संतकवी दासगणु महाराज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, नोव्हेंबर २५, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ४, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५२ सूर्यास्त : १७:५९
चंद्रोदय : ०२:३८, नोव्हेंबर २६ चंद्रास्त : १४:१७
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – ०१:०१, नोव्हेंबर २६ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – ०१:२४, नोव्हेंबर २६ पर्यंत
योग : विष्कम्भ – १३:१२ पर्यंत
करण : वणिज – ११:३९ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०१:०१, नोव्हेंबर २६ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : ०८:१५ ते ०९:३९
गुलिक काल : १३:४९ ते १५:१२
यमगण्ड : ११:०२ ते १२:२६
अभिजितमुहूर्त : १२:०३ ते १२:४८
दुर्मुहूर्त : १२:४८ ते १३:३२
दुर्मुहूर्त : १५:०१ ते १५:४६
अमृत काल : १७:१६ ते १९:०४

आज आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन आहे.

‘आधुनिक महाराष्ट्राचे महीपती’ संतकवी दासगणु महाराज-
|| ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा । तेथें काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥१३॥ रामकृपा जेव्हां झाली । तेव्हां माकडां शक्ति आली । गोप तेही बनले बली । यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥ तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचें प्रयोजन । चरणीं होतां अनन्य । तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥ ऐसा संतांनीं डांगोरा । तुझा पिटला रमावरा । म्हणून आलों तुझ्या द्वारां । आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥ हें संतचरित्र रचावया । साह्य करी पंढरीराया । माझ्या चित्तीं बसोनिया । ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥ – संत कवी दास गणू महाराज ( श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १ ला )

संत कवी दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे महीपती’ म्हणून ओळखतात.

दासगणूंनी मोठ्या प्रमाणावर काव्यलेखन केले. त्याकाळी तमाशा हे करमणुकीचे साधन होते. त्यांनी तमाशासाठीही काव्यरचना केली. श्रीगोंद्याला असतानाच दासगणूंची सद्गुरू वामनशास्त्री इस्लामपूरकर यांच्याशी भेट झाली. हे सांप्रदायिक श्री कल्याण महाराजांच्या परंपरेतले होते. शास्त्रीबुवांना मंत्रोपदेश देण्याचा आग्रह त्यावेळी दासगणूंनी धरला. शास्त्रीबुवांनीही त्यांना शिवमंत्राचा उपदेश केला. परंतु आज्ञा म्हणून पंढरपूरची वारी करण्यास सांगितले. त्यानंतर सद्गुरूंचा दास असा गणू किंवा गणू हा सद्गुरूंचा दास या भावनेने ते काव्यरचनेत स्वतःचा उल्लेख दासगणू असा करू लागले. महाराज सुरुवातीला कट्टर शिवभक्त होते. मात्र, नंतरच्या काळात शिव आणि विष्णु अशा दोन्हींचे ते उपासक झाले. दरवर्षी पंढरपूरच्या वारीत त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही.

महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.

दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यंनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. ‘गणू म्हणे’ ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते. साईबाबांचे जीवनचरीत्र देशविदेशात पोहचविण्यासाठी दासगणु महाराज यांचे अतुलनीय योगदान आहे.

श्री आऊबाई चरित्र , ईशावास्य भावार्थ बोधिनी भक्त लीलामृत ,भक्तिसारामृत, भाव दीपिका, शंकराचार्य चरित्र , संत कथामृत ,साई स्तवनमंजिरी, शिर्डी माझे पंढरपुर. (साईबाबांची आरती) ह्या त्यांच्या प्रमुख रचना आहेत तसेच श्री गजानन विजय: या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. (२१ अध्याय – ३६६९ ओव्या असणारा हा ग्रंथ मुखोदगत पारायण करणारे काही गजान महाराज भक्त आज महाराष्ट्रात आहेत )

१९६२: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८६८ – अकोळनेर, अहमदनगर)

  • घटना
    १६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
    १९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
    १९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
    १९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
    १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
    २०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

• मृत्यू :
• १९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: २० मे, १८८४ )
• १९६०: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट, १८९८ )
• १९८४: भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १२ मार्च , १९१३)
• १९९७: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.
• २०१३: बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर, १९२०)
• २०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर, १९२०)

  • जन्म :
    १८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट, १९४८)
    १८७९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी, १९६६)
    १८८२: मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे , १९६८)
    १८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.
    १९२१: ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट, २०१५ )
    १९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर , २०१२)
    १९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
    १९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै, २०११)

आपला दिवस मंगलमय जावो.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »