साखरेचा गोडवा वाढला, पण शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यात आतापर्यंत ९१८ लाख टन उसाचे विक्रमी गाळप होऊन ८५६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. गाळप करण्यामध्ये जिल्ह्यांची सध्या चढाओढ पाहायला मिळत आहे. सध्यातरी उसाच्या गाळपात ‘पुणे’ तर साखर उत्पादनात ‘कोल्हापूर’ जिल्हा आघाडीवर आहे. दरम्‍यान, उत्पादन वाढले असले तरी साखरेचा दर (MSP) न वाढल्याने आणि विक्री कमी असल्याने कारखान्यांना उसाची बिले (FRP) देणे कठीण जात आहे. अद्याप राज्‍यातील १६४ कारखान्यांची एफआरपी थकलेली आहे.

यंदाचा साखर हंगाम अंतिमत: यशस्वी दिसत असला तरी आर्थिक गणिते बिघडलेली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत (६५४ लाख क्विंटल) यंदा उत्पादन (८५६ लाख क्विंटल) लक्षणीय वाढले आहे. मात्र, केंद्र सरकारने किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ न केल्याने कारखान्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे. ४१ कारखान्यांनी वेळेवर पैसे दिले असले, तरी बहुतांश कारखाने अद्याप साखर आयुक्तालयाच्या कारवाईच्या छायेत आहेत.

आकडेवारी एका नजरेत:
एकूण कारखाने: २०७ (१०२ सहकारी + १०५ खासगी)
राज्याचा सरासरी उतारा: ९.३३%
कोल्हापूर विभाग: सर्वाधिक साखर उत्पादन (२१२ लाख क्विंटल)
पुणे विभाग: सर्वाधिक ऊस गाळप (२०३ लाख टन)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »