डॉ. शिवाजीराव कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : नवे तंत्रज्ञान, उच्च गुणवत्ता आणि आर्थिक शिस्तीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक, तसेच भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम (सर) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करत उल्लेखनीय सामाजिक योगदान दिल्याबद्दल डॉ. शिवाजीराव कदम यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांनी उद्योग, शिक्षण, पर्यावरण, समाजिक क्षेत्र इ. क्षेत्रांमध्ये नवे मानदंड निर्माण केले आहेत. त्यांच्या या कार्याचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »