श्री दत्त जयंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, डिसेंबर १४, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २३, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:०३
चंद्रोदय : १६:५९ चंद्रास्त : ०६:५६, डिसेंबर १५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्दशी – १६:५८ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – ०३:५४, डिसेंबर १५ पर्यंत
योग : सिद्ध – ०८:२७ पर्यंत
क्षय योग : साध्य – ०५:०७, डिसेंबर १५ पर्यंत
करण : वणिज – १६:५८ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०३:४२, डिसेंबर १५ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : ०९:४८ ते ११:११
गुलिक काल : ०७:०४ ते ०८:२६
यमगण्ड : १३:५६ ते १५:१८
अभिजितमुहूर्त : १२:११ ते १२:५५
दुर्मुहूर्त : ०७:०४ ते ०७:४७
दुर्मुहूर्त : ०७:४७ ते ०८:३१
अमृत काल : ००:५७, डिसेंबर १५ ते ०२:२६, डिसेंबर १५
वर्ज्य : २०:३२ ते २२:०१

श्रीदत्तावतार अन्य अवतारांप्रमाणे दुष्टांचा नाश करून विसर्जीत होणारा नाही.
लोकोद्धाराकरिता चिरंजीव राहिलेला हा अवतार आहे. याशिवाय एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या देवतेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवता व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे. सृष्टीची उभारणी, जोपासना आणि संहार यासाठी कार्यरत असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजेच श्रीदत्तात्रेयाचा अवतार असे मानले जाते.

‘तीन शिरें सहा हात’ अशा स्वरूपातील श्रीदत्तात्रेयांची ओळख आपल्याला अनेक सुबक रंगीत चित्रांमधून तसंच दत्तमंदिरांतील त्यांच्या साजिऱ्यागोजिऱ्या मूर्तीमधून आजवर घडत आली आहे. त्रिमुखी अथवा एकमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्तपादुकांची पूजाअर्चाही अनेक ठिकाणी होत असते. प्रामुख्याने, महाराष्ट्रातील अनेक गावांमधून तसंच अगदी शहरातून देखील दर गुरुवारी श्रीदत्तात्रेयांची उपासना, भजन-पूजन व कीर्तनादी कार्यक्रमांची रेलचेल उडालेली दिसते.

मार्गशीर्ष मास तसंच दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीगुरुचरित्र, श्रीगुरुलीलामृत, श्रीदत्तप्रबोध, श्रीदत्तमाहात्म्य अशा सांप्रदायिक ग्रंथांची पारायणे तसेच प्रसादाच्या सुंठवडय़ामधूनही श्रीदत्तमहाराज आपली ओळख टिकवून आहेत. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर, माहूर, कारंजा इत्यादी श्रीदत्तक्षेत्रांतून आजही दत्तभक्तांची गर्दी उसळलेली आपण पाहतो. ‘गुरुमहाराज गुरू। जयजय परब्रह्म सद्गुरू’, ‘दिगंबरा दिगंबरा। श्रीपादवल्लभ दिगंबरा’, ‘दत्तात्रेय गुरू माझे आई। मजला ठाव द्यावा पायी’, ‘श्रीगुरुदेवदत्त’ असा नामगजर आणि जयघोष या दत्तस्थानांतून होत असल्याचेही आपण पाहतो.
आज श्री दत्त जयंती आहे.

श्रीगुरुनाथा तुज नमितो, सद्गुरुनाथा तुज नमितो।
श्रीधरयतिवर भक्तकृपाकर, करुणासिंधो तुज नमितो ।।१।।
प्रसन्नवदना तुज नमितो, पवित्रचरणा तुज नमितो।
दीनदयाघन शांत सुशीतल, ब्रह्मनिरंजन तुज नमितो ।।२।।
पतितोद्धारा तुज नमितो, हीनपावना तुज नमितो।
क्लिन्तमना प्रभु ! अभयकराम्बुज, काशायाम्बर तुज नमितो ।।३।।

आज श्रीधर स्वामी जयंती आहे – तिथि मार्गशिर्ष पौर्णिमा (दत्तजयंती)

श्रीगुरु माझा दत्त दयाघन रे । अंतरचालक त्रिभुवनपालक ।
सकळांसी जीवन रे । अखंडअगोचर व्याप्त चराचर । शाश्वत चिदघन रे ॥
माणिकदासासि मिळविले स्वरूपासी । देऊनि उन्मन रे ॥

आज संत माणिक प्रभू जयंती आहे ( समाधी: मार्गशीर्ष शुद्ध ११, शके १७८७, २९ नोव्हेंबर १८६५, गीता जयंतीच्या दिवशी माणिक नगर येथे.)

• सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी
सच है दुनिया वालों कि हम हैं अनाड़ी

दुनिया ने कितना समझाया
कौन है अपना कौन पराया
फिर भी दिल की चोट छुपा कर
हमने आपका दिल बहलाया
खुद ही मर मिटने की ये ज़िद है हमारी
सच है दुनिया वालों…

दिल का चमन उजड़ते देखा
प्यार का रंग उतरते देखा
हमने हर जीने वाले को
धन दौलत पे मरते देखा
दिल पे मरने वाले मरेंगे भिखारी
सच है दुनिया वालों…

असली नकली चेहरे देखे
दिल पे सौ सौ पहरे देखे
मेरे दुखते दिल से पूछो
क्या क्या ख्वाब सुनहरे देखे
टूटा जिस तारे पे नज़र थी हमारी
सच है दुनिया वालों…

• १९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट, १९२३)

चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल – हिंदी चित्रपट म्हणजे केवळ स्वप्नरंजनाची दुनिया झालेली असताना वास्तवापासून दूर असलेला चित्रपट वास्तवाजवळ आणणार्या दिग्दर्शकांत बेनेगल यांचा समावेश होतो. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन न मानता त्यातून काहीतरी विचार दिला पाहिजे ही बांधिलकी मानणारे ते दिग्दर्शक आहेत. म्हणूनच त्यांचे चित्रपट केवळ मनोरंजन करीत नाहीत, तर पाहणार्याला अस्वस्थ करून सोडतात. त्यांच्या चित्रपटातून ते काही तरी सांगू पहात आहेत. स्वतःची अस्वस्थता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील गल्लाभरू दिग्दर्शकांपेक्षा ते वेगळे आहेत. चित्रपट तयार करणे हा त्यांचा व्यवसाय नाही तर ती तळमळ आहे. आणि त्यांचे म्हणूनच त्यांचे चित्रपट ही एक चळवळ आहे.

श्याम बेनेगल यांनी कलाक्षेत्रातील कारकीर्दीस ‘लिंटास’ या प्रख्यात जाहिरात संस्थेतून सुरुवात केली. लिंटासमध्ये कॉपी रायटर म्हणून प्रवेश केल्यानंतर आपल्या प्रतिभेच्या जोरावर अनेक पदे भूषवित त्यांनी एकाहून एक सरस जाहिराती केल्या. जाहिरात क्षेत्रात जवळपास नऊशे जाहिरातींचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तो घेऊनच त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 1973 साली त्यांनी पहिला चित्रपट ‘अंकुर’ दिग्दर्शित केला. यामध्ये त्यांनी दक्षिण भारतातील प्रस्थापित सरंजामशाही व्यवस्थेचे दर्शन घडविले.

‘निशांत’ चित्रपटात त्यांनी जमीनदारी व सरंजामशाही व्यवस्थेत सामाजिक संतुलन बिघडून साचलेल्या व्यवस्थेत सामान्य व्यक्तींवर होणारे अन्याय, अत्याचारास अभिव्यक्ती दिली. या चित्रपटात असहाय्य पतीची व्यथा मांडून त्यांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केले. बेनेगल यांचे चित्रपट देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती, प्रश्न, समस्या, रूढी परंपरा या विषयांभोवती गुंफलेले असतात. गुजरातमध्ये आणंद येथील अमूलच्या माध्यमातून घडलेल्या धवलक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘मंथन’ सारखा चित्रपट सकारात्मक संदेश देतो. ही प्रयोगशीलता चित्रपटसृष्टीत अपवादानेच आढळते. विशेष म्हणजे या चित्रपट निर्मितीसाठी वित्तपुरवठा केला तो डेअरीच्या सदस्यांनी, हाही प्रयोगच. प्रत्येकी दोन रूपये प्रमाणे सर्वांनी आपला वाटा उचलला.

मेकींग ऑफ महात्मा मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वकिली करायला गेलेल्या मोहनचंद करमचंद गांधी यांचा महात्मा गांधी होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटला आहे. सुभाषचंद्र बोस चित्रपटात नेताजींच्या प्रारंभिक जीवनापासून जर्मनी, जपानचा पाठिंबा मिळवून व आझाद हिंद फौजेची स्थापना करून इंग्रजांविरुद्ध आघाडी उघडेपर्यंतचा प्रवास दाखविला आहे. या दोन्ही चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कौतुक झाले.

‘झुबेदा’ सारखा व्यावसायिक व कलात्मकतेचा संयोग असलेला चित्रपटही त्यांनी तेवढ्याच ताकदीने उभा केला. दहशतवादाच्या रस्त्यावर चुकलेल्या एका तरूणाची कथा मांडणारा द्रोहकाल हाही त्यांचाच चित्रपट.
विशेष म्हणजे प्रसिद्ध चेहरे अभिनेते घेण्यापेक्षा त्यांनी पुण्याच्या एफटीआय व दिल्लीच्या एनएसडीमधून निघालेल्या नवीन सृजनावर कलम केले. त्यांना पैलू पाडले. आपल्या चित्रपटामधून त्यांना प्रतिभाविष्काराची संधी दिली. त्यामुळेच पुढे जाऊन शबाना आझमी, नसरूद्दीन शहा, स्मिता पाटील यासारखे हिरे चित्रपटसृष्टीस गवसले. त्यांनी युनिसेफसाठी काही शैक्षणिक मालिकाही काढल्या. बेनेगल सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ मध्ये त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने एका विचारवंत दिग्दर्शकाचा गौरव झाला असे म्हणता येईल.
• १९३४: चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित श्याम बेनेगल यांचा जन्म.

  • घटना :
    १८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.
    १९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.
    १९२९: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
    १९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.
    १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
    १९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

• मृत्यू :
• १९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर, १९१९)
• २०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.
• २०२० : भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन.

  • जन्म
    १९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट, २०१४)
    १९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २ जून, १९८८)
    १९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.
    १९३९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर, १९८०)
    १९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून , १९८०)
    १९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »