केंद्र सरकारने हार्वेस्टरसाठी अनुदान द्यावे : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
आवडल्यास ही बातमी शेअर करा
एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम
राज्यातील उसाचे जास्तीत जास्त गाळप व्हावे, यासाठी या वर्षी येत्या एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी केली.
अपेडा
कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्रशिक्षण
डिसेंबर 1985 मध्ये केंद्रशासनाने कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्रशिक्षण कायद्याअंतर्गत APEDA ची स्थापना केली. देशात 15 प्रादेशिक कार्यालये असुन महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे वाशी एपीएमसी मध्ये अपेडाचे कार्यालय आहे. अपेडावर खालील अनुसुचित उत्पादनांच्या निर्यात प्रोत्साहन आणि विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
1.फळे भाज्या व त्यांची उत्पादने 8.अल्काहोलिक, नॉन अल्कोहोलिक पेये
2.मांस व मांस उत्पादने 9. तृणधान्य व उत्पादने
3. कुकुटपालन व उत्पादने 10. शेगंदाणे अक्रोड
4. दुग्धजन्य पदार्थ 11. हिरव्या मिरच्या
5. मिठाई बिस्कीटे बेकरी उत्पादने 12. काजु व उत्पादने
6. मध गुळ व साखर उत्पादने
7.कोको, चॉकलेट्स
यावर्षी तांदुळाचा समावेश अपेडा कायद्याच्या दुसऱ्या अनुसुचित आहे. सेंद्रीय निर्यातीसाठी, सेंद्रीय उत्पादन कार्यक्रम (NPOP) अंतर्गत अपेडा काम करते.निर्यातीला चालना देण्यासाठी पायाभुत सुविधा व दर्जा सुधारण्या बरोबर बाजारपेठांचा विकासात अपेंडा सहभाग घेते . अपेडा कृषी निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करते. बाजारविकास, पायाभुत सुविधा, व गुणवत्ता विकासात अपेडा सहभाग घेते अधिक माहीतीसाठी वेबसाईट http://apeda.gov.in पहावी.
पुण्यात साखर आयुक्तालयात गाळप हंगामाची आढावा बैठक त्यांनी घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘ पुढील वर्षी उसाचे क्षेत्र किती राहील, याची माहिती घेत आहोत. त्यामुळे आगामी काळात ऊस नोंदणीसाठी अॅप तयार करण्यात येणार आहे. त्याचा वापर करण्याचे आवाहन कारखान्यांना केले आहे. ई-पीक पाहणीद्वारे अनेक ठिकाणी सातबाऱ्याची नोंद होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या हंगामात ‘हार्वेस्टर’चे महत्त्व लक्षात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक हार्वेस्टर मराठवाड्यात पाठविण्यात आले आहे. अनेक कारखान्यांना आम्ही हार्वेस्टर घेण्याच्या सूचना केल्या आहेत.’ केंद्र सरकारने हार्वेस्टरसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करणार आहोत. राज्य सरकारकडे सगळ्याच गोष्टी मागत नाही. कारखानदारीला हातभार लावावा यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
……………
ब्राझीलपेक्षा भारतातच उत्पादन अधिक
ब्राझीलमध्ये गाळपाचा हंगाम सुरू झाला आहे. तेथे तीन हंगाम असतात. त्यापैकी दोन हंगाम सुरू झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ब्राझीलने ३३० लाख टन एवढी साखर उत्पादन केल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आकडे जाहीर करण्यात आले आहेत. देशात आजमितीला ३५७ लाख टन उत्पादन झाले आहे. तिसऱ्या हंगामात ब्राझीलकडून इथेनॉलच्या निर्मितीवर भर देण्यात येत असल्याने भारताच्या उत्पादनाची आकडेवारी ब्राझील पार करू शकणार नाही, असा विश्वास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.