जागतिक जल दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शनिवार, मार्च २२, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १, शके १९४७
सूर्योदय : ०६:४१ सूर्यास्त : १८:५०
चंद्रोदय : ०१:५०, मार्च २३ चंद्रास्त : ११:५२
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – ०५:२३, मार्च २३ पर्यंत
नक्षत्र : मूळ – ०३:२३, मार्च २३ पर्यंत
योग : व्यतीपात – १८:३७ पर्यंत
करण : बालव – १६:५८ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०५:२३, मार्च २३ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : धनु
राहुकाल : ०९:४३ ते ११:१४
गुलिक काल : ०६:४१ ते ०८:१२
यमगण्ड : १४:१६ ते १५:४८
अभिजितमुहूर्त : १२:२१ ते १३:१०
दुर्मुहूर्त : ०६:४१ ते ०७:२९
दुर्मुहूर्त : ०७:२९ ते ०८:१८
अमृत काल : २०:३३ ते २२:१६
वर्ज्य : १०:१८ ते १२:०१
वर्ज्य : ०१:४१, मार्च २३ ते ०३:२३, मार्च २३

आज जागतिक मुकाभिनय दिन आहे.

जागतिक जल दिन – हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे. प्रतिवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते.त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात.उदा.पाणी आणि ऊर्जा,पाणी आणि शाश्वत विकास इ.

आज पाणी दिवस (जागतिक पेय जल दिवस) आहे.

मधुसूदन कालेलकर – हे साहित्यातील आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव. वेंगुर्ले येथे शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईत आले. सुरवातीस ते गिरगावात रामचंद्र बिल्डिंग (आताचे सुंदर भवन)मध्ये राहण्यास आले. तिथे गणेशोत्सवाचा निमित्ताने त्यांनी त्यांचे पहिले नाटक लिहिले आणि आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला. मग त्यांनी आपला निवास वांद्रे पश्चिममध्ये येवले भवन येथे हलवला. तेथे त्यांनी कित्येक वर्षे विपुल साहित्यसंपदा निर्मिली, आणि तदनंतर वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास वसाहतीत त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य राहिले.

ते मराठी नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध झालेच पण त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ते गीतकार आणि पटकथाकार म्हणूनही प्रथितयश झाले. कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले. त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत. त्यांचे काही प्रमुख हिंदी चित्रपट ‘बात एक रात की,’ ‘ब्लफ मास्टर,’ ‘झुमरू,’ ‘फरार,’ ‘दुल्हन वही जो पिया मन भाये,’ ‘अखियों के झरोखों से,’ ‘गीत गाता चल,’ इत्यादि होते. त्यांनी चार नाटकांची निर्मिती केली. अनेक नाटकांचे गुजराती भाषेत प्रयोग झाले आणि होत आहेत, तर तीन ते चार नाटकांवर हिंदी व मराठीत चित्रपटही झाले आहेत.

फिल्म फेअर १९७८ चा सर्वोत्तम पटलेखनाचा पुरस्कार ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ या चित्रपटासाठी त्यांना देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात त्यांना एकूण नऊ वेळा सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद यांसाठी ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ (१९६४/६५ – दुहेरी पुरस्कार), ‘पाहू रे किती वाट’ (१९६५/६६), ‘अपराध’ (१९६९/७०), ‘जावई विकत घेणे आहे’ (१९७३/७४), ‘अनोळखी’ (१९७४/७५), ‘गुपचूप गुपचूप’ (१९८३/८४), तसेच ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७७/७८) या चित्रपटातील “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई” या आजतागायत अंगाई म्हणून घरांघरांत सुपरिचित असलेल्या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीत लेखनाचे पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या ‘अपराध मीच केला,’ ‘सागरा प्राण तळमळला’ व ‘शिकार’ ह्या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचे पारितोषिक मिळाले. “हा माझा मार्ग एकला” या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. ह्या व्यतिरिक्त त्यांना तीन वेळा रसरंग फाळके गौरवचिन्ह पुरस्कार देण्यात आला. गदिमा प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट लेखक म्हणून खास गौरव व परितोषकाने सन्मानित करण्यात आले. गुजरात सरकारने त्यांच्या कथेवर निर्माण झालेल्या ‘जन्मदाता’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथेचे पारितोषिक देऊन त्यांना मरणोत्तर पुरस्कृत केले. दिनांक १७ डिसेंबर १९८५ रोजी त्यांचे साहित्य सहवासातील राहत्या घरी निधन झाले.
त्यांनी लहिलेली नाते युगायुगाचे (नाटक) ,पेइंग गेस्ट (नाटक), मधुघट (व्यक्तिचित्रणे) हि काही पुस्तके आहेत.

१९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)

  • घटना :
    १७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
    १९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.
    १९४५: अरब लीगची स्थापना झाली.
    १९४९ : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एसएससी परीक्षा पद्धतीची सुरूवात झाली.
    १९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
    २०२० : भारतात करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ‘जनता कर्फ्यु’चं आवाहन केले. त्या दिवशी सर्व व्यवहार बंद होते.

• मृत्यू :

• १९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.
• २००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)

  • जन्म :
    १९४२: भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा आयोगाचे अध्यक्ष अरुणाचलम लक्ष्मणन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २०२०)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »