अगस्ती कारखाना बंद पडू देणार नाही : अध्यक्ष गायकर यांची ग्वाही

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अफवा न पसरवण्याचे आवाहन, वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अहिल्यादेवी नगर : चालू हंगामात बाहेरील (गेटकेनचा) अडीच लाख मेट्रिक टन व कार्यक्षेत्रातील २ लाख मेट्रिक टन अशा एकूण साडेचार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप अगस्ति सहकारी साखर कारखाना करेल. कारखान्यासाठी सरकार दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि कारखाना बंद पडू न देता नियमित सुरू ठेवण्यात येईल, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी यांनी दिली.

अकोलेतील अगस्तिनगर येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत पार पडली. या सभेत राज्यपाल नियुक्त कोट्यातून श्री. गायकर यांची राष्ट्रवादीच्या (अजितदादा गट) कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावी, असा ठराव टाळ्यांचा कडकडाटात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

सभेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह उपस्थितीत संचालक व पदाधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण केले व अभिवादन करून सभेची सुरुवात झाली. अहवाल वर्षात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणार्‍या १२ ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेतील विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सविस्तर विचार विनिमय झाल्यावर सभासदांनी मंजुरी दिली.

अध्यक्ष गायकर म्हणाले, आपल्या पुढे आव्हान आहे. मात्र,अडचणीत मार्ग काढावा लागतो. पुढील तीन वर्षांत इथेनॉल प्रकल्प संपूर्ण कर्जमुक्त होईल, तसेच या राज्य सरकारकडून अडचणीतील साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेमार्फत ७५ कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज मिळवले आहे.

आम्ही अगस्तीसाठी अनेक ठिकाणी कर्जासाठी गेल्यावर त्यांना कारखाना बंद पडणार आहे, त्यांना कर्ज देऊ नका असा फोन करण्याच्या घटनाही काही हितशत्रूंकडून घडत आहेत. आम्ही काम करताना चुकलो असेल, तर आमचे कान धरा. मात्र कारखान्याबाबत बदनामीकारक अफवा पसरवू नका, अशी विनंती अध्यक्ष गायकर यांनी केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »