साखर उत्पादन ११ लाख टनांनी घसरले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राज्यात आतापर्यंत ६० लाख टन साखर उत्पादन

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 05 फेब्रुवारी अखेरपर्यंत दोनशे साखर कारखाने सुरू असून, 660.41 लाख टन उस गाळप करताना आतापर्यंत 60.22 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.
राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा आतापर्यंत 9.12 टक्के इतका आहे. राज्यात एकूण 14 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम आवरला आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली.

मागील वर्षी याच काळात 741.13 लाख टन उसाचे गाळप करून 717.56 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले होते.राज्याचा एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे 9.68 टक्के इतका होता. एकूण 7 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता. गत हंगामापेक्षा यंदा साखर उत्पादन सुमारे ११ लाख टनांनी घसरल्याचे दिसते.

कोल्हापूर विभागात 40 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 26 सहकारी आणि 14 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 161.33 लाख टन उसाचे गाळप केले असून, 173.86 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक 10.78 टक्के साखर उतारा आहे.

पुणे विभागात 154.47 लाख टन उसाचे गाळप झाले असून सरासरी साखर उत्पादन 141.68 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 09.17 टक्के आहे. विभागात 31 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे.

सोलापुर विभागात 45 कारखाने कार्यरत असून यामध्ये 17 सहकारी आणि 28 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 114.11 लाख टन उसाचे गाळप करून 90.26 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा 7.91 टक्के आहे. विभागातील 12 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.

अहिल्यानगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खाजगी आहेत. या कारखान्यांनी 84.71 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 72.36 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.54 टक्के आहे.

नांदेड विभागात 10 सहकारी आणि 19 खाजगी अशा एकूण 29 कारखान्यांनी 74.9 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.34 टक्के साखर उताऱ्यासह 69.92 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील 2 साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 13 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. 61.5 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 46.69 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा उतारा 7.59 टक्के आहे.

अमरावती विभागात चार साखर कारखान्यांनी काम सुरू केले असून त्यात एक सहकारी आणि तीन खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 7.41 लाख टन उसाचे गाळप केले असून, 6.39 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.62 टक्के आहे.

नागपूर विभागात 3 खासगी कारखाने सुरु असून त्यांनी 1.98 लाख टन उसाचे गाळप करून 1.03 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.2 टक्के इतका आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »