संत कबीर जयंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, जून ११, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक २१ , शके १९४७
सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१६
चंद्रोदय : १९:३३ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – १३:१३ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – २०:१० पर्यंत
योग : साध्य – १४:०४ पर्यंत
करण : बव – १३:१३ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०१:५३, जून १२ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : वृश्चिक – २०:१० पर्यंत
राहुकाल : १२:३८ ते १४:१८
गुलिक काल : १०:५९ ते १२:३८
यमगण्ड : ०७:४० ते ०९:१९
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१२ ते १३:०५
अमृत काल : १०:३५ ते १२:२०
वर्ज्य : ०४:४६, जून १२ ते ०६:२९, जून १२

कबीर आप ठगाइये और न ठगिये कोय।
आप ठग्या सुख उपजै और ठग्या दु:ख होय।।

चोरी, लबाडीपासून दूर राहण्याचा उपदेश करताना संत कबीर सांगतात की, दुस-याला लुटण्यापेक्षा स्वत: लुटले गेलेले बरे. कारण दुस-याला लुटले तर नक्कीच त्याचे रूपांतर दु:खात होणार।

आज संत कबीर जयंती आहे.

क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल – हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक तर होतेच पण एक देशभक्त कवीसुद्धा होते. त्यांनी हिंदी व उर्दू भाषेत राम, अज्ञात, बिस्मिल या टोपणनावाने लिखाण केले. त्यात “बिस्मिल” हे टोपणनाव सर्वात लोकप्रिय आहे. बिस्मिल क्रांतिकारक संघटना हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते.त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे ब्रिटीश सरकारने १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फाशी दिली.

१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म. ( बलिदान दिन : १९ डिसेंबर, १९२७ )

बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।

— साने गुरुजीकृत काव्यपंक्ती

जन्माआधी वैभवसंपन्न व श्रीमंत असे खोतांचे घराणे पण घसरणीमुळे जप्ती आलेल्या घरात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. अशा परिस्थितीत त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला.

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. व पुढे त्या कादंबरीवर चित्रपट सुद्धा तयार झाला.

मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे ‘मोरी गाय’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला.

‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते.
त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील अनेक थोर व्यक्तित्वे घडविली. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधु दंडवते, ग. प्र. प्रधान, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र. द. पुराणिक, वा. रा. सोनार, सी. एन. वाणी, शांतीलाल पटणी, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर, रा. ग. जाधव, दादा गुजर इ. प्रभुतींवर साने गुरुजींच्या जीवनाचा आदर्शाचा मोठा प्रभाव होता.

• १९५०: बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर, १८९९)

  • घटना :
    १६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
    १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
    १८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
    १९३५: एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
    १९७०: अॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
    १९९७: सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
    १९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.
    २००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
    २००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

• मृत्यू:

• १९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट , १८५८)
१९८३: पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल, १८९४)
• २०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी, १९४५)

  • जन्म :
    १९४८: बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »