बायो मॅन्युअर साखर उद्योगासाठी गेम चेंजर ठरणार : डॉ. पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डीएसटीए आयोजित सेमिनारला प्रचंड प्रतिसाद

पुणे : सीबीजी अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनादरम्यान तयार होणारे बायो मॅन्युअर साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. एस. व्ही. पाटील यांनी केले.

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (इंडिया) (DSTAI) च्या वतीने आयोजित एक दिवसीय सेमिनारमध्ये ते बोलत होते. ‘न्यू एनर्जी, न्यू फ्युचर : दी नेक्स्ट जन शुगर कॉम्लेक्स’ (नवऊर्जा, नवभविष्य : भविष्यातील साखर उद्योग रचना) हा सेमिनारचा विषय होता. महाराष्ट्र, गुजरात इ. राज्यांतून साखर कारखाना प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

S B Bhad, Pune
सेमिनारच्या उद्‌घाटन सत्रात बोलताना डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड

उद्‌घाटनपर सत्रात  DSTAI चे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. बी. भड यांनी साखर उद्योगात ऊर्जा बचतीचे महत्त्व विशद केले आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करण्याची गरज आहे, यावर सविस्तर विवेचन केले. यावेळी व्यासपीठावर एस. व्ही. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष (तंत्र) बोखारे, व्ही. एम. कुलकर्णी, राज प्रोसेसचे एमडी अनिलराज पिसे इ. ची उपस्थिती होती.

पाटील यांच्याखेरीज अनिलराज पिसे, सीबीजी प्रकल्पाची यशस्वी उभारणी करणारे जकराया शुगरचे एमडी सचिन जाधव, बायोवेस्ट पासून ऊर्जा आणि खते कसे बनवता येतील यावर बिनू पणिकर, अन्नधान्यावर आधारित डिस्टलरीवर संतोष पवार, ‘एमव्हीआर’द्वारे झिरो स्टीम डिस्टिलरीवर ललित सोळंकी, डिस्टिलेशनसाठी कमीत कमी पाण्याचा वापर यावर कैलासपती मिश्रा यांच्यासह सचिन सावंत, मनदीप सिंग, भायग्यश्री घोंगडे यांचेही सादरीकरण यावेळी झाले.

एस. व्ही. पाटील यांनी इथेनॉल, सीबीजी उत्पादनातील संधी आणि आव्हाने यावर सविस्तर सादरीकरण केले. कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीबीजी हे स्वच्छ उर्जेचे मानक बनले आहे, असे नमूद करताना त्याच्या उत्पादनातील अडचणींवरही त्यांनी भाष्य केले.

पाटील पुढे म्हणाले की, सीबीजी उत्पादना दरम्यान, ‘एसएफओएम’ हे बायोमॅन्युअर बाहेर पडते. हा उपपदार्थ भविष्यात भारतीय साखर उद्योग आणि शेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्याचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये २० टक्के वाढ होते, सध्याच्या रासासनिक खतांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते, रासायनिक नायट्रोजन आणि फॉस्फरसची गरज तो भरून काढतो, जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढवते, सेंद्रीय शेतीसाठी ते वरदान ठरणारे आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »