‘शून्य टक्के मिल बंद तास’चे लक्ष्य कसे साध्य करायचे?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नामवंत तज्ज्ञ आहेर यांचे सखोल मार्गदर्शन

सांगली : साखर कारखान्याच्या कार्यान्वयनात (ऑपरेशन्स) ‘मिल बंद तास’ शून्यावर आणण्याचे कसे प्रचंड फायदे आहेत, हे सोदाहरण स्पष्ट करत हे उद्दिष्ट किंवा लक्ष्य कसे साध्य करायचे यावर साखर उद्योगातील नामवंत तज्ज्ञ आणि डीएसटीए, पुणेचे संचालक वा. र. आहेर यांनी सखोल मार्गदर्शन केले.

शिरोळ तालुक्यातील श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड या साखर कारखान्याने येथील ‘ककून हॉटेल’मध्ये आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत आहेर बोलत होते.

‘शून्य टक्के मिल बंद तास’चे लक्ष्य कसे साध्य करायचे याचा ‘कानमंत्र’ त्यांनी ‘गुरुदत्त शुगर’च्या अधिकाऱ्यांना दिला.

“एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” असा संकल्प सोडून आपण सांगितलेल्या टिप्सचा उपयोग केल्यास कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळते, असे आहेर यांनी विविध उदाहरणांसह सांगितले. दुसर्‍या सत्रात “हायप्रेशर बॉयलरचे ऑपरेशन, मेंटेनन्स आणि सुरक्षितता, याविषयावरही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

एचआर मॅनेजर महेश जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून, श्री. आहेर यांचा परिचय करून दिला आणि नंतर त्यांचा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राहुल घाटगे यांनी सत्कार केला.

साखर कारखान्याचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. माधवराव घाटगे यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक राहुल घाटगे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यशाळेत, प्रसिद्ध सल्लागार श्री. औताडे, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह ऑफिसर उदय पाटील, चिफ इंजिनिअर सर्जेराव पाटील, चिफ केमिस्ट अतुल पवार, एच.आर. मॅनेजर श्री.पाटील, चिफ ॲग्री ऑफिसर विजय जाधव, सर्व खातेप्रमुख, इंजिनिअर, केमिस्ट आणि सर्व कारखाना अधिकारी यांची उपस्थिती होती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »