मोहम्मद रफी

आज मंगळवार, डिसेंबर २४, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ३, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:०८
चंद्रोदय : ०२:०६, डिसेंबर २५ चंद्रास्त : १३:१८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : नवमी – १९:५२ पर्यंत
नक्षत्र : हस्त – १२:१७ पर्यंत
योग : शोभन – २०:५४ पर्यंत
करण : गर – १९:५२ पर्यंत
द्वितीय करणवणिज – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कन्या – ०१:५१, डिसेंबर २५ पर्यंत
राहुकाल : १५:२३ ते १६:४५
गुलिक काल : १२:३८ ते १४:०१
यमगण्ड : ०९:५४ ते ११:१६
अभिजितमुहूर्त : १२:१६ ते १३:००
दुर्मुहूर्त : ०९:२१ ते १०:०४
दुर्मुहूर्त : २३:२० ते ००:१२, डिसेंबर २५
वर्ज्य : २१:१९ ते २३:०७
आज भारतीय ग्राहक दिन आहे.
ये मेरा प्रेमपत्र पढ़कर तुम नाराज ना होना, बाबूल की दुआएँ लेती जा,जा तुझको सुखी संसार मिले, बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है, कोई सागर दिल को बहलाता नहीं बेखुदी में भी करार आता नहीं, अशी एका हुन एक गाणी लोकप्रिय करणारे – – –
जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा मोहम्मद रफी यांचा पहिल्या पत्नीने पाकिस्तानला जायचा निर्णय घेतला. पण आपल्या संगीताच्या प्रेमाखातर मोहम्मद रफी भारतातच राहायचा निर्णय घेतला. त्यानंतर आपल्या पहिल्या पत्नीपासून मोहम्मद रफी वेगळे झाले आणि त्यांची पहिली पत्नी पाकिस्तानात निघून गेली.
मोहम्मद रफी हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्याय आणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते.
मोहम्मद रफी स्वभावानेही पार दयाळू होते. एकदा पैसे नसल्यामुळे आपल्या कॉलनीत राहणाऱ्या एका विधवेला त्यांनी संघर्ष करताना पाहिलं. त्यानंतर दरमहा अज्ञात व्यक्तीच्या नावाने ते तिला पोस्टाने पैसे पाठवत होते.
मोहम्मद रफी यांचे संगीतावर प्रचंड प्रेम होतं आणि गाण्याला ते कधीही पैशात तोलत नसत. जेव्हा लता मंगेशकरसह अनेकांनी त्यांना त्यांचं मानधन वाढवायला सांगितलं तेव्हा ते नाराज झाले आणि लता मंगेशकरसोबत पुन्हा गाणं न गायचा निर्णय त्यांनी घेतला.
आपल्या गाण्यांनी साऱ्या देशाला वेड लावणाऱ्या 36 वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये मोहम्मद रफींनी 6 फिल्मफेअर, एक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री असे मानाचे पुरस्कार मिळवले.
१९२४ : पार्श्व गायक मोहम्मद रफी यांचा जन्म ( मृत्यू : ३१ जुलै, १९८० )
असमिया कवयित्री नलिनीबाला देवी – आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बरपेटा ह्या गावी त्यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील प्रमुख असमिया नेते नवीनचंद्र बर्दोलोई हे त्यांचे वडील होत ते कवीही होते. नलिनीबाला देवींचे शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. वडिलांकडून त्यांना देशभक्तीचा व कवित्वाचा वारसा मिळाला.
संधियार सूर (१९२८, म. शी. संध्यासंगीत) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर सपोनार सूर (१९४७, म. शी. स्वप्नसंगीत), स्मृतितीर्थ (१९४८), पारसमणि (१९५७), अलकनंदा (१९५७) असे त्यांचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.
नलिनीबाला देवींना दुर्दैवाने अकाली वैधव्य आले त्याची छाया त्यांच्या जीवनावर कायमची पडली. तथापि गीता, उपनिषदे, आसाममधील वैष्णव संतांचे साहित्य ह्यांच्या वाचनातून मानसिक समाधान मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि साहित्य ह्यांकडेही त्या ओढल्या गेल्या. ह्या सर्वांचा प्रभाव त्यांच्या कवितेवर जाणवतो.
जीवनातील व्यथा-वेदनांचा खोल ठसा त्यांच्या कवितेवर उमटलेला आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मीलन घडवून आणण्याची तीव्र इच्छा, गूढगुंजनाची ओढ आणि निसर्गातील यच्चयावत वस्तूंमधील चिरंतन सौंदर्याची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते. काही उत्कट देशभक्तिपर कविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत. ‘भारती’, ‘रवींद्र तर्पण’, ‘जन्मभूमी’ ह्या अशा काही कविता होत. स्वर्गापेक्षाही महान असलेल्या मातृभूमीची सेवा आपणास मृत्युनंतरही करता यावी, अशी इच्छा त्यांनी ‘जन्मभूमी’ ह्या कवितेत व्यक्त केली आहे. अलकनंदा ह्या त्यांच्या काव्यसंग्रहास साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला (१९६८).
नलिनीबाला देवींनी आपल्या वडिलांचे एक चरित्रही लिहिले आहे. आसाम साहित्य सभेच्या तेविसाव्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या . भारत सरकारने १९५७ साली ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. गौहाती येथे त्यांचे निधन झाले.
१९७७ : ‘पद्मश्री’ पुरस्कार सन्मानित आसामी कवियत्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन ( जन्म : २३ मार्च,१८९८ )
- घटना :
१७७७ : कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरीतीमी बेटांचा शोध लावला
१९०६ : रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कविता वाचन, व्हॉयोलिन वादन व भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले
१९१० : स्वा. सावरकर यांना जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली
१९२४ : अल्बेनिया देशाला स्वान्त्र्य मिळाले
१९५१ : लिबिया देश ईटली कडून स्वतंत्र झाला
१९७९ : सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केले
१९९९ : काठमांडू येथून नवी दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाईन चे विमान – फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांकडून अपहरण झाले व ते विमान कंदहार येथे नेले.
• मृत्यू :
१९७३ : स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक, पेरियार ई . व्ही . रामस्वामी यांचे निधन (जन्म : १७ सप्टेंबर, १८७९ )
१९८७ : अभिनेते व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांचे निधन ( जन्म : १७ जानेवारी, १९१७ )
१९८८ : भारतीय लेखक, जैनेंद्र कुमार यांचे निधन ( जन्म : २ जानेवारी, १९०५ )
२००५ : तामिळ व तेलगू चित्रपट अभिनेत्री , दिग्दर्शक, निर्माती, गीतकार , संगीतकार , गायिका व लेखिका भानुमती रामकृष्ण यांचे निधन ( जन्म : ७ सप्टेंबर, १९२४ )
- जन्म :
१८६४: ओडिया लेखक, संपादक, व समाज सुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म ( मृत्यू : १९ ऑक्टोबर, १९३४ )
१८८० : स्वातंत्र्य सैनिक, इतिहासकार, काँग्रेसचे नेते डॉ भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म ( मृत्यू : १७ डिसेंबर, १९५९ )
१८९९ : नामवंत साहित्यिक, बाल साहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक, पांडुरंग सदाशिव उर्फ साने गुरुजी यांचा जन्म ( मृत्यू : ११ जून, १९५० )
१९४२ : भारतीय अभिनेते, नाटककार व दिग्दर्शक इंद्र बानिया यांचा जन्म ( मृत्यू : २५ मार्च, २०१५ )
१९५९ : हिंदी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.