घ्या तिरंगा हाती..

साखर क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ श्री. वा. र. आहेर यांनी स्वातंत्र्य दिनीनिमित्त लिहिलेली ही खास कविता
।।घ्या तिरंगा हाती।।
हात माझे आज हे थरथरती।
कुणाचा झेंडा घेऊ मी हाती।।
धर्मपंथाचा,जातीचा,समाजाचा।
युनियनचा, पुरूषी विचारांचा।।
तांबडा,निळा,पांढरा,पिवळा।
हिरवा,लाल ,काळा, जांभळा।।
श्वास उरला तर सोन्याचा गोळा।
न उरला तर मी मातीचा गोळा।।
दगड बन, दगड बन माझ्या मना।
नीरक्षीर विवेक कर माझ्या मना।।
कान टवकारून ऐकताच किंकाळ्या।
थांबवा हलकल्लोळ अन आरोळ्या।।
थांबवा लाठ्या, अन बार बंदूकांचे ।
रक्षक व्हा दुरितांचे रक्षकव्हा वंचितांचे।।
थांबवा हल्ले दुराचारी दुर्जनांचे, ढोंग्यांचे।
फुंकर मारू हलके करू दुःख गरिबांचे।।
आवरा द्विधामनाची, कास धरू समतेची।
घ्या तिरंगा हाती, आण तुम्हा भारताची।।
रचनाकार : आहेर वा.र., नासिक
9958782982