आज आळंदी एकादशी

आज मंगळवार, नोव्हेंबर २६, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ५, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५३ सूर्यास्त : १७:५९
चंद्रोदय : ०३:२५, नोव्हेंबर २७ चंद्रास्त : १४:४८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : उत्पन्ना एकादशी – ०३:४७, नोव्हेंबर २७ पर्यंत
नक्षत्र : हस्त – ०४:३५, नोव्हेंबर २७ पर्यंत
योग : प्रीति – १४:१४ पर्यंत
करण : बव – १४:२५ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०३:४७, नोव्हेंबर २७ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १५:१३ ते १६:३६
गुलिक काल : १२:२६ ते १३:४९
यमगण्ड : ०९:३९ ते ११:०३
अभिजितमुहूर्त : १२:०४ ते १२:४८
दुर्मुहूर्त : ०९:०६ ते ०९:५०
दुर्मुहूर्त : २३:०९ ते ००:००, नोव्हेंबर २७
अमृत काल : २१:४७ ते २३:३६
वर्ज्य : १०:५५ ते १२:४३
धन्य इंद्रायणी तीर, पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यवंत ॥धृ॥
भागीरथ मनकर्णिका ओघा, आणिक हो ओघा त्रिवेणीच्या ॥१॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग, मिळाले हो संत अलंकापुरी ॥२॥
नामा म्हणे धन्य, भाग्याचे हे संत नामा म्हणे धन्य भाग्याचे संत जाहला एकांत ज्ञानेशाचा ॥३॥
आज आळंदी एकादशी यात्रा आहे.
२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
हेमंत करकरे,अशोक कामटे , विजय साळसकर , शशांक शिंदे,मेजर संदीप उन्नीकृष्णन – एन.एस.जी. कमांडो अधिकारी, यासारखे अधिकारी हुतात्मा झाले. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.
दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला.
ह्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली तसेच पोलीस व सुरक्षा दलातील हौतात्म्य स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांना मानवंदना🙏
२००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६/११ म्हणून ओळखले जाते.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
आज संविधान दिन आहे.
|| आई’ म्हणोनी कोणी, आईस हाक मारी |
| ती हाक येई कानी, मज होय शोक्कारी |
| नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी |
|आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी |
| ही न्यूनता सुखाची, चित्ती सदा विदारी |
| स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी… ||
|| चारा मुखी पिलांच्या, चिमनी हलूच देई |
| गोठात वासरांना, या चाटतात गाई |
| वात्सल्य हे पशूंचे, मी रोज रोज पाही |
| पाहून अंतरात्मा, व्याकुळ मात्र होई |
| वात्सल्य माउलीचे, आम्हा जगात नाही|
| दुर्भाग्य याविना का, आम्हास नाही आई…||
|| शालेतुनी घराला, येता धरील पोटी |
| काढून ठेवलेला, घालील घांस ओठी |
| उष्ट्या तशा मुखाच्या, धावेल चुंबना ती |
| कोण तुझ्याविना गे, का या करील गोष्टी |
| तुझ्याविना गे कोणी, लावील सांजवाती |
|सांगेल ना म्हणाया, आम्हा ‘शुभं करोती’… ||
| ताइस या कशाची, जाणीव नाही काही |
| त्या सान बािलकेला, समजे न यात काही |
| पाणी त्रर्तान्ना, नेत्रात बावरे ही |
|ऐकुनी घे परंतु आम्हास नाही आई |
|सांगे त्से मुलीना आम्हास नाही आई |
| ते बोल येत कानी, आम्हास नाही आई… ||
|| आई, तुझ्याच ठाई, सामर्थ्य नंदिनीचे |
| माहेर मंगलाचे, अद्वैत तापसांचे |
| गांभीर्य सागराचे, औदार्य या धरेचे
| नेत्रात तेज नाचे, त्या शांत चंद्रिकेचे |
| वास्तव्य या गुणांचे, आई तुझ्यात साचे…. |
|| गुंफूनीं पूर्वजांच्या, मी गाइले गुणांला |
| सार्या सभाजनांनी, या वानिले कृतीला |
| आई, करावा तू नाहीस कौतुकाला |
| या न्यूनतेमुले ही, मज त्याज्य ही पुष्पमाला |
| पंचारती जनांची, ना तोषवी मनाला |
| पाही जीव बालकाचा, तव कॉतुका भुकेला… ||
|| येशील तू घराला, परतून केधवा गे |
| दवडू नको घडीला, ये ये निघून वेगे |
| हे गुंतले जीवाचे, पायी तुझ्याच धागे |
| कर्तव्य माउलीचे, करण्यास येई वेगे |
| रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे ||
ये रागाव्याही प्री येई येई वेगे…
– यशवंत
• १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च, १८९९)
भारतीय भाषाशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक सुनीतिकुमार चटर्जी – १९१४ मध्ये, ते कलकत्ता विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक झाले, जे पद त्यांनी १९१९ पर्यंत सांभाळले. लंडन विद्यापीठात शिकण्यासाठी ते गेले जेथे त्यांनी ध्वनीशास्त्र, इंडो-युरोपियन भाषाशास्त्र, प्राकृत, पर्शियन, जुने आयरिश, गॉथिक आणि इतर भाषांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी पॅरिसला जाऊन इंडो-आर्यन, स्लाव आणि इंडो-युरोपियन भाषाशास्त्र, ग्रीक आणि लॅटिनमध्ये सोरबोन येथे संशोधन केले. त्यांचे शिक्षक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ ज्युल्स ब्लोच होते. १९२२ मध्ये भारतात परतल्यानंतर ते कलकत्ता विद्यापीठात भारतीय भाषाशास्त्र आणि ध्वनीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९५२ मध्ये सेवानिवृत्तीनंतर, त्यांना प्रोफेसर एमेरिटस आणि नंतर १९६५ मध्ये, मानवतेसाठी भारताचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर बनवण्यात आले.
रवींद्रनाथ तागोरसोबत मलाया, सियाम, सुमात्रा, जावा आणि बाली येथे ते गेले, जिथे त्यांनी भारतीय कला आणि संस्कृतीवर व्याख्याने दिली. ते पश्चिम बंगाल विधान परिषदेचे अध्यक्ष (१९५२-५८) आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष (१९६९) होते.
१९६३ साली पद्मविभूषण या दुसऱ्या-सर्वोच्च भारतीय नागरी सन्मानाने भारत सरकारने त्यांचा गौरव केला.
२९ मे १९७७ रोजी कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
१८९०: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे, १९७७)
- घटना :
१८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
१९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.
१९४९: भारताची घटना मंजूर झाली. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
१९६५: अॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
१९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
१९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९९८: खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.
१९९९: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली. - मृत्यू :
• १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. (जन्म: २ मे , १८९८)
• २००१: शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन.
• २०१२: भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१९) - जन्म :
१८८५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म. (मृत्यू: २ जून, १९७५)
१८९०: भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे, १९७७)
१९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून, २०११)
१९१९: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक तज्ञ राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट , २०११ )
१९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर, २०१२)
१९२३: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै , १९७५ )
१९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्यंकटरामा पंडित कृष्णमूर्ती उर्फ व्ही. के. मूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल, २०१४)
१९२६: भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म. ( मृत्यू :६ मार्च, २०१७ )
१९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म. ( मृत्यू : ३० ऑक्टोबर, १९९६ )
१९७२: हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.