जागतिक रक्तदाता दिवस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, जून १४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक २४ , शके १९४७
सूर्योदय : ०६:०१ सूर्यास्त : १९:१७
चंद्रोदय : २२:०५ द्रास्त : ०८:२५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – १५:४६ पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – ००:२२, जून १५ पर्यंत
योग : ब्रह्म – १३:१३ पर्यंत
करण : विष्टि – १५:४६ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०३:५१, जून १५ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मकर
राहुकाल : ०९:२० ते १०:५९
गुलिक काल : ०६:०१ ते ०७:४०
यमगण्ड : १४:१८ ते १५:५८
अभिजितमुहूर्त : १२:१२ ते १३:०५
दुर्मुहूर्त : ०६:०१ ते ०६:५४
दुर्मुहूर्त : ०६:५४ ते ०७:४७
अमृत काल : १७:४१ ते १९:२१
वर्ज्य : ०७:४१ ते ०९:२१
वर्ज्य : ०४:२८, जून १५ ते ०६:०६, जून १५

“लम्बोदराय वै तुभ्यं सर्वोदरगताय च।
अमायिने च मायाया आधाराय नमो नमः॥”

आज संकष्टी चतुर्थी आहे.

रक्तदान हे महादान आहे.

एका मानवाचेच रक्त दुसर्या गरजु मानवाला चालते.आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे.

आज जागतिक रक्तदाता दिवस आहे.

गोविंद बल्लाळ देवल (नोव्हेंबर १३, १८५५ – १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके – दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला, त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत.

बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल बाल गंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले.

• १९१६: मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)

भौतिक शास्त्रज्ञ कार्यमाणिवकम् श्रीनिवास कृष्णन् ( के एस कृष्णन ) – मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात काही काळ अध्यापन केल्यानंतर प्रख्यात शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांचे साहाय्यक म्हणून कृष्णन यांची नेमणूक झाली (१९२३–२८). पुढे १९२९–३३ या काळात डाक्का विद्यापीठात भौतिकीच्या प्रपाठकपदावर काम केल्यानंतर कलकत्ता येथील इंडियन ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेत त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १९४२ मध्ये अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकापदावर व १९४७ मध्ये दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली.
रामन यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णन यांनी प्रकाशकी व रेणवीय भौतिकी या शाखांत संशोधन केले. ‘रामन परिणाम’या रामन यांच्या सुप्रसिद्ध शोधाच्या संशोधनामध्ये कृष्णन यांनी फार बहुमोल सहकार्य केले.

रेणूंमधील चुंबकीय ग्रहणक्षमता व चुंबकीय विषयमदिक्ता (निरनिराळ्या अक्षांच्या दिशांत वेगवेगळे गुणधर्म असणे) यांच्या सूक्ष्म मापनासाठी त्यांनी कित्येक उपकरणे व यांत्रिक योजना तयार केल्या व त्यांच्या आधाराने प्रतिचुंबकीय (निर्वातापेक्षा चुंबकीय पार्यता कमी असलेल्या) आणि समचुंबकीय (निर्वातापेक्षा चुंबकीय पार्यता जास्त असलेल्या) स्फटिकरूप द्रव्यांच्या विषमदिक्तेसंबंधी महत्त्वाची निरीक्षणे नोंदली, या त्यांच्या कार्यामुळे स्फटिकरूप पदार्थांच्या आंतररचनेचा अभ्यास करण्यासाठी क्ष-किरण, पद्धतीव्यतिरिक्त एक नवीन पद्धती उपलब्ध झाली. या त्यांच्या संशोधनाची माहिती इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या नियतकालिकात तसेच अमेरिकेतील फिजिकल रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध होऊन कृष्णन यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली.

त्यांच्या संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना कॅव्हेंडिश प्रयोगशाळा, रॉयल इन्स्टिट्यूशन व स्ट्रॅसबर्ग येथील जागतिक चुंबकत्व परिसंवादात (१९३९) व्याख्याने देण्यासाठी पाचारण करण्यात आले. १९४० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला. त्यानंतर अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व (१९५६), भारताच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य, भारत सरकारचा पद्मभूषण किताब (१९५३) व भटनागर पारितोषिक (१९६१) हे बहुमान त्यांना मिळाले. १९४० साली ते इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे प्रमुख व १९५३ मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या सायन्स काँग्रेसच्या परिषदेचे अध्यक्ष होते.

१९६१ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भौतिक शास्त्रज्ञ कार्यमाणिवकम् श्रीनिवास कृष्णन् ( के एस कृष्णन ) यांचे निधन ( जन्म : ४ डिसेंबर, १८९८ )

घटना :
११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.

१८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.
१९०७: नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१९३८: सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.
१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.
१९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.
१९५२: अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
१९६२: पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.
१९६७: मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.
१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.
२००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.

• मृत्यू :

• १९८९: मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचे निधन.

• २०१०: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन. (जन्म: १२ जुलै, १९१३)

  • जन्म :
    १५३४: योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)
    १४४४: भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म.
    १९२२: हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म. (मृत्यू : ९ मार्च, १९७१)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »