स्वामी श्रद्धानंद

आज सोमवार, डिसेंबर २३, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०८ सूर्यास्त : १८:०७
चंद्रोदय : ०१:१८, डिसेंबर २४ चंद्रास्त : १२:४७
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – १७:०७ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – ०९:०९ पर्यंत
योग : सौभाग्य – १९:५५ पर्यंत
करण : कौलव – १७:०७ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०६:३०, डिसेंबर २४ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : ०८:३१ ते ०९:५३
गुलिक काल : १४:०० ते १५:२३
यमगण्ड : ११:१५ ते १२:३८
अभिजितमुहूर्त : १२:१६ ते १३:००
दुर्मुहूर्त : १३:०० ते १३:४४
दुर्मुहूर्त : १५:१२ ते १५:५६
अमृत काल : ०५:३०, डिसेंबर २४ ते ०७:१९, डिसेंबर २४
वर्ज्य : १८:३९ ते २०:२७ आज सोमवार, डिसेंबर २३, २०२४ युगाब्द : ५१२६
आवडीचें मागे प्रवृत्तीचे नेघें ।
नाममार्गे वळगे निघे राया ।।
नाम परब्रह्म नाम परब्रह्म ।
नित्य रामनाम जपिजेसु ।।
अंतरींचिया सुखे बाहिरिलिया वेखें।
परब्रह्म मुखें जपतुसें ।।
सोपान निवांत रामनाम मुखांत ।
नेणे दुजी मात हरिविण ।।
आज संत सोपानदेव महाराज समाधी दिन आहे (२३ डिसेंबर १२९६ दिनांक नुसार / मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी )
आज किसान दिन आहे.
१९०२ : भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरणसिंग यांचा जन्म ( मृत्यू : २९ मे, १९८७ )
२००४ : भारताचे ९ वे पंतप्रधान वाणिज्य व उद्योग मंत्री पी. व्ही . नरसिंह राव यांचे निधन ( जन्म : २८ जून , १९२१ )
स्वामी श्रद्धानंद – १८९५ साली जलंदरमध्ये ‘ वैदिक पाठशाळा ‘ ही शिक्षणसंस्था त्यांनी स्थापन केली. तसेच मुलींसाठी एक शाळाही काढली. दलितांना आर्यसमाजात प्रवेश देऊन त्यांच्या उन्नतीसाठी ते झटले. प्राचीन ऋषींच्या आश्रमांच्या धर्तीवर विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी कांग्री ह्या हरद्वारजवळील गावात त्यांनी ‘गुरूकुल’ सुरू केले.
गुरूकुल कांग्री विश्वविदयालयात संस्कृत भाषा, वेद, प्राचीन विदया ह्यांबरोबरच इंगजी व आधुनिक विज्ञाने ह्यांचा समावेश असलेला अभ्यासक्रम तेथे चालू केला. शिक्षणाचे माध्यम हिंदी होते. शाला, प्रशाला, महाविदयालय असा विकास-विस्तार करीत गुरूकुलातून पुढे पदवीधरही निर्माण झाले. १९०९ साली अखिल भारतीय पातळीवर ‘ सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभे’ची स्थापना होऊन तिचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले (१९१०). ‘ महात्मा मुन्शीराम’ ह्या नावाने ते ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या पत्नी शिवदेवी ह्यांचे १८९१ मध्ये निधन झाले. त्यातच १९१४ साली हरिश्चंद्र आणि इंद्र ह्या त्यांच्या दोन पुत्रांपैकी हरिश्चंद्र देशाबाहेर निघून गेला (१९१९ नंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा वा संपर्क राहिला नाही). ह्या पार्श्वभूमीवर १२ एप्रिल १९१७ रोजी त्यांनी संन्यास घेऊन ‘ स्वामी श्रद्धानंद ‘ हे नाव धारण केले.
१९१८ नंतर ते राजकारणाकडे ओढले जाऊन काँग्रेसचे काम करू लागले. १९१९ साली अमृतसर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. तथापि गांधीजींशी मतभेद होत गेल्याने ते राजकारणापासून दूर झाले. त्यानंतर त्यांनी हिंदूंच्या संघटनाकार्यास स्वत:ला वाहून घेतले. पूर्वी अन्य धर्मांत गेलेल्या हिंदू लोकांना सन्मानाने परत हिंदू धर्मात आणणे, हा ह्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग होता.
त्यासाठी ‘ भारतीय हिंदु शुद्धी सभे ‘च्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. १९२६ च्या मार्च महिन्याच्या अखेरीस कराची येथील अशगरी बेगम ह्या महिलेला तिच्या मुलासह त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश दिला. त्यातून मुस्लिम समाजात मोठा प्रक्षोभ निर्माण झाला. त्यानंतर काही महिन्यांनीच अब्दुल रशीद नावाच्या माणसाने त्यांची हत्या केली.
१९२६ : स्वामी दयानंद यांचे शिष्य, गुरुकुल विश्व विद्यालयाचे संस्थापक , शिक्षण महर्षी व आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या झाली ( जन्म : २ फेब्रुवारी, १८५६ )
भारतीय कन्नड कवी, लेखक आणि संशोधक – गुग्गरी शांतवीरप्पा शिवरुद्रप्पा – शिवरुद्रप्पा यांनी १९४९ मध्ये BA आणि १९५३ मध्ये MA म्हैसूर विद्यापीठ मधून मिळवले, तीन वेळा सुवर्णपदके मिळवली. ते Kuvempu चे विद्यार्थी आणि अनुयायी होते. आणि कुवेम्पूच्या साहित्यकृती आणि जीवनापासून खूप प्रेरित होते.
१९६५ मध्ये शिवरुद्रप्पा यांनी त्यांच्या “सौंदर्य समीक्षे” प्रबंधासाठी डॉक्टरेट मिळवली.
साहित्यिक सौंदर्यशास्त्राच्या क्षेत्रातील अग्रगण्य कार्य, कुवेम्पू यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेले.
शिवरुद्रप्पा यांनी १९४९ मध्ये म्हैसूर विद्यापीठ येथे कन्नड भाषेतील व्याख्याता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९६३ मध्ये, ते हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात नोकरीसाठी रुजू झाले. वाचक, शेवटी कन्नड विभागाचे प्रमुख बनले. १९६६ पर्यंत ते उस्मानिया विद्यापीठात राहिले.
१९६६ मध्ये, शिवरुद्रप्पा बंगलोर विद्यापीठ मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर ते विद्यापीठाचे संचालक म्हणून निवडले गेले आणि त्यांनी विद्यापीठाच्या कन्नड अभ्यास केंद्र (कन्नड: ಕನ್ನಡ ಅಧ್ಯಯನ ಕೇಂದ್ರ) मध्ये योगदान देणे सुरूच ठेवले.
दावनगेरे, शिवमोग्गा आणि म्हैसूर सारख्या शहरांमध्ये त्यांनी कन्नडमध्ये व्याख्यान दिले. १९६६ मध्ये, त्यांनी त्यांचे मुख्यालय बंगळुरू विद्यापीठात हलवले, जिथे त्यांनी १९८६ मध्ये सरकारमधून निवृत्ती होईपर्यंत संचालक म्हणून काम केले.
१९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून काम केले.
शिवरुद्रप्पा यांना राष्ट्रकवी (“राष्ट्राचे कवी” साठी संस्कृत) सुवर्णा कर्नाटक (कर्नाटक) या पदवीने सन्मानित केले.
२०१३ : भारतीय कवी व शिक्षक जी. एस . शिवरुद्राप्पा यांचे निधन ( जन्म : ७ फेब्रुवारी, १९२६ )
- घटना :
१८९३ : हॅंसेल अँड ग्रेटल या प्रसिद्ध सांगीतिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला
१९१४ : पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन
१९४० : वालचंद हिराचंद यांनी बंगळुरू येथे हिंदुस्थान एअर क्राफ्ट हा कारखाना सुरु करून भारतातील विमान उद्योगाचा पाया रचला
१९४७ : अमेरिकेत बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रान्सिस्टर उपकरणाचा शोध लागल्याची घोषणा केली
१९५४ : डॉ जे हार्टवेल हॅरिसन व डॉ जोसेफ मरे यांनी जिवंत व्यक्तींमधील पुत्रपिंड काढून पहिले मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया केली
१९७० : वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट नाटकाचा शुभारंभ प्रयोग मुंबई येथे बिर्ला मातोश्री सभागृहात झाला
२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरीया गावात जगातील सर्वात मोठा बौध्द् स्तूप सापडला व त्याची उंची १०४ फूट आहे.
• मृत्यू :
• १९६५ : नट, गायक, गंधर्व नाटक मंडळींचे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन ( जन्म : २ जुलै, १८८० )
१९७९ : हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचे निधन
१९९८ : स्वातंत्र्य सैनिक रत्नाप्पा कुंभार यांचे निधन ( जन्म : १५ सप्टेंबर, १९०९ )
२००८ : गीतकार, लेखक गंगाधर म्हांबरे यांचे निधन ( जन्म : ३१ जानेवारी, १९३१ )
२०१० : केंद्रीय उद्योगमंत्री, केरळचे मुख्यमंत्री के. करूणाकरण यांचे निधन ( जन्म : ५ जुलै, १९१६ )
२०१० : कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन ( जन्म : २१ मे, १९२८ )
- जन्म :
१६९० : मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेब यांचा जन्म
१८९७ : ओरिसा राज्यातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालिचरण पटनाईक यांचा जन्म.