डॉ. जगदीशचंद्र बोस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, नोव्हेंबर ३०, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ९, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५५ सूर्यास्त : १७:५९
चंद्रोदय : ०६:५३, डिसेंबर ०१ चंद्रास्त : १७:१०
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्दशी – १०:२९ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – १२:३५ पर्यंत
योग : अतिगण्ड – १६:४५ पर्यंत
करण : शकुनि – १०:२९ पर्यंत
द्वितीय करण : चतुष्पाद – २३:१४ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल०९:४१ ते ११:०४
गुलिक काल : ०६:५५ ते ०८:१८
यमगण्ड : १३:५० ते १५:१३
अभिजितमुहूर्त : १२:०५ ते १२:४९
दुर्मुहूर्त : ०६:५५ ते ०७:३९
दुर्मुहूर्त : ०७:३९ ते ०८:२४
अमृत काल : ०३:१२, डिसेंबर ०१ ते ०४:५६, डिसेंबर ०१
वर्ज्य : १६:५३ ते १८:३६

२०१२: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१९)

भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्वज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस – भारतीय महान शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे नाव अग्रस्थानी येते. वनस्पतींच्या संवेदना जाणलेले डॉ. बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे. पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. जगदीशचंद्रांची आई साध्वी आणि सुशील होती.

लहानपणापासूनच जगदीशचंद्र यांना सभोवतालच्या निसर्गाविषयी कुतूहल होते. आजुबाजूचा निसर्ग पाहणे, त्याचे निरीक्षण करताना निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का? असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असत. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे शिक्षण पार पडले.

डॉ.जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयात दाखल झाले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले.

१८८५ ते १९१५ अशी तब्बल ३० वर्ष त्यांनी इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन केले. एकीकडे अध्यापनाचे कार्य सुरू असताना जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. यावेळी त्यांनी विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेत बॅटरी तयार केली. त्यांनी लावलेल्या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते. इ.स. १८९६ मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग मार्कोनीने केले, पण त्या पूर्वीच १८९५ मध्ये जगदीशचंद्रांनी ते हे प्रयोग केले होते. अमेरिकेनेसुद्धा आता त्यांच्या या प्रयोगांना मान्यता दिली आहे.

विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अॅपरेट्स, रेझोनंट रेकॉर्ड्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण, निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणार्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या.

त्यांनी केलेल्या संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. २०१६ मध्ये भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून डॉ. बोस यांनी लावलेल्या शोधाची प्रक्रिया उलगडून दाखवली. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.

जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७ मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रसुद्धा सुरू केलं. अशा या वनस्पतींनाही संवेदना असतात, तेव्हा त्यांचे सुद्धा तेवढ्याच पोटतिडकीने पालनपोषण करा हा महान संदेश जगाला देणारे डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी जगाचा निरोप घेतला.

१८५८: भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर, १९३७)

अगर आप विदेशियों पर निर्भर है, प्रावलम्बी है, तो आप दुनिया में कोई ताकत हासिल नहीं कर सकते.– राजीव दीक्षित

राजीव दीक्षित हे एक भारतीय समाज सुधारक होते. त्यांनी “स्वदेशी चळवळ” बळकट केली, आपल्या अनेक व्याखानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनाबद्दल जनमानसांत प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते “भारतीय स्वाभिमान आंदोलन”चे संस्थापक म्हणून ओळखले जातात.
बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एम.टेक.ची पदवी आय.आय.टी कानपूरमधून प्राप्त केली, आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली. ते अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशासाठी व्यतीत केले.

स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेक्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ते नंतर लोकांना उपलब्ध होतील अशी परिपूर्ण काळजी घेतली होती. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वापरले तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले.
भारतीयांनी गैर मार्गाने मिळवून स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या सर्व काळ्या पैशाची माहिती उघड व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. भारताचा काळा पैसा विदेशी बँकामध्ये अनधिकृतरीत्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले.

अचानक मृत्यू – भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौर्यावर असताना, ३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्रथम समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे.

१९६७: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर , २०१०)

  • घटना :
    १८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
    १९१७ : आज ३० नोव्हेंबर ! आजच्याच दिवशी १९१७ साली प्रथमच ब्रिटिशांनी एक रुपयाची नोट भारतात चलनात आणली ज्यावर ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचम ह्याचा फोटो होता. ह्या नोटेमागचा इतिहास फार रंजक आहे. भारतात त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य होते. त्या काळात भारतात ब्रिटिशांनी १ रुपयाचे चांदीचे नाणे वापरात आणले होते. पण नेमके १९१६-१७ च्या काळात पहिले महायुद्ध सुरु झाले आणि ब्रिटिशांना ही नाणी पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यात अडचणी येऊ लागल्या. कारण ब्रिटिशांचा जास्तीत जास्त पैसे महायुद्धावर खर्च होऊ लागला. त्यामुळे त्यांनी ३० नोव्हेंबर १९१७ रोजी पहिली १ रुपयाची नोट छापून चलनात आणली. आणि त्याच वेळी १ रुपयाची चांदीची नाणी बंद केली.
    दादरचे प्रसिद्ध नाणी-संग्राहक गिरीश वीरा ह्यांच्या सांगण्यानुसार, पहिल्या महायुद्धादरम्यान चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी नोट निर्मितीचा निर्णय घेतला. त्या नोटेवर जुन्या चांदीच्या नाण्याचे चित्र छापले होते. तेव्हापासून १ रुपयाच्या नोटेवर नाण्याचे चित्र छापण्याची जणू परंपराच बनली. ह्या नोटेच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत दोनदा ह्याची छपाई थांबविली आहे. तसेच कमीत कमी ३ वेळा ह्या नोटेच्या स्वरूपात बदल केले गेले आहेत. अशी हि १ रुपयाची नोट नाणी-संग्राहकांना अजूनही आकर्षित करून घेत आहे.

१९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
१९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या “ सांगत्ये ऐका “ या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.
१९६६: बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९९५: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.
१९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
२०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

• मृत्यू :

• २०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल, १९६१)

  • जन्म :
    १९१०: गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म. (मृत्यू: ८ जुलै , १९८४)
    १९३५: मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म. (मृत्यू : २७ नोव्हेंबर, २०१६ )
    १९४५: पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »