानस, लोकसाहित्य हेच समाजाचे (लोकांचे) अंतरंग असते, हेच वर्तमान असते. हे समाजमर्म सरोजिनी बाबर यांना उमगले होते. म्हणूनच समाज व समाजाच्या संस्कृतीकरणात त्या अधिक रमल्या.
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वांगणी या लहानशा खेड्यात सरोजिनी बाबर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव बाबर हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व. त्यांच्याकडूनच लोकशिक्षणाचे बाळकडू त्यांना मिळाले. विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कॉन्ट्रिब्युशन ऑफ विमेन रायटर्स टू मराठी लिटरेचर हा विषय घेऊन डॉक्टरेट मिळवली.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत सरोजिनी बाबर यांनी धडाडीने भाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९५२ ते १९५७ मध्ये मुंबई प्रांत विधानसभा सदस्य, १९६४ ते १९६६ महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि १९६८ ते १९७४ राज्यसभा सदस्य या सर्व पदांवर त्यांनी काम केले. आपला राजकीय प्रवास चालू असतानाच त्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती च्या अध्यक्षा झाल्या. येथूनच त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास अधिक फुलला व त्यातच पुढे त्या अधिक रममाण झाल्या.
लोकसाहित्याचे संशोधन, संकलन, संपादन, संबंधित लेखनास प्रोत्साहन या गोष्टींवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्रभर फिरून कानाकोपर्यातून लोकसंस्कृती बाबतच्या माहितीचे संकलन त्यांनी केले. अनेक अभ्यासक, संशोधक आणि संगहकांना एकत्रित केले. हे सर्व साहित्य, माहिती महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य माला या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली.
सरोजिनी बाबर या स्वत: अतिशय बुद्धिमान होत्या. मराठी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक ओव्या, गाणी, अपौरूषेय वाङ्मय त्यांना मुखोद्गत होते. त्या स्वत:च एक चालता फिरता लोकसंस्कृती कोष होत्या. त्यांच्या प्रेमळ व आपुलकीच्या स्वभावामुळे लवकरच त्या अनेक स्तरांतील, क्षेत्रांतील लोकांसाठी जवळच्या झाल्या. त्यांना अवघा महाराष्ट्र `अक्का’ या नावानेच संबोधू लागला. प्रेमळ स्वभाव, गोड व स्निग्ध आवाज, पवित्र व्यक्तिमत्त्व; याबरोबरच त्या अतिशय शिस्तप्रिय होत्या. त्यांच्या कामातूनच हे सर्व गुण दिसून येत होते. घरातल्या थोरल्या बहिणीप्रमाणेच त्यांनी अनेक अभ्यासकांना लोकसंस्कृती, लोकसाहित्य या विषयातील अभ्यासासाठी प्रवृत्त केले. अनेक व्यक्तिमत्त्वे घडवली, अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांचे अक्का (थोरली बहीण) हे नाव सार्थ ठरले.
लोकसाहित्य हाच त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे लोकसाहित्यातील सहजता, जिव्हाळा, आपलेपणा, भावुकता, काव्यात्मकता, मातीशी एकरूपता हे सर्व गुणविशेष त्यांच्या लिखाणात बघायला मिळतात. असा माणुसकीचा सुगंध असणारे लिखाण खूप कमी लोकांना जमते, जे त्यांना नैसर्गिकरीत्या अवगत होते.
साने गुरुजींनंतर लोकसंस्कृतीचा वसा चालवणार्या या थोर अक्कांना आदरयुक्त प्रेमाचा प्रणाम !
त्यांना पुरस्कार व सन्मान :राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा – गौरववृत्ती पुरस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली – डी. लिट. अशा अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले.
१९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००८)
जानकी देवी बजाज स्वातंत्र्यवादी कार्यकर्त्या होत्या. मध्य प्रदेशातील जौरा येथे वैष्णव मारवाडी कुटुंबात झाला . आठ वर्षांच्या वयात त्यांनी अग्रगण्य उद्योजक जमनालाल बजाजशी विवाह केला.
१९२६ मध्ये बजाज ग्रुपची स्थापना केली आणि महात्मा गांधी यांचे जवळचे सहयोगी. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याबरोबरच, १९२८ मध्ये त्यांनी महिलांना उत्थान, गोसेवा आणि हरिजनांच्या जीवनातील सुधारणा आणि त्यांच्या मंदिराच्या प्रवेशासाठी काम केले. त्यांनी भुदन आंदोलनावर विनोबा भावे यांच्यासोबत काम केले. त्यांनी अखिल भारतीय गोसेवा संघाचे अध्यक्ष म्हणून काम केले.
जानकी देवी बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, जानकी देवी बजाज शासकीय पीजी गर्ल्स कॉलेज कोटा आणि बजाज इलेक्ट्रिकल्स द्वारा स्थापित ‘जंकदेवी बजाज ग्राम विकास संस्था’ यांच्या समावेशासह अनेक शैक्षणिक संस्था आणि पुरस्कार त्यांच्या स्मृतीत उभारल्या आहेत. इंडियन मर्चंट्स चेंबरच्या लेडीज विंगने १९९२-९३ मध्ये ग्रामीण उद्योजकांसाठी आयएमसी-लेडीज विंग जानकीदेवी बजाज पुरस्कार सुरू केला.
१८९३: पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे, १९७९)
- घटना :
१६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.
१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
१९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमीचे (INSA) उद्घाटन झाले.
१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
१९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
१९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.
मृत्यू :
२०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन. ( जन्म : ८ नोव्हेंबर, १९१९ )
- जन्म :
१९२१: दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्य दलाला मदत करणारे अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २० जून २००८)
१९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.
१९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.
१९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.