लहुजी वस्ताद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, फेब्रुवारी १७, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २६ , शके १९४६
सूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:३९
चंद्रोदय : २२:३९ चंद्रास्त : ०९:४७
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – ०४:५३, फेब्रुवारी १८ पर्यंत
नक्षत्र : चित्रा – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : शूल – ०८:५५ पर्यंत
करण : कौलव – १५:३३ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०४:५३, फेब्रुवारी १८ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कन्या – १८:०२ पर्यंत
राहुकाल : ०८:३२ ते ०९:५९
गुलिक काल : १४:१९ ते १५:४६
यमगण्ड : ११:२६ ते १२:५३
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१६
दुर्मुहूर्त : १३:१६ ते १४:०२
दुर्मुहूर्त : १५:३४ ते १६:२१
अमृत काल : ००:२२, फेब्रुवारी १८ ते ०२:१०, फेब्रुवारी १८
वर्ज्य : १३:३२ ते १५:२१

लहुजी वस्ताद – भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली.

आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

१७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.

• १८८१: क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचे निधन. ( जन्म: १४ नोव्हेंबर १७९४ )

• १८८३: राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)

जननायक कर्पुरी ठाकूर यांची
ओळख स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, राजकीय नेता अशी राहिली. पण, त्यांना जनता जननायक या नावानं ओळखत होती. बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या कर्पुरी ठाकूर यांनी राजकीय जीवनात तत्व सोडली नाहीत. त्यामुळंचं ते खऱ्या अर्थानं जननायक ठरले.

कर्पुरी ठाकूर यांचा जन्म बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यीतल पिंतौझिया म्हणजेच आताच्या कर्पुरीग्राममध्ये २४ जानेवारी ,१९२४ रोजी झाला. कर्पुरी ठाकूर यांनी भारत छोडो आंदोलनात उडी घेतली. त्यामध्ये त्यांना २६ महिने तुरुंगात राहवं लागलं. २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ मध्ये त्यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कर्पुरी ठाकूर यांच्या सारखा समाजवादी विचारसरणीवर जीवन जगणारा व्यक्ती आता पाहायला मिळणार नाही. कर्पुरी ठाकूर यांच्या जीवनातील काही प्रसंग डोळ्यासमोर आले तरी अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. कारण त्यांच्या सारखा सामान्य जनतेचा विचार करणारा नेता राजकारणात पाहायला मिळत नाही.

द किंगमेकर:लालू प्रसाद की अनकही दास्तां’ पुस्तकाचे लेख जयंत जिज्ञासू यांनी त्यांच्या एका लेखात कर्पुरी ठाकूर यांच्या साधेपणाचा एक किस्सा सांगितला आहे. कर्पुरी ठाकूर १९५२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यावेळी त्यांची ऑस्ट्रियाला जाणाऱ्या शिष्टमंडळात निवड झाली होती. कर्पुरी ठाकूर यांच्याकडे घालण्यासाठी ड्रेस नव्हता. त्यांनी त्यांच्या एका मित्राला कोट मागितला. मित्रानं दिलेला कोट थोडासा फाटलेला होता. तो कोट घालून कर्पुरी ठाकूर दौऱ्यावर गेले. युगोस्लावियाचे प्रमुख मार्शल टीटी यांनी कर्पुरी ठाकूर यांचा कोट पाहून त्यांना नवीन कोट दिला.
कर्पुरी ठाकूर बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले. मात्र, स्वत:साठी चांगलं घर बांधू शकले नाहीत. पंतप्रधान चौधरी चरण सिंह त्यांच्या घरी गेले होते. ठाकूर यांच्या दरवाजा छोटा असल्यानं चौधरी चरण सिंह यांच्या डोक्याला दुखापत होते. चौधरी चरण सिंह म्हणाले कर्पुरी,जी इसको ऊंचा करवाओ. तेव्हा कर्पुरी ठाकूर यांनी उत्तर दिलं की ” “जब तक बिहार के गरीबों का घर नहीं बन जाता, मेरा घर बन जाने से क्या होगा?” म्हणजेच जोपर्यंत बिहारच्या गरिबांची घर बांधली जात नाहीत तोपर्यंत माझं घर बांधून काय उपयोग?, असं कर्पुरी ठाकूर म्हणाले.
कर्पुरी ठाकूर यांचं निधन १७ फेब्रुवारी १९८८ रोजी आकस्मिक निधन झालं. त्यानंतर हेमवंती नंदन बहुगुणा कर्पुरी ठाकूर यांच्या झोपडीसारख्या घराकडे पाहून रडू लागले होते. १९५२ पासून आमदार राहिलेला व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक असणारा व्यक्ती, दोन वेळा मुख्यमंत्री स्वत:साठी घर बांधत नाही हे पाहून बहुगुणा भावूक झाले.

माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना २०२४ मध्ये देशातील भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

• १९८८: बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४)

  • घटना :
    १८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
    १९२७: रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
    १९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.
    १९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
    २००८: कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.

• मृत्यू :
१६००: सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्या जिओर्डानो ब्रुनो यांना बायबल विरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.
• १९७८: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९१०)
• १९८६: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९५)
• १९९३ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित स्वातंत्र्य सेनानी राणी गाइदिन्ल्यू यांचे निधन ( जन्म : २६ जानेवारी, १९१५ )

  • जन्म :
    १८९९ : बंगाली भाषेतील बंगाली कवी, लेखक, कादंबरीकार आणि निबंधकार जीवनानंद दास यांचा जन्म. ( मृत्यू : २२ ऑक्टोबर, १९५४ )
    १९५४ : के. चंद्रशेखर राव ( कल्वकुंतल चंद्रशेखर राव ) हे भारताच्या तेलंगणा राज्याचे पहिले व माजी मुख्यमंत्री आहेत. ते भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ह्यासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केले होते.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »