वाहन स्क्रॅपिंगसाठी रोडमॅप तयार करा : पंतप्रधानांची राज्याना सूचना

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 23 आणि 24 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये आयोजित पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन केले. हवामान बदल, प्लास्टिक कचरा, वन्यजीव आणि वन व्यवस्थापन यासारख्या विविध मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने आहे परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेत मोदींनी इथेनॉल मिश्रणाची स्पर्धात्मक अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आणि राज्यांना वाहन स्क्रॅपिंगसाठी रोडमॅप तयार करण्यास सांगितले.

“सहकारी संघराज्यवादाची भावना पुढे नेत, बहुआयामी दृष्टिकोनातून प्लास्टिक प्रदूषणाचे उच्चाटन, हवामान बदलाशी प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी राज्य कृती योजना यासारख्या मुद्द्यांवर चांगली धोरणे तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्यासाठी ही परिषद आयोजित केली जात आहे. लाइफ- लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट असे परिषदेचे ब्रीद आहे.

निकृष्ट जमीन पुनर्संचयित करणे आणि वन्यजीव संवर्धनावर विशेष भर देऊन वनव्याप्ती वाढवण्यावरही लक्ष केंद्रित केले जाईल, असे पंतप्रधानांच्या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना मोदी म्हणाले, “आम्हाला शाश्वत परिणामांसह अनुभवात्मक शिक्षणाची जोड देण्याची गरज आहे. तरुणांना आमच्या पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व शिकवण्याची गरज आहे.”

ते म्हणाले, “मी या परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व राज्यांना पर्यावरण संवर्धनातील सर्वोत्तम पद्धती शिकण्यासाठी आणि संपूर्ण भारतामध्ये यशस्वी उपाय लागू करण्याचे आवाहन करतो,”

पर्यावरणविषयक मंजुरी मिळण्यात येणाऱ्या गुंतागुंतीकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि देशवासीयांचे जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे येत आहेत.

पंडित नेहरूंनी 1961 मध्ये सुरू केलेल्या सरदार सरोवर धरणाचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. पर्यावरणाच्या नावाखाली रचलेल्या कारस्थानांमुळे त्याचे बांधकाम पूर्ण होण्यास अनेक दशके लागली, असा आरोप त्यांनी केला.

विविध जागतिक संस्था आणि प्रतिष्ठानांकडून कोट्यवधी रुपये घेऊन भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांच्या भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केले.

“हे षड्यंत्र उधळून लावण्यासाठी थोडा वेळ लागला, पण गुजरातच्या लोकांचा विजय झाला. या धरणाचे पर्यावरणाला धोका आहे असे वर्णन केले जात होते आणि आज तेच धरण पर्यावरणाच्या रक्षणाचा समानार्थी शब्द बनले आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »