श्री गुळवणी महाराज समाधी दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बुधवार, जानेवारी २२, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२६
चंद्रोदय : ०१:३७, जानेवारी २३ चंद्रास्त : १२:२२
शक सम्वत : १९४६ क्रोधी
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – १५:१८ पर्यंत
नक्षत्र: स्वाती – ०२:३४, जानेवारी २३ पर्यंत
योग : शूल – ०४:३८, जानेवारी २३ पर्यंत
करण : कौलव – १५:१८ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०४:३१, जानेवारी २३ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १२:५० ते १४:१४
गुलिक काल : ११:२६ ते १२:५०
यमगण्ड : ०८:३९ ते १०:०२
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२८ ते १३:१३
अमृत काल : १६:४१ ते १८:२९

। दत्त म्हणता काय उणे ? उभी त्रिमूर्ती साक्षात ।
। काळजाच्या पायावाटे उतरे काळजात ॥

या उक्तीप्रमाणे देण्यासाठी जन्म आपुला ! दत्त म्हणजे दिले ! हेच प.पू. गुळवणी महाराजानी आपल्या जगण्यांतून सिद्ध केले त्यांचे जीवन कार्य हे श्री दत्तप्रभूंच्या कृपाशीर्वादाचेच फलित होते त्यांची दृष्टी, संकल्प, त्यांची स्वप्ने, त्या स्वप्नांची परिपूर्ती, सामान्यालाही असामान्य घडविणारी त्यांची कृपा दृष्टी सारे कांही अलौकिकच ! या सर्वांचे वर्णन करताना वाणी मूक होते, लेखणी मूक होते, अनिमिष नेत्रांनी नुसते पाहणेच उरते ! कारण दृष्य केवळ हृदय पटलावर अंकित करून नेत्र ही मूक होतात. मन हृदय तर या श्रेष्ठ विभूतीच्या सामर्थ्याच्या प्रभावाने अधीच भारून गेलेले असते, त्यामुळे ते ही मुके ! यासर्व मुक्या घटकांनी प. पू. गुळवणी महाराजांची थोरवी ती काय वर्णावी ?

आज श्री गुळवणी महाराज समाधी दिन आहे – तिथी नुसार ( पौष वाद्य ८, दिनांक १५ जानेवारी १९७४ ला दत्त चरणी विलीन. )

।। देव देश अन धर्मापायी प्राण घेतल हाती ।। ह्या उक्तीनुसार शेकडो वर्ष श्रीराम मंदिरासाठी लढा देणारे, प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व श्रीराम भक्तांना मन:पूर्वक प्रणाम.

याचेच विजयश्रीत रुपातंर म्हणजेच ” श्रीराम मंदिर अयोध्या ” येथे आज २२ जानेवारी, २०२४ रोजी. सकाळी १२.२९ ते १२.३० दरम्यान प्राणप्रतिष्ठा रामलल्लाची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती झाली. आणि मंदिर लोकार्पणाचा सोहळा पार पडला.

ह्या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार म्हणुन देशभरातील नागरिकांनी पूजा पाठ, मंगल कार्यक्रम साजरे करून आनंद व्यक्त केला. देशभर राममय वातावरण झाले. (तिथी पौष शु पौर्णिमा )
।। जय श्रीराम ।। जय जय श्रीराम ।।

स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.

हैद्राबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या दहशतवादी संघटनेने मराठवाडा हिंदू जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर अत्याचारांना प्रोत्साहन दिले. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले. याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील बंदी हटवली.

‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.
लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते.

१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

  • घटना :
    १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
    १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
    १९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
    १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
    १९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
    २००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
    २०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.

• मृत्यू :

• १९७५: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर , १८९४)

  • जन्म :
    १८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.
    १८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म. ( मृत्यू : ६ जानेवारी, १९८० )
    १९०१: भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म. ( मृत्यू :१५ ऑक्टोबर, १९७२ )
    १९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
    १९१६: गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी , १९९४)
    १९१६: बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)
    १९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २००३)
    १९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
    १९३४: हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »