प्रकाश पाटील यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

पुणे : उल्का इंडस्ट्रीजचे व्हाइस चेअरमन प्रकाश पाटील यांना दी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसटीएआय) वतीने दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तिरुवनंतरपूरम् येथे येत्या ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
साखर उद्योग उभारणी तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री. पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ‘एसटीएआय’ ही साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी संस्था आहे. तिरुवनंतरपूरम् येथील कार्यक्रम एसटीएआय, इस्मा आणि नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने संयुक्तपणे आयोजित केला आहे. ‘शुगरटुडे’ परिवाराच्या श्री. पाटील यांना खूप खूप शुभेच्छाः