३५०० रुपये दर द्या; शेतकरी संघटनेची मागणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : २०२२-२३ हंगामात कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.

हे निवेदन संघटनेने कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे सुपूर्द केले. शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले, रामचंद्र कणसे, किसन पाटील, शंकर कापसे, मोहन परमने, आप्पा हरताळे, हिंदुराव अस्वले, हणमंत कणसे, दयाभाऊ कांबळे यांच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन दिले.

गाडे म्हणाले, २०१८-१९ हंगामातील केन अँग्रो एनर्जी या कारखान्याकडील थकीत रक्कम ठरवण्याचे काम कर्ज वसुली न्यायाधीकरणाकडे चालू आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. म्हणून शेतकऱ्यांनी वैयक्तिक अथवा एकत्र अर्ज करून आपले नांव, ऊसाचे वजन व रक्कम कळविण्याची गरज आहे. शेतकरी माहिती देतील, त्यांचेच पैसे मिळणार आहेत. तसेच वसंतदादा साखर कारखान्यांकडे २०१३- १४ च्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची काही बिल थकीत आहेत. थकीत ऊसबिला विषयी कारखान्याने येत्या आठवड्यात शेतकरी व रक्कमांची अंतिम यादी देणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »