आज दही हंडी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, सप्टेंबर ७, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष

युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद १६ शके १९४५
सूर्योदय : ०६:२४ सूर्यास्त : १८:४८
चंद्रोदय : ००:२७, सप्टेंबर ०८ चंद्रास्त : १३:२६
शक सम्वत : १९४५
संवत्सर : शोभन
दक्षिणायन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : निज श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – १६:१४ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – १०:२५ पर्यंत
योग : वज्र – २२:०२ पर्यंत
करण : कौलव – १६:१४ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०४:४७, सप्टेंबर ०८ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : वृषभ – २३:१३ पर्यंत
राहुकाल : १४:०९ ते १५:४२
गुलिक काल : ०९:३० ते ११:०३
यमगण्ड : ०६:२४ ते ०७:५७
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १३:०१

दही हंडी गोपाळ काला
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
अरे एक दो तीन चार संग पाँच छः सात हैं ग्वाला ॥
गोविंदा आला रे…॥

श्रीकृष्णाला बालपणी दही, दुध, लोणी या पदार्थाची आवड होती. पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे तो त्याच्या मित्रांमुळे यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत. याघटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातेा.

आज दही हंडी / गोपाळ काला दिन आहे

श्रीसंत ज्ञानेश्वर व त्यांच्या तिन्ही भावंडांना श्रेष्ठ वर्णात जन्म घेऊनही वर्णाश्रमाचे चटके सोसावे लागले. त्यांनी घेतलेल्या अनुभवांतून जाती व्यवस्थेच्या मुळे हजारो वर्ष अशाच विषमतेचे चटके सोसत असलेल्या बहुजनांच्या दुःखाशी ते एकरूप झाले. आपले जीवनशास्त्रांचे ज्ञान बहुजनांनाही मिळावे म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतील गीतेचे सार तत्कालीन प्राकृत या लोकभाषेतून देण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेतील सर्वात प्राचीन व सर्वोत्तम ग्रंथांतील एक म्हणून गणली जाणाऱ्या ‘ज्ञानेश्वरी’च्या लिखाणाला त्यांनी नेवासा येथे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सुरुवात केली. यावरून त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्ता व प्रतिभेची कल्पना करता येते. ‘अमृतानुभव’(Amrutanubhav) आणि ‘भावार्थ दीपिका’(Bhavarth Deepika) हे अन्य दोन ग्रंथही त्यांनी लिहिले. शेकडो अभंग तसेच ‘विरहिणी’ (विराणी) हा काव्यरचना प्रकारही त्यांनी मराठी साहित्याला दिला.


आध्यात्माचे शिक्षण हा कुणा एकाचाच अधिकार नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपला आध्यात्मिक विकास करू शकतो हा संदेश त्यांनी त्याकाळातील शोषितांच्या मनात जागृत केला. त्यामुळे आज वारकरी संप्रदायात अठरापगड जातींतल्या संतांचे अभंग व ग्रंथ आज आपल्या समोर आहेत. ज्या काळात वडिलांची चूक म्हणून ब्राम्हण असलेल्या भावंडांना शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्यात आला, त्या कळात बहुजनांना कनिष्ठ जातींना, शिक्षणाचा कोणता अधिकार असणार? त्यामुळे केवळ ब्राम्हणांना येणारी संकृत ही ज्ञानभाषा ज्ञानेश्वरांनी नाकारली.

बहुजन समाजाची भाषा असलेली सोपी प्राकृत भाषा त्यांनी बहुजनांची ज्ञानभाषा म्हणून वापरात आणली. त्यामुळेच केवळ भक्तीमार्गच नाही तर, वर्षानुवर्ष जातीव्यवस्थेचे दाहक अनुभव घेणाऱ्या बहुजन संतांना आपले अनुभव अभंगाच्या रुपात लिहून ठेवण्याचा मार्ग सापडला. आज आपल्याकडे असलेले वारकरी साहित्य ही केवळ धार्मिकच नाही तर समाजशास्त्राचा मोठा ठेवा आहे. वारकरी संप्रदायाचे प्रणेते म्हणून, बहुजनांच्या प्रकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून बहुजनांना लिहितं करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे कार्याची उंची हिमालयापेक्षाही खूप मोठी आहे.

आज श्रीसंत ज्ञानेश्वर जयंती आहे.

धाडसी हवाई सुंदरी नीरजा भानोत- नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलांपैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला. तो त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.’ नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवर नीरजा नावाचा हिंदी चित्रपट निघाला. यात नीरजाची भूमिका सोनम कपूर यांनी केली होती.

चित्रपटाचे दिग्दर्शक राम मधवानी होते. नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी. ५ सप्टेंबर १९८६ मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते.

नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्रायलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते.

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली. त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देऊन पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते.


निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले. नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरू केले.

तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यांपर्यंत पोहोचविले. नीरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या.
अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तिन जणांना मारून टाकले.

नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो चौथा अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजाने त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. १७ तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देऊन गेला. पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार दिला.अमेरिकेने जस्टिस फॉर व्हिक्टम ऑफ क्राईम ॲवार्ड हा वीरता पुरस्कार देऊन नीरजाला सन्मानित केले. भारताने नीरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले.


१९६३ : ४०० प्रवाशांचे प्राण वाचावेत म्हणून लहान वयात अतिरेक्यांना नामोहरम करणारी हवाई सुंदरी नीरजा भानोत यांचा जन्म (मृत्यू : ५ सप्टेंबर, १९८६)

रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप– यांनी अलाहाबाद येथून १९४८ मध्ये बी.एससी.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स (MSc) पदवी संपादन करून त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. पुढे १९६१ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पी.एचडी. संपादन केली.


सिडनी जवळील पॉट्स हिल येथे ६ फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (parabolic) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद – नारायणगाव येथे जगातील दुसर्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.


२०२० : पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप निधन झाले. (जन्म : २३ मार्च, १९२९)

घटना :
१६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
१८१४: दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
१८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
१९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
१९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
२००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.

  • मृत्यू :
  • १९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)
  • १९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९०२)
  • १९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन. (जन्म: ५ जून १९०८)
  • १९९७: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५१)
  • २०२० : पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद – नारायणगाव येथे जगातील दुसर्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम करणाऱ्या ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप (वय ९१ वषे) निधन झाले.

जन्म :
१७९१ : आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म (मृत्यू : ३ फेब्रुवारी, १८३२)
१८२२ : प्राच्य विद्या पंडित, समाजसेवक व धन्वंतरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म (मृत्यू : ३१ मे, १८७४)
१८४९ : हिंदुस्थानी शास्त्रीय गायक बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचा जन्म (मृत्यू : ९ फेब्रुवारी, १९२६)
१९१५ : पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात आसामी साहित्यिक व इतिहासकार, डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म (मृत्यू : १३ सप्टेंबर, १९९५)
१९१७ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै २००४)
१९२४ : तामिळ व तेलगू चित्रपट अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म (मृत्यू : २४ डिसेंबर, २००५)
१९३३ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित, मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.
१९३४ : बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म (२३ ऑक्टोबर, २०१२)
१९३४ : चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचा जन्म (मृत्यू : २५ जुलै, २०१२)

  • १९४० : लेखक व संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म (मृत्यू : १० डिसेंबर २०१४)

आपला दिवस मंगलमय जावो

(संकलन : संजय सोहोनी, पुणे) (संकलन सहकार्य : डॉ. वासुदेव शंकर डोंगरे, पुणे)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »