खासगी वजनकाट्याला ‘येडेश्वरी’ची मान्यता
बीड : खासगी वजन काट्यावर उसाचे वजन करण्याच्या ठरावाला येडेश्वरी साखर कारखान्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही वजन करून ऊस घातला, तरी ते वजन ग्राह्य धरले जाईल.
चेअरमन बजरंग सोनवणे यांनी 24 तासाच्या आत या ठरावाला सहमती दर्शविली आहे. त्यामुळे बजरंग बप्पा हे खर्या अर्थाने शेतकर्याचे हित जपत असल्याचे पहायला मिळत आहे.
केज तालुक्यातील बनसारोळा या ठिकाणी शेतकरी नेते अच्युत बापू गंगणे, भाई मोहन गुंड व त्यांच्या सहकार्यांनी (दि.19) नोव्हेंबर 2023 रोजी ऊस व्यवसाय उद्योजक परिषद बनसारोळा या ठिकाणी घेतली, या परिषदेमध्ये ऊस उत्पादनाच्या अनेक बाबींवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली,त्यामध्ये अनेक ऊस उत्पादक शेतकरी हिताचे ठराव घेण्यात आले, त्यापैकीच सर्वात महत्त्वाचा असणारा ठराव त्या ठिकाणी असलेले ऊस उत्पादक शेतकरी किशोर तात्या थोरात यांनी उसाच्या वजनाविषयी शेतकर्यांमध्ये संभ्रम आहे.तो दूर करण्यासाठी, कारखान्याच्या वजना अगोदर शेतकर्यांच्या उसाच्या वजनाची खातरजमा करण्यासाठी खासगी वजन काट्यावर वजन करण्याची मुभा द्यावी असा ठराव सुचविला.
त्या ठरावाला सर्व शेतकर्यांनी एकमताने पाठींबा दिला. या ठरावाची नोंद घेत केज तालुक्यातील शेतकरी पुत्र असलेले येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन यांनी 24 तासाच्या आत सहमती देत त्या ठरावाचे स्वागतही केले व या ठरावाला आमची मान्यता आहे, असे स्पष्ट सागितले, त्यामुळे येडेश्वरी कारखाना हा खर्या अर्थाने सर्वसामान्य शेतकर्यांचा आहे.हे पुन्हा आणखी एकदा दाखवून दिले
येडेश्वरी कारखान्याच्या परिसरातील शेतकर्यांनी कारखान्याने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करून अभिनंदन केले.या निर्णयामुळे शेतकर्यांच्या मनातील संभ्रम दूर होऊन कारखाना व शेतकरी यांच्यामधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे.