जागतिक बालरक्षण दिवस

आज शुक्रवार, जून 6, 2025 युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक १६ , शके १९४७
सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:14
चंद्रोदय : 15:10 चंद्रास्त : 02:56, जून 07
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : निर्जला ( स्मार्त ) एकादशी – 04:47, जून 07 पर्यंत
नक्षत्र : हस्त – 06:34 पर्यंत
योग : व्यतीपात – 10:13 पर्यंत
करण : वणिज – 15:31 पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – 04:47, जून 07 पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि :कन्या – 20:06 पर्यंत
राहुकाल : 10:58 ते 12:37
गुलिक काल07:39 ते 09:19
यमगण्ड15:56 ते 17:35
अभिजित मुहूर्त : 12:11 ते 13:04
दुर्मुहूर्त : 08:39 ते 09:32
दुर्मुहूर्त : 13:04 ते 13:57
अमृत काल : 02:26, जून 07 ते 04:14, जून 07
आज जागतिक बालरक्षण दिवस आहे.
मास्ती वेंकटेश अय्यंगार – प्रख्यात कन्नड कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार व समीक्षक. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी.
श्रीनिवास या टोपणनावाने त्यांनी काव्य व कथालेखन केले. आधुनिक कन्नड लघुकथेचे ते जनक मानले जातात. लघुकथेच्या क्षेत्रात सर्वस्वी नवीन तंत्राचा अवलंब करून ती लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.कन्नड प्रांतात अत्यंत कौतुकाने त्यांना ‘मास्ती कन्नडद आस्ती’ (मास्ती कन्नडची संपत्ती) असे संबोधतात.
म्हैसूर राज्यातील मास्ती गावाजवळील होंगेन हळळी येथे त्यांचा जन्म झाला.त्यांची मातृभाषा तमिळ,पण सर्व लेखन कन्नडमध्ये आहे.बालपणी त्यांना गरीब परिस्थितीशी सामना करावा लागला.
शिवरामपट्टण,म्हैसूर,बंगलोर आणि मद्रास येथे त्यांचे शिक्षण झाले.त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या.अतिशय खडतर परिस्थितीत (वार लावून) त्यांनी एम. ए.(इंग्रजी)ही पदवी मद्रास विद्यापीठातून प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक मिळवून प्राप्त केली.एम. ए. झाल्यावर म्हैसूर राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यावेळ्च्या म्हैसूर संस्थानात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. ते उत्तम प्रशासक म्हणून गणले जात.१९४२ मध्ये ते अबकारी आयुक्ताच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून १९६२ पर्यंत त्यांनी जीवन मासिकाचे उत्कृष्ट संपादन करून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
इंग्रजीवर तसेच संस्कृतवरही त्यांचे चांगले प्रभुत्व होते, नाणावलेले वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक होता. ब्रिटिशांच्या इंग्रजीचा मोठा प्रभाव निर्माण झालेल्या काळात त्यांनी मातृभाषेतून बोलणे,लिहिणे कसे प्रतिष्ठेचे आहे त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. शिक्षणाचे माध्यम कन्नड असावे व शासकीय कारभाराची भाषाही कन्नडच असावी यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.
बी.ए. ला असतानाच १९१०–११ मध्ये त्यांची पहिली लघुकथा ‘रंगपन्न मदुवे’ (म. शी. रंगाचे लग्न) प्रसिद्ध झाली आणि त्यांनी कन्नड साहित्यक्षेत्रात पदार्पण केले.त्यांच्या प्रकाशित ग्रंथांची संख्या सु. ११८ भरते. त्यांनी भावगीते, कथाकाव्ये. नाटके (गद्य व पद्य), चरित्र, कथा, कादंबरी व कादंबरिका, ललित निबंध, समीक्षा, अनुवाद, आत्मचरित्र इ. प्रकारांत विपुल लेखन केले.
आधुनिक भारत निर्मितीच्या महत्त्वपूर्ण काळात ते लिहित होते.त्या संमिश्र काळाची वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातून उमटली. माणसावर मास्तींची नितांत श्रद्धा असून ती त्यांच्या सर्वच लेखनात प्रतिबिंबित झालेली आहे. त्यांनी आपल्या विविध कृतींतून माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याची सुखदुःखे आशा-आकांक्षा, यशापयश, त्याचे बरेवाईट अनुभव यांचे चित्रण केले. नैतिक मूल्यांचा आणि भारतीय परंपरेतील चांगल्या मूल्यांचा त्यांनी हिरिरीने व सतत पुरस्कार केला आहे.त्यांच्या साहित्याची पाळंमुळं भारतीय व कर्नाटकाच्या मातीत घट्ट रूजलेली आहेत.त्यांच्या साहित्यातील निर्मिती केंद्र ‘परिपक्वतेचे काव्य’ असल्याचे सांगितले जाते. त्या काव्याचा संबंध शांतीशी पोहचतो, आवेशाशी नाही. त्यांच्या प्रमुख चित्रित व्याक्तिरेखांतून हेच अधोरेखित होते.
मास्तींचे काव्यलेखन १९३० च्या सुमारास उदयास आलेल्या कन्नड कवींत वैशिष्ट्यपूर्ण आहे. बिन्नह आणि मनविमध्ये त्यांची सर्वस्वी नवीन प्रकारची हरिदासी भक्तीपरंपरेतील भक्तीगीते आहेत, तर मलारमध्ये ‘अष्टषट्पदी’ (सुनीते) आहेत. गौडर मल्ली, रामनवमी, मूकन मक्कळु, श्रीरामपट्टाभिषेक, नवरात्री (५ भागांत) ह्या त्यांच्या कथाकाव्यांत निर्यमक रचना व गद्यसदृश शैली असूनही त्यांत सहजता, प्रवाहीपणा, भावपूर्णता, कल्पनाविलास, जीवनदर्शन इ. गुणविशेष प्रकर्षाने प्रगट झाल्याचे दिसते. श्रीरामपट्टाभिषेकमध्ये त्यांनी राम हा अवतारी पुरुष नसून माणूस आहे व आपल्या सदाचरणाने व कर्तृत्वाने उच्चपदी पोहोचल्याचे प्रतिपादन केले आहे.
त्यांच्या श्रीरामपट्टाभिषेक या आख्यानात्मक बृहतकाव्यामध्ये दहा हजार काव्यपंक्ती आहेत.मूळ रामायणाचा सखोल अभ्यास, कवीची संवेदनशीलता मौलिकता व चिंतन यांचा परिपाक या त्यांच्या काव्यात दिसून येतो.देवतांच्या, पौराणिक तसेच ऐतिहासिक व वर्तमान काळाचा संदर्भ असलेल्याही कथा त्यामध्ये आहेत. त्यातून मानवी संस्कृतीची गूढ गहनता ते अधोरेखित करतात.माणसाचे जगणे कष्ट मुक्त व्हावे, त्यांना सुखसमाधान प्राप्त व्हावे, हाच त्यांच्या पुढे आदर्श होता.
त्यांना के.एम. पणिक्कर यांनी ‘कन्नड साहित्याचे भीष्माचार्य’ म्हणून गौरविले आहे.आपल्या प्रदीर्घ साहित्यसेवेत त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली व त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. १९४६ मध्ये मद्रास येथे भरलेल्या दक्षिण भारतीय भाषा परिषदेचे अध्यक्ष, १९६१ मध्ये मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे अध्यक्ष, अखिल भारतीय ‘पेन’ चे उपाध्यक्ष (१९७४) व नंतर अध्यक्ष (१९७६), कन्नड साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष (१९४३) व नंतर अध्यक्ष (१९५३), साहित्य अकादेमीचे फेलो (१९७४) तसेच सदस्य बेळगाव येथे १९२९ मध्ये भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इ. मानाची पदे त्यांनी भूषविली आहेत. म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना १९४२ मध्ये ‘राजसेवा प्रसक्त’ हा किताब देऊन तसेच कर्नाटक विद्यापीठाने (१९५६) त्यांना सन्मान्य डी. लिट. देऊन त्यांचा गौरव केला. १९६८ मध्ये सण्ण कथेगळु ह्या त्यांच्या कथासंग्रहास साहित्य अकादेमी पुरस्कार तर साहित्यातील सर्वोच्च असा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे (१९८३)
१८९१ : भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित मास्ती वेंकटेश अय्यंगार कन्नड लेखक मास्ती वेंकटेश अय्यंगार यांचा जन्म . ( मृत्यू : ६ जून, १९८६)
• १९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६)
- घटना :
१८०८: जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१८८२: मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार.
१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.
१९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.
१९४४: ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.
१९६८: रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.
१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
१९७०: सी. हेन्केल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
१९७१: सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.
१९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९८२: इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
१९९३: मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
२००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा भाषा म्हणून घोषित केली.
• मृत्यू :
• २००२: मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
- जन्म :
१८९१: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार यांचा जन्म. ( मृत्यू :६ जून १९८६)
१९०३: भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म.
१९०९: अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे यांचा जन्म.
१९१९: गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू : २३ सप्टेंबर, १९८७ )
१९२९: पद्मश्री पुरस्कार सन्मानित अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री सुनील दत्त त्त यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)
१९३६: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते डी. रामनाडू यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी , २०१५)
१९५५: भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक सुरेश भारद्वाज यांचा जन्म.