थकित एफआरपी १५ टक्के व्याजासह द्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली ः थकित एफआरपी रक्कम, १५ टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. आगामी हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र शासनाने निर्यात साखरेला चांगला भाव दिला आहे. कारखान्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे २०० रुपये वाढवून द्यावेत. कारखाने बिगर सभासदांकडून घेत असलेले पैसे बेकायदेशीर आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवींची मागणी करावी,’’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »