माधव जूलियन

आज मंगळवार, जानेवारी २१, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२५
चंद्रोदय : ००:४७, जानेवारी २२ चंद्रास्त : ११:४८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – १२:३९ पर्यंत
नक्षत्र : चित्रा – २३:३६ पर्यंत
योग : धृति – ०३:५०, जानेवारी २२ पर्यंत
करण : बव – १२:३९ पर्यंत
द्वितीय करण :बालव – ०२:००, जानेवारी २२ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : कन्या – १०:०३ पर्यंत
राहुकाल : १५:३८ ते १७:०१
गुलिक काल : १२:५० ते १४:१४
यमगण्ड : १०:०२ ते ११:२६
अभिजितमुहूर्त : १२:२८ ते १३:१२
दुर्मुहूर्त : ०९:२९ ते १०:१३
दुर्मुहूर्त : २३:३३ ते ००:२४, जानेवारी २२
अमृत काल : १६:२३ ते १८:११
वर्ज्य : ०५:५४, जानेवारी २२ ते ०७:४२, जानेवारी २२
प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायीं ?
नाहीं जगांत झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्तीं आई, तरीहि जाची.
चित्तीं तुझी स्मरेना कांहींच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.
ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनियां दुज्यांचें वात्सल्य लोचनांहीं.
वाटे इथूनि जावें, तूझ्यापुढें निजावें,
नेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसावें !
वक्षीं तुझ्या परि हें केव्हां स्थिरेल डोकें,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तूं फिरूनी, येईन मीहि पोटीं,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी ! – कवी माधव जूलियन
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ
माधव जूलियन हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले . माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे. याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते.
गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते.
१८९४: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)
भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे मुख्य संयोजक क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्म २५ मे १८८६ रोजी बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील सुभलदा गावात झाला. त्यांनी चंदनगर येथून शिक्षण घेतले. भारताचा स्वातंत्र्यलढा, गदर चळवळ आणि आझाद हिंद फौजेची निर्मिती यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शालेय जीवनापासूनच ते क्रांतिकारी कार्याकडे आकर्षित झाले होते. बंकिमचंद्र यांच्या आनंद मठ या कादंबरीतून त्यांच्यात क्रांतीचा आत्मा जन्माला आला. याशिवाय स्वामी विवेकानंद आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या राष्ट्रवादी भाषणांमुळे त्यांच्या आत क्रांतीची ज्योत अधिक वेगाने धगधगू लागली. बंगालच्या फाळणीनंतर तर रासबिहारी यांचा इंग्रज विरोध अधिक आक्रमक झाला. त्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्धच्या कारवायांमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिले.
स्वातंत्र्य मिळवण्याची आस मनात इतकी होती की रासबिहारी बोस आपला उद्देश कधीच विसरले नाहीत. १९१४-१९१५ मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या पंजाबींनी गदर पार्टीची स्थापना केली होती. पक्ष स्थापनेचा उद्देश भारताला स्वतंत्र करणे हा होता. १९१४ मध्ये अमेरिकेत आणि कॅनडात स्थायिक झालेले भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी भारतात येऊ लागले. ते त्यांच्यासोबत दारूगोळाही आणत होते. या गदर चळवळीची कमान रासबिहारी बोस यांच्याकडे सोपवण्यात आली. बोस यांनी फेब्रुवारी १९१५ रोजी ब्रिटीश अधिकाऱ्यांविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली. मात्र, काही हेरगिरीमुळे इंग्रजांना या योजनेचा सुगावा लागला आणि ही योजना तडीस जाऊ शकली नाही.यानंतर इंग्रजांनी शेकडो क्रांतिकारकांची निर्दयीपणे हत्या केली.
१९१२ मध्ये रासबिहारी यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारकांनी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज यांना मारण्याची योजना आखली. बोस अभ्यासादरम्यान बॉम्ब बनवायला शिकले होते. डिसेंबर १९१२ मध्ये राजधानी स्थलांतराच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे ब्रिटिशांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बोस त्यांचे सहकारी बसंत कुमार बिस्वास यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित होते. बिस्वास यांनी लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बॉम्ब फेकला. हार्डिंग बॉम्बने जखमी झाले पण मरण पावले नाहीत.
व्हाईसरॉयच्या हत्येची योजना अयशस्वी झाली असली तरी ब्रिटिश राजवट हादरली. ब्रिटीश सरकारने क्रांतिकारकांना रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र यावेळीही रासबिहारी पळून जाण्यात यशस्वी झाले.
२८ मार्च १९४२ रोजी टोकियो येथे झालेल्या परिषदेनंतर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांनी सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष करण्याचे ठरले. मलाया आणि ब्रह्मदेशात जपान्यांनी पकडलेल्या भारतीय कैद्यांना इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि इंडियन नॅशनल आर्मीमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. १ सप्टेंबर १९४२ रोजी कॅप्टन मोहन सिंग आणि सरदार प्रीतम सिंग यांच्यासह रासबिहारी यांच्या प्रयत्नाने भारतीय राष्ट्रीय सेना अस्तित्वात आली. त्याला आझाद हिंद फौज असेही म्हणतात.महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील मतभेदाच्या वेळी रासबिहारी यांनी आझाद हिंद फौजेची कमान सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवली .
दुसरे महायुद्ध संपण्यापूर्वी २१ जानेवारी १९४५ रोजी रासबिहारी बोस यांचे टोकियो येथे निधन झाले. जपान सरकारने त्यांना दुसरा ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द रायझिंग सन दिला – परदेशी व्यक्तीला दिलेला सर्वोच्च पुरस्कार. पण त्याहूनही हृदयस्पर्शी म्हणजे जपानच्या सम्राटाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना दिलेला सन्मान. भारतीय ज्येष्ठ क्रांतिकारकाचे पार्थिव वाहून नेण्यासाठी इम्पीरियल कोच पाठवण्यात आले होते. परंतु, स्वतंत्र भारतात या महान देशभक्ताचा अस्थिकलश मातृभूमीला परत आणण्यातही अपयश आले.
१९४५: भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे मुख्य संयोजक क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन. ( जन्म: २५ मे १८८६ )
- घटना :
१७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
१८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
१८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.
१९७२: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
२०००: फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
• मृत्यू :
• १९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा बलिदान दिन . ( जन्म : २३ मार्च, १९२३ )
• १९६५: अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.
• १९९८: भारताचे ९ वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन. (जन्म: २१ जून , १९१६)
• २०१९ : चालत बोलता देव , बहिणव बसवण्णा म्हणून ओळखले जाणारे तुमकूरचे सिधदगंगा मठाधीश डॉ . शिवकुमार स्वामी यांचे वयाचे १११ व्या वर्षी बंगळूर येथे निधन. त्यांचे कडे सिधदगंगा मठाची जबाबदारी १९३० पासून होती. ९ दशक त्यांनी मठाची सेवा केली. त्यांचे कार्य लक्षात घेऊन कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा गौरव केला तर भारत सरकारने २०१५ साली पदमभूषण पुरस्काराने सन्मान केला ( जन्म : १ एप्रिल, १९०७ )
- जन्म :
१८८२: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९४३)
१९१०: गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे , १९७५)
१९२४: माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर, २००५)