जगन्नाथ रथयात्रा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, जून २७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक ६, शके १९४७
सूर्योदय : ०६:०३ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : ०७:४३ चंद्रास्त : २१:२३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – ११:१९ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – ०७:२२ पर्यंत
योग : व्याघात – २१:१० पर्यंत
करण : कौलव – ११:१९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २२:३१ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ११:०२ ते १२:४२
गुलिक काल : ०७:४३ ते ०९:२२
यमगण्ड : १६:०१ ते १७:४०
अभिजितमुहूर्त : १२:१५ ते १३:०८
दुर्मुहूर्त : ०८:४३ ते ०९:३६
दुर्मुहूर्त : १३:०८ ते १४:०१
अमृत काल : ००:२४, जून २८ ते ०१:५७, जून २८
वर्ज्य : १५:०६ ते १६:३९

जगन्नाथ रथयात्रा ही एक प्रसिद्ध धार्मिक यात्रा आहे, जी भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरात दरवर्षी काढली जाते. ही यात्रा भगवान जगन्नाथ (विष्णू किंवा कृष्णाचे एक रूप), त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत काढली जाते.
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा सुरू होते आणि नऊ दिवस चालते. या काळात, तीनही देवतांचे लाकडी रथांमध्ये विराजमान होऊन नगरातून भ्रमण केले जाते.

जगन्नाथ रथयात्रा ही भगवान जगन्नाथांच्या पृथ्वीवरील प्रवासाचे प्रतीक आहे. ही यात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते.

पुरी शहरात जगन्नाथ मंदिरापासून गुंडिचा मंदिरापर्यंत ही यात्रा काढली जाते.
भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तीन देवता रथांमध्ये विराजमान होतात.
जगन्नाथांच्या रथाला “गरुडध्वज” किंवा “कपिलध्वज” म्हणतात, बलभद्र यांच्या रथाला “ताळध्वज” आणि सुभद्रा यांच्या रथाला “दर्पदलन” म्हणतात

रथयात्रेमध्ये रथांना भाविक ओढतात, ज्यामुळे त्यांना पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. हे रथ लाकडी आणि मोठे असतात, ज्यांना १६ चाके असतात आणि ४५फूट उंच असतात, असे सांगितले जाते

ही यात्रा ओडिशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात.

नऊ दिवसांच्या यात्रेचा समारोप गुंडिचा मंदिराहून जगन्नाथ मंदिरात परत येऊन होतो.

आज जगन्नाथ रथ यात्रा प्रारंभ.

सिख साम्राज्याचे संस्थापक रणजितसिंग – रणजितसिंग यांचा बालवयात देवीच्या रोगामुळे त्याचा डावा डोळा अधू झाला, चेहऱ्यावर देवीचे व्रणही राहिले. १७९२ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर तो सुकरचक्किया संघटनेचा प्रमुख झाले . शीख संघटनेच्या प्रमुख सदा कौर यांच्या मेहताब कौर या मुलीशी त्याचा विवाह झाला.

शीख संघटना समर्थ करणे व आपली लष्करी ताकद वाढविणे, या हेतूंनी त्याने नकाई या संघटना प्रमुखाच्या राजकौर नावाच्या बहिणीशी १७९८ मध्ये दुसरा विवाह केला .

त्याचवर्षी अफगाणिस्तानचा राजा व अहमदशहा अब्दालीचा नातू शाह झमान याने हिंदुस्थानवर स्वारी केली. काबूलमध्ये उद्भवलेले बंड शमविण्यासाठी शाह झमान लाहोर जिंकून परत निघाला. वाटेत झेलमला आलेल्या पुरात त्याच्या अडकलेल्या तोफा रणजितसिंगाने त्यांनी काढून दिल्या. तेव्हा शाह झमानने त्याला राजा हा किताब व लाहोर शहर दिले. पुढे त्याने महाराजा ही पदवी धारण केली (१२ एप्रिल १८०१). यानंतर जम्मू, भसीन, कांग्रा, चूनियत, कसूर येथील राजे, जहागीरदार यांचा पराभव करून रणजितसिंग थेट रावळपिंडीपर्यंत पोहोचले. अमृतसर ताब्यात घेऊन शीख मिसलदारांच्या प्रभाव करीत त्यांच्या तुकड्या व छोटी छोटी अफगाण राज्ये जिंकून सतलजच्या पश्चिम-उत्तरेकडील संपूर्ण पंजाब आपल्या आधिपत्याखाली आणला.

पंजाबचे एकीकरण व अफगाण स्वाऱ्यांना पायबंद या दोन महत्त्वाच्या कामगिऱ्यांचे श्रेय त्यांना जाते.

• १८३९: सिख साम्राज्याचे संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर, १७८०)

“ ॥ धनाजी जाधव रणात दिसता |
| शत्रु पळे प्रतिबिंब बघता |
| घोडं नाही पाणीच पिणार ॥

धनाजी जाधवांना खानदानी मराठे सरदारात प्रमुख समजत. धनाजीराव जाधवांच्या कर्तबगारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतच सुरू झाली असली तरी ,त्यांचा खरा पराक्रम छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांच्या काळातच दिसून आला .धनाजीराव जाधव सौम्य प्रकृतीचे असल्यामुळे गोड बोलून कार्य साध्य करून घेत .त्यामुळे हाताखालचे लोक त्यांच्यावर अत्यंत प्रेम करत त्यामुळेच छत्रपती राजाराम महाराजांबरोबर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते .
संपूर्ण स्वातंत्र्ययुद्धाच्या २६ वर्षांच्या कालखंडात सतत लढाया करणारा हा मराठ्यांच्या बाजूचा एकमेव सेनानी होता. धनाजीराव जाधव यांनी शेकडो लढाया केल्या, विजय मिळवले यांची नुसती यादी करायची म्हटली तर पुस्तकाची अनेक पुष्ठे खर्ची पडतील.

छत्रपती रााजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांच्या काळात धनाजीराव जाधव एक सारखे धावपळीच्या लढाया करताना दिसून येतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती सावरण्यासाठी व औरंजेबाच्या प्रचंड सेनेला सामोरे जाण्याचे धैर्य दाखविणाऱ्या काही सेनानींपैकी संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी एक तेजस्वी इतिहास निर्माण केला. संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजी जाधव यांना सेनापतीपद मिळाले. छ. राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर धनाजी जाधव यांनी अतिशय निष्ठेने स्वराज्याची सेवा केली.

१७०८ मध्ये शाहूमहाराज मोगल कैदेतून सुटून आल्यानंतर खेड येथे ते व ताराराणी यांचे सैन्य समोरासमोर आले. त्यावेळी धनाजी जाधव यांनी ताराराणीचा पक्ष सोडला व ते शाहू महाराजांना मिळाले. धनाजीराव जाधव यांनी २००० कोसांच्या हालचाली केल्या होत्या .त्यांच्या पाठीमागून धावून धावून झुल्फिकारखाना सारखा मातब्बर सेनानी सुद्धा मेटाकुटीला आला होता. शत्रूवर अचानक छापा टाकावा, सापडेल त्याला कापून काढावे ,लगेच माघार घ्यावी ,रसदी माराव्या, ठाणेदारांना पकडावे अशा गनिमी पद्धतीने धनाजीराव जाधव लढत राहिले. त्यामुळे मोगलांच्या छावणीत त्यांच्या नावाचा मोठा दरारा निर्माण झाला होता. खुद्द औरंगजेबही धनाजीराव जाधव यांना घाबरून होता .मोगलांची घोडी पाण्यावर घातली असता एखाद्या वेळी पाणी पीत नसत, तेव्हा त्यास पाण्यात संताजी-धनाजी दिसतात की काय असा प्रश्न मोगल सेनानी विचारत असत .हे खुद्द मोगल इतिहासकारांनी त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या पुस्तकात सांगितल्या आहेत .

छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यात अनेक सेनापतींचा हातभार लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपतीं संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज ,व छत्रपती राजाराम महाराजांबरोबर एकनिष्ठ राहून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्यांपैकी एक म्हणजे धनाजी जाधव व संताजी घोरपडे या जोडगोळीने औरंगजेबाच्या सैन्याला कसे पळता भुई करून सोडले होते, त्याच्या अनेक गोष्टी इतिहासात वाचायला मिळतात.

१७०८ या काळात धनाजीराव जाधव सरसेनापती होते .छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा धनाजी जाधवराव यांनी सांभाळली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता .छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात धनाजीराव जाधव यांनी फलटणच्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई करून रनमस्त खान यांचा पाडाव केला .या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजीराव जाधव यांचा सन्मान केला त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन जयसिंगराव हा किताब दिला .छत्रपती राजाराम महाराज चंदी प्रांतात जाताना जिंजीला धनाजीराव जाधव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना सरनोबत हे पद दिले गेले. मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातारला पोहोचले तेव्हा महाराणी ताराराणीने छत्रपती शााहूंचा गादीवरचा हक्क अमान्य केला.

१२ जानेवारी १७०८ मध्ये छत्रपती शााहू राजांनी स्वतः साताऱ्यास राज्यभिषेक करविला .त्यावेळी छत्रपती शाहू हेच स्वराज्याचे खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी छत्रपती शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता. धनाजी जाधव यांना छत्रपती शाहू महाराजांनी सेनापतिपद दिले. पण धनाजीराव जाधव यांना हे सेनापतिपद फार दिवस उपभोगता आले नाही. छत्रपती शााहू महाराज विशाळगड व पन्हाळगड मोहिमेवर असता २६ जून १७०८ मध्ये वारणा नदीच्या काठी वडगाव येथे पायाला जखम होऊन धनाजी जाधवराव मृत्यू पावले.
अशा या पराक्रमी, “शूर योद्याला स्मृतीदिनीनिमित्त आमचा मानाचा मुजरा “

१७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

  • घटना :
    १९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
    १९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.
    १९७७: जिबुटी देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
    १९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

• मृत्यू :
• १९९८: सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे. एच. तल्यारखान यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
• २०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.
• २००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल ,१९१४)

  • जन्म :
    १८३८: बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल,१८९४)
    १८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर, १९२९)
    १८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च, १८९९)
    १९१७: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर, १९८४)
    १९३९: संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी, १९९४)
    १९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी ,२०१४)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »