ऊस वाढीच्या अवस्था, हवामान आणि जमीन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी

Dr. Balkrushna Jamdagni

भारतामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश यासारखे अतिथंड प्रदेश वगळले तर सर्वत्रच उसाची शेती होते. हवामानाच्या आणि शेतीच्या प्रकारानुसार उसाच्या बाबतीत दोन मुख्य भाग आहेत.

१. उष्णकटिबंधातील राज्यांचा पट्टा (ट्रॉपिकल – प्रदेश)
महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि ओरिसा

२. समशीतोष्ण कटिबंधातील राज्यांचा पट्टा (सबट्रॉपिकल – प्रदेश)
उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाना, राजस्थान, प. बंगाल, मध्यप्रदेशाचा काही भाग

स्वच्छ सूर्यप्रकाश, मुबलक पाणी आणि वाढीच्या विविध अवस्थानुसार योग्य तापमान मिळाल्यास उसाची उत्तम वाढ होते. जेव्हा सूर्यप्रकाशापासून १८ ते ३६ मेगॅज्युवेल प्रति चौरसमीटर ऊर्जा मिळते तेव्हा वाढ उत्तम होते. सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी झाल्यास फुटवे कमी येतात. ढगाळ हवामान व सापेक्ष आर्द्रता जास्त असल्यास फुटवे कमी येतात, रोग व किडी वाढतात, उत्पादन घटते. लागणीच्या वेळी दिवसाचे तापमान ३५° से. च्या दरम्यान व रात्रीचे तापमान २२ ते २५° से. हे अनुकूल असते. बेण्याची उगवण, फुटवे व मोठ्या वाढीच्या काळात सापेक्ष आर्द्रता ६० ते ७०% असणे हे अनुकूल असते. परिपकतेच्या वेळी कोरडे हवामान, भरपूर सूर्यप्रकाश, रात्रीचे हवामान थंड असणे व पाऊस नसणे अशी परिस्थिती योग्य होय. कोकणातील जास्त आर्द्रता, विदर्भातील फडक उन्हाळा, प. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती ही ऊस शेतीतील नैसर्गिक आव्हाने आहेत.

वाढीच्या अवस्था व हवामान

ऊस हे दीर्घमुदतीचे पीक आहे. या पिकाच्या वाढीच्या चार महत्वाच्या अवस्था आहेत.
१. उगवण आणि आरंभवाढ
२. फुटव्यांची अवस्था
३. मोठ्या वाढीची अवस्था
४. परिपकतेची अवस्था

या चार अवस्थातून जाणाऱ्या जीवनकाळात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू येतात. पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये विशिष्ट हवामानाची गरज असते. हे समजून घेऊन लागवडीचे नियोजन केले तर पीक उत्तम साधते.

उगवण आणि आरंभवाढीची अवस्था (७ ते ३० दिवस)

उसाचे बेणे जमिनीत लावल्यापासून त्याचे कोंब शेतात दिसू लागण्याची जी अवस्था असते तिला उगवणीची अवस्था म्हणतात. यासाठी २० ते ३२° से. तापमानाची आवश्यकता असते. तापमान जर २०° से. च्या खाली गेले तर उगवणीचा वेग मंदावतो. लागणीपासून ७ ते १० दिवसात कोंब दिसू लागतात. महिनाभरात उगवण पूर्ण होते. बेणे १० महिन्याचे कोवळे शेंड्याकडील व रसरशीत असेल तर उगवण लवकर होते. चांगली पूर्वमशागत व पुरेसा ओलावा असेल तर उगवण जलद होते. तापमान १०° से. पेक्षा कमी झाल्यास उगवण होत नाही. अती खोलवर (दोन इंचापेक्षा अधिक) काड्या लावल्यास उगवण उशीरा होते.

फुटव्याची अवस्था ( ४० ते १२० दिवस)
लागणीपासून ४० दिवसांनी फुटव्यांची अवस्था सुरू होते. ती १२० दिवसांपर्यंत चालते. जेव्हा रात्रीचे तापमान १८° से. आणि दिवसाचे कम काल तापमान ३५° से. तसेच दिवसाचे सरासरी तापमान २६° से. च्या दरम्यान राहते. तेव्हा फुटवे भरपूर येऊ लागतात. कमाल तापमान ३५० से. पेक्षा जास्त आणि किमान तापमान १८ से. पेक्षा कमी झाले तर फुटव्यांचे प्रमाण कमी होते. ही एक शारीरिक क्रिया आहे. जमिनीखाली असलेल्या खोडावरील

डोळ्यापासून फुटवे सुरु होतात. हवामान ढगाळ असेल आणि दिवसभरात कमी वेळ सूर्यप्रकाश असेल तर फुटव्यांचे प्रमाण कमी राहते. स्वच्छ व दीर्घकाल सूर्यप्रकाश मिळाल्यास भरपूर फुटवे येतात. लवकर येणारे फ टवे सशक्त, जाड, वजनदार उसामध्ये रूपांतरित होतात. उशिरा येणारे फुटवे लहान, अपरिपक राहतात किंवा मरून जातात. लागणीपासून ९० मे १२० दिवसांच्या काळात जास्तीत जास्त फुटवे १५० १८० दिवसाच्या यातले ५०% मरून जातात. उसाची लागण खूप दाट झाली असल्यास १८० दिव भरतच राहातात.
आरंभी आलेले फुटवे तेवढे जगतात. सरीची योग्य रूदी (५ फूट), लावणीचे योग्य अंतर (५० से.मी.), छत पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण यामुळे फुटव्यांच्या शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या क्षमतेवर चांगला परिणाम होतो. फुटये खूप येतात पण त्यात भरणारे फुटवे जास्त असतात.
रोपे किया फाट्या जमिनीखाली २ इंचापेक्षा अधिक खोलीवर लावल्यामुळेसुद्धा फुटव्यावर अनिष्ट परिणाम होतो. शिवाय जमिनीत ना प स्फुरदाचे प्रमाण कमी असल्यामुळेसुद्धा फुट की येतात. जमिनीतील ओलाव्याचे अवाजवी प्रमाण उगवण व फुटव्यांना अपायकारक ठरते, अधिक तापमान, पाण्याचा ताण आणि तणाचा प्रादुर्भाव यामुळे फुटवे कमी येतात. एक डोळ्यांच्या काडीला अधिक फुटये येतात, तसेच तणाच्या प्रादुर्भावामुळे कमी फुटवे येतात. फुटवे शेवटपर्यंत टिकून त्यांचे गाळपयोग्य उसात रुपांतर करण्यासाठी संजीवकांच्या फवारणीचा चांगला उपयोग होतो.

मोठ्या वाढीची अवस्था (पंडो पिरियड १२० ते २७० दिवस)

लागणीनंतर चार महिन्यांनी मोठ्या वाढीची अवस्था सुरू होते. ती २७० च्या दिवसापर्यंत चालते. उबदार हवामान, पुरेसा पाऊस असे हवामान दीर्घकाळ मिळाले आणि जोराचा वारा नसेल तर उसाच्या मोठ्या वाढीच्या अवस्थेला जोर येतो. या काळात फुटव्यांची संख्या स्थिरावते. कांड्यांची लांबी, संख्या व जाडी वाढते. नवीन पाने जलद येतात. प्रत्येक पानाच्या कुशीत एक कांडे जन्म घेते. दर महिन्याला ३ ते ४ फांड्या घेतात. पावसाळी हवेत ही अवस्था आली तर हवेतील सापेक्ष आर्द्रता ८०% पेक्षा जास्त मिळते, दिवसाचे कमाल तापमान ३२° से व किमान तापमान २०° से. च्या दरम्यान राहते.
त्यामुळे पानांची संख्या, लांबी, रुंदी जलद वाढते पानाचे क्षेत्रफळ व जमिनीचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर (लीफ एरिया इंडेक्स) से ७ च्या दरम्यान राहते. खत व पाण्याचे चांगले व्यवस्थापन, दमट उबदार हवा, (स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर मोठी वाढ झपाटयाने होते. या काळात चारे वाहतात. गाशी ९ ते १० कि. मी. असेल तर पिकाला त्रास होत नाही पण ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाच्या वाऱ्याने पीक लोळते, मोडते, नुकसान होते. पाण्याचा ताण पडला तर कांड्या आखूड होतात.

परिपक्वतेची अवस्था
दहाव्या महिन्यापासून परिपकतेची अवस्था सुरु होते. शाखीय वाढ मंदावते. साखर (ग्लुकोज) निर्मिती व तिची कांड्यामध्ये साठवण सुरु होते. या अवस्थेत ग्लुकोज, फुक्टोज या साध्या साखरेचे सुक्रोज या कारखान्यातून आहेर पडणाऱ्या साखरेच्या रूपात परिवर्तन होते. उसाच्या बुडख्यांकडून परिपकता सुरू होते. तो शेड्यापर्यंत हळूहळू चालू राहते. बुडखे आधी परिपक होतात. शेंडे शेवटी परिपक्क होतात. थंड व कोरडे हवामान परिपक्कतेस अनुकूल असते. स्वच्छ सूर्यप्रकाश, दिवसाचे तापमान २३ ते २८° से. रात्रीचे ७ ते १४° से. आणि सापेक्ष आर्द्रता ५० ते ५५% असेल तर ऊस चांगला परिपाक होतो. त्यामुळे साखर उतारा वाढतो.
ऊस लागणीचे हंगाम
ऊस लागणीचे तीन प्रमुख हंगाम आहेत.
१. सुरू हंगाम – १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी
२. पूर्व हंगाम – १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
३. आडसाली – १५ जुलै ते १५ ऑगस्ट

उन्हाळी मशागत, फेरपालटीची व हिरवळीच्या खताची पिके, सेंद्रिय खते यांनी जमीन समृद्ध केल्यास आडसाली लागणीमध्ये खात्रीशीरपणे विक्रमी उत्पादन घेता येते पण १५ जुलैपूर्वी लागण केल्यास तुरा येण्याचा संभव असतो. जुलै लागणीमध्ये पेरांची संख्या भरपूर मिळते ऑगस्ट लागणीच्या उसाची कांडीलांग मिळते पण जुलै लागणीचे टनेज चागले. परंतु १५ जुलै १५ ऑगस्ट दरम्यान पाऊस खूप पडला तर लागण करणे शक्य होत नाही. ही परिस्थिती टाळण्यासाठी १५ ते २० जुलै या दरम्यान ‘सुपर फैन नर्सरी टेक्निक’ बेणे रुजायला घालावे. पाऊस संपेपर्यंत रोपे एक महिन्याची होतात. त्यांची लागण करावी. १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळातही उत्तरा हसा नत्राचा हमखास मोठा पाऊस पडतो. लागण करणे अवघड होते. यासाठी अशीच रोपे करून लाबाबत १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी लागणीला परिपलेसाठी जेमतेम १३ महिने मिळतात

उसासाठी जमीन
ज्या जमिनी ११.५ मीटर खोल आहेत, उतार ०.३० से ०६०% आहे. अलधारणाशक्ती ५०% च्या दरम्यान आहे. सामू (पीएच) ६.५ ते ८.५०५ पेक्षा कमी, चुनखडी १.५% पेक्षा कमी अशा मध्यम पोताच्या भरपूर अन्नद्रव्ये असणाऱ्या उत्तम निचऱ्याच्या जमिनी उसासाठी चांगल्या आडसाली ऊस अशा जमिनीत चांगला येतो. या जमिनीत जस्ताचे प्रमाण कमी असू शकते.

नदी काठच्या गाळाच्या मळी जमिनीमध्ये ऊस खूप चांगला येतो. कारण याचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म चांगले असतात. अशा जमिनीत मुळे खोल जातात. अद्रव्याचे शोषण चांगले होते. उसाच्या काड्या लांब व जाड निपजतात. उंची भरपूर येते. या जमिनीत उगवणसुद्धा जलद होते. खोडवे चांगले येतात, पालाश व जस्ताला चांगला प्रतिसाद मिळतो. या जमिनीचा निचरा चांगला असल्यामुळे पाण्याबरोबर नत्राचा हास होतो. त्यामुळे युरियाबरोबर ६:१ या प्रमाणात निबोळीपेठ द्यावी, नदीकाठच्या मळी जमिनीत पुराचे पाणी येते व साठून राहते आणि उसाला घरच्या काठ्यांना प्राणवायुसाठी (श्वसन) मुळ्या सुटतात. अशा परिस्थितीत को ७५२७, कोएम ७१२५ किंवा एम ०२०२ असे वाण घ्यावेत. या प्रकारच्या जमिनींमध्ये लव्हाळा, हराळी या तणांचे नियंत्रण परचेवर करावे लागते.
दीड मीटरपेक्षा जास्त खोल, गर्द काळ्या किंवा भुरकट काळ्या जमिनीत अग्रव्यांचा भरपूर साठा असतो. थोडीशी रखते दिली तरी चांगले उत्पादन मिळते. या जमिनीची जलधारणाशी चांगली असते. पण विन्याचा वेग कमी असतो. त्यामुळे अवाजवी पाणी दिल्यास या जमिनी खारवट, चोपण नापीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरवातीपासूनच बाजूने चर काढून निचरा होईल हे पहावे लागते. अशा जमिनीत सेंद्रिय खते भरपूर पालावीत. चांगला वाफसा असेल तेव्हाच मशागत, आंतरमशागत करावी. आवश्यकता असल्यास जामसारखे भू-सुधारक वापरावे.

काही जमिनी हलक्या असतात. मुरमाह किया पाठ्युक्त असल्यामुळे पाण्याचा निचरा फार जलद होतो. यांची खोली १ फुटापेक्षा कमी असते. या अभिनी खारवट किया घोषण होण्याची भीती नसते. सेंद्रिय खते व फेरपालटीची पिके यांचाही समावेश असावा. यामध्ये अन्नद्रव्यांचा साठा कमी असतो. त्यामुळे वरखतांना चांगला प्रतिसाद मिळतो. पाण्याच्या नि रखते पाहून जातात. म्हणून पाणी देऊन झाल्यावर वाफसा असताना सेंद्रिय खतामध्ये बिराळून वरखते द्यावीत. ती अधिक त्यास वरचेवर थापीत युरिया हा निबोळी पेंडीबरोबरच द्यावा. सर्व मन्ये सेंद्रिय खताची,

उसासाठी अयोग्य जमिनी
(१) क्षारयुक्त चोपण व खारवट पोषण जमिनी
२) खडकाळ, मुरमाड, १ फुटापेक्षा कमी खोलीच्या जमिनी

३) मुक्ता चुना २५% पेक्षा जास्त असलेल्या जमिनी
४) अति उताराच्या डोंगराळ जमिनी
(५) गावठाणाच्या एकदम पांढऱ्या मातीच्या जमिनी

खारवट चोपण जमिनी
(१) या जमिनीचा सामू जास्त असतो
२) लोह, मैगनी कि बोरॉन, फॉस्फरस ही अत्यावश्यक अध्ये उसाला उपलब्ध होत नाहीत.
(३) सोडियमचे प्रमाण जास्त अस्थाम जमीन शिषड चोपण
(४) पाण्याचा निचरा होत नाही.
(५) जमिनीची जडणघडण बिघडते, मुळाची वाढ चांगली होत नाही.
(६) अशा जमिनीत उसाची चांगली वाढ होऊनही रसाचा ब्रिक्स, पोल, शुद्धता २ मे २.५ युनिटने कमी होते.

खारवट जमिनी सुधारण्यासाठी उपाय
१) शेवरी किंवा लसुणघाशासारखी फेरपालटीची पिके घ्यावीत
२) एक हेक्टर क्षेत्रासाठी २ टन जिप्सम आणि ३ टन शेणखत मातीत पसरावे.
३) हेक्टरी १० टन भाताचे तूस किंवा भुईमूगाच्या शेंगाची फोलपटे मातीत मिसळावीत,
४) हेक्टरी २० टन प्रेसमड केक मिसळावे.

आम्लधर्मीय जमिनी (अॅसिडीक सॉईल्स)
१) या जमिनीचा सामू ५.५ पेक्षा कमी असतो..
२) अल्युमिनियम, लोह, मॅगनीज यांचे विषारी परिणाम जाणवतात.
३) फॉस्फेट फिक्सेशन जास्त होते. नायट्रीफिकेशन क्रिया मंद होते. त्यामुळे नत्र मिळत नाही.
४) जलधारणाशक्ती कमी होते.
५) मॉलिब्डेनम, सिलिकॉन, सल्फर, कैल्सियमची कमतरता होते. त्यामुळे पीक वाचत नाही..

आम्लधर्मीय जमिनी सुधारण्यासाठी उपाय
१) अशा जमिनीची सुधारणा करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी सरीमध्ये चुना किंवा प्रेसमड केक टाकावा.

२) सामूनुसार चुना हेक्टरी ४०० से ५०० किलो मातीत मिसळावा.

(लेखक नामवंत ऊसतज्ज्ञ असून, पाडेगाव ऊस विकास केंद्रातील निवृत्त संशोधक आहेत.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »