प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, नोव्हेंबर २९, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ८, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५४ सूर्यास्त : १७:५९
चंद्रोदय : ०५:५७, नोव्हेंबर ३० चंद्रास्त : १६:२९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – ०८:३९ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – १०:१८ पर्यंत
योग : शोभन – १६:३४ पर्यंत
करण : वणिज – ०८:३९ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २१:३८ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : तूळ – ०६:०३, नोव्हेंबर ३० पर्यंत
राहुकाल : ११:०४ ते १२:२७
गुलिक काल : ०८:१८ ते ०९:४१
यमगण्ड : १५:१३ ते १६:३६
अभिजितमुहूर्त : १२:०५ ते १२:४९
दुर्मुहूर्त : ०९:०७ ते ०९:५२
दुर्मुहूर्त : १२:४९ ते १३:३३
अमृत काल : ०२:५६, नोव्हेंबर ३० ते ०४:४२, नोव्हेंबर ३०
वर्ज्य : १६:२६ ते १८:११

कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे – एक मराठी कवी आणि विद्वान. जन्म सांगली जिल्ह्यातील माहुली ह्या गावी. शिक्षण कोल्हापूर आणि मुंबई येथे. मुंबई विद्यापीठाचे पदवीधर . पुढे मुख्याध्यापक म्हणून कराची, कोल्हापूर, पुणे येथे नोकरी. काही काळ मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणुन कार्यरत होते.

अहमदाबाद येथील एका महाविद्यालयाचे काही काळ प्राचार्य. राजा शिवाजी (१८६९) ह्या काव्याने त्यांचे नाव विशेष गाजले. इंग्रजी साहित्यातील हिरोइक एपिक म्हणजे वीररसप्रधान महाकाव्य मराठीत आणण्याचा हा पहिला प्रयत्न होता. त्यांच्या ह्या काव्याच्या इंग्रजी प्रस्तावनेमधील काव्यविषयक विचारसरणी महत्त्वाची आहे. आपल्या काव्यात त्यांनी नित्याच्या व्यवहारातील भाषा आवर्जून वापरली आहे. आधुनिक मराठी काव्याच्या द्दष्टीने हा प्रयोग क्रांतिकारक होता. राजाराम महाराज छत्रपति (१८७०), मन नावाची कविता (१८७२) ही त्यांची इतर काव्यरचना. त्यांनी इंग्रजी काव्यरचनाही केली, उदा., ऋषि (१८७८) आणि फॅमिश्ड व्हिलेज. इटलीच्या विद्वत्परिषदेने घेतलेल्या स्पर्धेसाठी व्हिसिसिट्यूड्स ऑफ आर्यन सिव्हिलिझेशन इन इंडिया हा प्रबंध पाठवून त्यांनी पारितोषिक मिळविले. कवित्वापेक्षा त्यांचे विद्वत्व श्रेष्ठ दर्जाचे होते, ह्याची साक्ष ह्या ग्रंथावरून पटते. षड्दर्शनचिंतनिका हे मासिक काढून (१८७७) इंग्रजी-मराठीतून त्यांनी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला.

१८३५ : कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. ( मृत्यू : ८ ऑक्टोबर, १८८८)

भाऊराव देवरस संघ समर्पित जीवन : संघ कार्यात सुरवातीच्या काळात ज्या दोन भावंडांनी आजन्म वाहून घेतले त्यामध्ये देवरस बंधू ही एक जोडी होय. १९२७ मध्ये संघ कार्याशी मुरलीधर दत्तात्रय तथा भाऊराव देवरस यांचा संपर्क झाला आणि जीवन संघमय झाले. संघकार्याचा विस्तार उत्तरप्रदेशात करण्याची योजना आखुन शिक्षण लखनौ विद्यापीठातुन एम . ए . व एलएलबी ( प्राविण्य – सुवर्णपदक ) त्यानंतर तेथे शिष्यवृत्ती मिळवून आयसीएस होण्याची संधी असताना ” संघ कार्य हीच जीवन गाथा ” ही खूणगाठ मनाशी पक्की होती.

तेथे स्टुडण्टस युनियनचे नेतृत्व सुद्धा केले. १९४६ मध्ये ‘राष्ट्रधर्म प्रकाशन’ सुरु केले. त्याचा प्रभाव म्हणुन १९४६—४७ मध्ये एका वर्षात काशीतून ८० हुन आधिक प्रचारक संघकार्यासाठी बाहेर पडले. पं. दिनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, प्रा रज्जुभैय्या, अशोकजी सिंघल, मुरली मनोहर जोशी, यांच्या सारख्या अगणित कार्यकर्त्यांना घडविण्यात मोठा वाटा. उत्तर प्रदेशात अनेक मात्तबार काॅंग्रेस नेत्यांशी स्नेहपुर्ण संबंध प्रस्थापित केले. उत्तर प्रदेशात शिशुमंदिराच्या कार्याला प्रारंभ झाला.

१९७१ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात सैन्यदलाला मदत करण्यासाठी योजना राबवली. आणिबाणीत भुमिगत राहुन सुत्र संचालन केले. २४ नोव्हेंबर १९८६ ( गुरुनानक जयंती ) मध्ये ” राष्ट्रीय सिक्ख संगत” ची स्थापना केली.
१९१७ : रा. स्व. संघाचे ज्येष्ठय प्रचारक मुरलीधर दत्तात्रय तथा भाऊराव देवरस यांचा जन्म ( मृत्यू : १३ मे , १९९२ )

  • घटना :
    १८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
    १९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.
    १९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.
    १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.
    २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.
    २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

• मृत्यू :
• १९२६: ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी, १८५३ )
• १९३९: मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी, १८९४)
• १९५०: महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे निधन.
• १९५९: मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन. (जन्म: १७ मे , १८६५)
• १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (जन्म: २९ जुलै, १९०४)
• २०११: आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचे निधन. ( जन्म : १४ नोव्हेंबर, १९४२ )
• उद्योजक विक्रम किर्लोस्कर – टोयोटा किर्लोस्कर ही मोटार उत्पादक कंपनी बंगळूरुमध्ये उभारली आणि त्यानंतर देशातील वाहन उद्योगात, त्यांच्या नावाला महत्त्व प्राप्त झाले.
२०२२ : उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं वयाच्या ६४ व्या वर्षी निधन

  • जन्म :

१८६९: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी, १९५१)
१९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून, २०००)
१९०८: तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.
१९२६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर, १९९६)
१९६३: भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »