पोखरण २

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, मे १३, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २३ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:०५
चंद्रोदय : १०:३५ चंद्रास्त : ००:१७, मे १४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायन
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – ०२:५०, मे १४ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – ११:२३ पर्यंत
योग : शूल – ०७:४२ पर्यंत
करण : कौलव – १४:२१ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०२:५०, मे १४ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ०७:४२ ते ०९:२०
गुलिक काल : १४:१३ ते १५:५०
यमगण्ड : १०:५७ ते १२:३५
अभिजितमुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १३:०१ ते १३:५३
दुर्मुहूर्त : १५:३७ ते १६:२९
अमृत काल : ०८:५४ ते १०:३४
वर्ज्य : १९:५७ ते २१:४०

१९९८: पोखरण २ हे भारताने ११ मे आणि १३ मे, इ.स. १९९८मध्ये केलेल्या अणुचाचण्यांना दिले गेलेले नाव आहे. या दोन दिवसात मिळून एकूण पाच अणुचाचण्या केल्या गेल्या.

११ मे रोजी तीन तर १३ मे रोजी दोन अशा एकूण पाच अणुचाचण्या करण्यात आल्या होत्या. यांतील पहिला स्फोट फ्युजन बॉम्ब होता तर इतर फिजन बॉम्ब होते.

१९०५: भारताचे ५वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९७७)

।। देशासाठी कर्तृत्वाचे सर्वस्वाचे दान हवे ।
। आपुल्याच हातांनी घडवू भवितव्याचे शिल्प नवे ।।

हे गीत जगणारे संघ प्रचारक श्री वसंतराव ओक वर्धा जिल्हा – नाचणं गावचे ओक बंधू – श्री मनोहर , श्री वसंतराव व श्री मधुकरराव, संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांच्या संपर्कात आल्या नंतर या ओक बंधूंनी संपूर्ण जीवन संघकार्यासाठी समर्पित केले.

संघ संस्थापकांनी दिलेल्या जबाबदारी प्रमाणे वसंतरावजी यांना दिल्ली येथील हिंदु महासभा भवनातील खोल्यांमध्ये आपला निवास ठेऊन संघकार्याचा श्रीगणेशा केला. त्यांचे सोबत दादाराव परमार्थ आणि बाबासाहेब आपटे हे सहकारी होते.

भारताचे विभाजन होण्यापूर्वीच वसंतरावजी ओक यांच्या परिश्रमपूर्वक प्रयासामुळे रा. स्व. संघाच्या कार्याचा दबदबा दिल्लीत वृध्दिंगत होऊन म . गांधींच अंतेवासी व विश्वासू बिर्लाजी यांचा संघकार्याशी घनिष्ठ संपर्क आला होता. यामुळे म . गांधीजींच्या मंदिर मार्गावरील वाल्मीकी मंदिराच्या आवारातील प्रार्थना सभांची संपूर्ण संरक्षण व्यवस्था दिल्लीच्या प्रमुख संघ स्वयंसेवकांकडे देण्यात आलेली होती.

श्री वसंतराव ओक व त्यांचे सहकारी यांनी दिल्ली शहरात सुरु केलेले कार्याचा महत्वाचा उपयोग झाला .

मुस्लिम लीगने आखलेल्या कटा नुसार १० सप्टेंबर १९४७ रोजी सशस्त्र विद्रोह करून भारताचे मंत्री व सरकारी वरिष्ठ अधिकारी यांची हत्या करून लाल किल्ल्यावर पाकिस्तानचा झेंडा उभारून भारतावर कब्जा केला गेला असता. मात्र देश भक्त व कर्तव्य निष्ठ तरुण स्वयंसेवकांनी नेहरू व पटेल यांना पूर्व कल्पना देऊन मुस्लिम लीगचा डाव उधळून लावला . अन्यथा देश एक वेगळ्या असता. संघ स्वयंसेवकांनी केलेल्या ह्या कामगिरीची दखल काँग्रेस पुढारी, भारताचे पहिले भारतरत्न चे मानकरी डॉ श्री भगवान दास यांनी केला. गांधी हत्ये नंतर संघावर लादली गेलेली संघ बंदी या संदर्भात डॉ भगवान दास यांनी पत्रकाद्वारे सरकारला विंनती केली की ” लाखो स्वयंसेवकांच्या राष्ट्रवादी शक्तीचा उपयोग संघबंदी उठवून करून घ्या. “

अर्थात श्री वसंतरावजी यांनी डॉ भगवान दास यांचेशी सुरवाती पासून ठेवलेला घनिष्ठ संपर्क, हे मुख्य कारण होय.

मूळ नागपूरचे मुख्यमंत्री ना. भा. खरे अलवर हे १९४७ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री ( दिवाण ) बनून आले. त्या वेळेस १९४७ मध्ये . त्यावेळी तेथील गृहमंत्री यांचेशी सरसंघचालक श्री गुरुजींचा संपर्क व परिचय वाढला.
त्यामुळे तेथे संघशिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे ना. भा. खरे यांचेशी संपर्क वाढल्याने राजेरजवाड्यात ओळख वृध्दिंगत झाली. त्याचा परिणाम संघकार्य तेथे रुजले.

१८५७ च्या प्रथम स्वातांत्र्य समराचा शताब्दी सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अध्येक्षतेखाली भारताच्या राजधानीत ( चांदणी चौकात ) साजरा करण्यात आला. त्या मागचे नियोजन श्री वसंतराव यांनी यशस्वीरीत्या सांभाळले. आणि संघटन कार्यातील तो एक कळसच ठरला. त्यामुळे सावरकरांनी त्यांना ” वसंतराय ” म्हणून संबोधण्यास सुरवात केली.

श्री गुरुजींच्या पूर्व परवानगीने वसंतरावांनी गोवा मुक्ति संग्रामात भाग घेतला. अंधाधुंद झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले. मात्र भारत सरकारने त्यांना सहा महिन्याचा कारावास न झाल्याने स्वातंत्र्य सैनिक म्हणून मान्यता दिली नाही. मात्र १९९९ मध्ये उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी सुचली व स्वातंत्र्य सैनिक ही मान्य दिली.

१९१४ : संघ संस्थापक डॉ . हेडगेवार यांच्या प्रभावळीतील प्रथम पंक्तीच्या कार्यकर्त्यांपैकी एक ज्यांनी संघ कार्यासाठी जीवन संघ समर्पित केलेले ज्येष्ठय प्रचारक श्री वसंतराव ओक यांचा जन्म.

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध उडिया लेखक राउतराय – यांना आपल्या वडिलांप्रमाणे त्यांना वकील व्हायचे होते. परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्या राजकीय हालचाली पाहून एल.एल. बी. किंवा एम. ए.चा अभ्यास करायला परवानगी नाकारली होती. बेकार बसण्यापेक्षा नोकरी करावी म्हणून त्यांनी १९३९ मध्ये कोलकात्याला बिर्ला ग्रुपच्या केशेराम ज्यूट मिलमध्ये नोकरी केली. वेगवेगळ्या खात्यात नोकरी करीत वीस वर्षांनी ते त्या मिलचे कार्यकारी संचालक झाले. पुढे कामगारविषयक बाबींवरून व्यवस्थापनाशी मतभेद झाले आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर त्यांनी कटक येथील ओरिसा गिरणी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले व तेथूनच मग ते निवृत्त झाले. नोकरी करीत असतानाही त्यांचे लेखनकार्य सतत सुरूच होते. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. पुढे त्यांनी किसान चळवळीतही सक्रिय काम केले. क्रांतिकारी कविता लेखनामुळे त्यांना अडीच महिन्यांची सजा झाली. पण अटक चुकविण्यासाठी ते वर्षभर भूमीगत राहिले. पण त्यांच्या काही कवितांवर ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती.

पारंपारिक मतप्रवाहातून बाहेर पडून राउतराय आपली शैली बदलत राहिले. पारंपारिक संकेत, बंधने, शैली यातून त्यांनी ओडिया काव्याला मुक्त केले आणि नवे आधुनिक वळण लावले. त्यांनी ओडिया काव्य अनअलंकृत पण सहजसुंदर बनविले. ओडिया काव्यात जेव्हा कल्पनारम्यतेचा अतिरेक झाला होता व समाजात दिखाऊ शिष्टाचार पाळले जात होते, तेव्हा स्पष्टपणे समाजातील काळी बाजू मांडून, गरीब बहिष्कृत माणसाला भोगाव्या लागणाऱ्या कष्टांचे वर्णन करणारे वास्तववादी काव्य त्यांनी लिहिले. काव्याचे सामाजीकरण केले.आशय व अभिव्यक्ती या दोन्ही बाबतीत त्यांची कविता नवीन आहे.

ओडिया काव्यात त्यांनीच प्रथम मुक्तछंदाचा यशस्वी वापर केला. म्हणूनच राउतराय यांना आधुनिक ओडिया कवितेचे भगीरथ व मुक्त छंदाचे पितामह अशा पदव्या प्राप्त झाल्या आहेत.

राउतराय यांनी ओडिया साहित्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण असे शोधकार्य केलेले आहे. भारतीय साहित्यातील मूल्य आणि आदर्शांचा विकास या संबंधातील त्यांचे शोधकार्य १९७२ मध्ये प्रकाशित झाले. त्यात त्यांनी पूर्ववैदिक युगापासून, सतराव्या शतकापर्यंत चर्चा केलेली आहे. असामान्य बुद्धिमत्ता व संवेदनशील जाणिवेचा प्रत्यय त्यांच्या टीकात्मक निबंधामध्येही परिणामकारक रीत्या येतो.

कविता, कथा, समीक्षा, संशोधन कार्य अशा विविध प्रकारे लेखनाची साधना करून राउतराय यांनी साहित्याच्या सर्व लेखनप्रकारांवर आपल्या रचना कौशल्याचा ठसा उमटवलेला आहे. सत्य, न्याय, संघर्षमय जीवन, मानवता यांच्या बाजूने त्यांनी सातत्याने लेखन केले आहे.पाथेय (१९३२),पूर्णिमा (१९३३),अभिजान (१९३८), रक्त शिखा (१९३९) बाजी राऊत (१९४२), हांसत (१९४८), कविता (१९६२), एशियार स्वप्न (१९६९) इत्यादी २१ कवितासंग्रह ; चित्रग्रीवा (१९३५) ही कादंबरी; मसानीर फूला (१९४७), माटीर ताज (१९४७), छई (१९४८) हे कथासंग्रह ; साहित्यविचार (१९६२), साहित्यार मूल्यबोध (१९८३) व आधुनिक साहित्यार केतक दिधा (१९८५) इत्यादी समीक्षाग्रंथ अशी त्यांची विपुल साहित्य संपदा प्रसिद्ध आहे.

ऑल इंडिया पोएट्स कॉन्फरन्स, कोलकाता, ओडिशा साहित्य अकादमी या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. वेळोवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय साहित्यिक परिषदांमधून सक्रीय भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. फिल्म सेन्सार बोर्डाचेही ते सदस्य होते. ओडिया कला-संस्कृती संग्रहालयाची स्थापना त्यांनी केली आहे .

त्यांचे बरेच साहित्य रशियन भाषेत अनुवादित झाले आहे. आंध्र विश्वविद्यालय व बरहामपूर विद्यापीठाने डी.लीट्. देऊन राउतराय यांना सन्मानित केले आहे. भारत सरकारचे पद्मश्री (१९६२), साहित्य अकादमी पुरस्कार (१९६२) तसेच सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार (१९६५) हे सन्मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतीय साहित्याला अमूल्य योगदानासाठी १९८६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याचे समजताच त्यांनी व्यक्त केलेली, “अशा प्रकारचा पुरस्कार मिळाल्याने कवीच्या अंतप्रेरणा स्फुरण पावतात, असे मला वाटत नाही. कारण कवी हा जन्मावाच लागतो”, ही त्यांची परखड प्रतिक्रिया बोलकी आहे.

१९१६: भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राउतराय यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००४)

  • घटना :
    १८८०: थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
    १९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.
    १९५०: फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.
    १९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
    १९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
    १९७०: नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
    १९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.
    २०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
    २०००: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.

• मृत्यू :
• १६२६: अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचे निधन.
१९५०: अधिकार किंवा द्रव्यप्राप्ती यांचा लोभ नसलेले विद्वान , प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर, १८७५)
२००१: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर, १९०६)
२०१०: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर ,१९१७)
• २०१०: लेखिका तारा वनारसे (रिचर्डस) यांचे निधन. (जन्म: १२ मे, १९३० )
• २०१३: भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी, १९५४)
• २०२१ : अध्यात्माला आयुष्य वाहून घेतलेल्या ज्येष्ठ समाजसेविका, कलेच्या आश्रयदात्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या , टाइम्स समूहाच्या अध्यक्षअशी बहुआयामी ओळख असलेल्या टाइम्स समूहाच्या अध्यक्षा पद्म भूषणइंदू जैन यांचे निधन ( जन्म : ८ सप्टेंबर, १९३६ )

  • जन्म :

१९१६: भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राउतराय यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००४)

१९१८: भरतनाट्यम नर्तिका पद्मविभूषण तंजोर बालसरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी, १९८४)
१९२५: दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर , २००४)
१९५१: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म. ( मृत्यू: २३ मे, २०१४ )
१९५६: आध्यात्मिक गुरू पद्मविभूषण श्री श्री रविशंकर यांचा जन्म.

आपला दिवस मंगलमय जावो.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »