श्री दत्त इंडियाचा ३१०० दर
सातारा : फलटण येथील श्रीदत्त इंडिया साखर कारखाना २०२३-२४ हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३१०० रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली.
चार वर्षापासून श्री दत्त इंडिया साखर कारखाना आपल्या अचूक वजन काटा व चोख पेमेंट मुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे व अल्पावधीत शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला आहे चालू हंगामामध्ये कारखाना प्रशासनाने १० लाख मेट्रिक टन उद्दिष्ट ठेवले असून फलटण तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे