ऊस शेतीसाठी AI करिता साखर संघाची राज्यव्यापी मोहीम

पुणे : ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI (एआय) चा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मैदानात उतरला असून, कार्यशाळा घेतल्या जात आहेत.
सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस पुन्हा किमान १६५ दिवसांच्या पुढे नेण्याचा संकल्प संघाने सोडला आहे. एआय तंत्र जलदपणे स्वीकारण्याचा आग्रह साखर संघाने कारखान्यांकडे धरला आहे.
साखर कारखान्यांचे गाळप दिवस १५० दिवसांच्या पुढे नेण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केला आहे. त्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ऊस लागवडीसाठी संघाने राज्यस्तरीय मोहीम चालू केली आहे.
गाळप हंगाम किमान दीडशे दिवसांपर्यंत चालायला हवा; मात्र यावेळी तो अवघ्या ८३ दिवसांवर आला. गाळप दिवस घटल्याने यंदा सर्व कारखान्यांचे ताळेबंद तोट्यात गेले आहेत. दुसऱ्या बाजूला एफआरपी देण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या दुष्टचक्रातून सोडविण्याची ताकद केवळ एआयमध्ये आहे.
सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस पुन्हा किमान १६५ दिवसांच्या पुढे नेण्याचा संकल्प संघाने सोडला आहे. एआय तंत्र जलदपणे स्वीकारण्याचा आग्रह साखर संघाने कारखान्यांकडे धरला आहे.
बारामती कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमधील ४२ साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक असे १४० प्रतिनिधी; तर प्रशासनातील २१५ कार्यकारी संचालकांसह अधिकारी सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे ५३३ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या उपक्रमात सामील करून घेण्यात आले. या वेळी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी मार्गदर्शन केले.
साखर संघाच्या म्हणण्यानुसार, राज्यात सध्या १३ लाख ७३ हजार हेक्टरवर ऊस लागवड होते. मात्र, गाळप घटल्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर गेला असून उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. एआय तंत्राचा वापर केल्यामुळे ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ व मोठ्या प्रमाणात खते व पाण्याची बचत होत असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्र नेण्यासाठी साखर कारखान्यांचा पुढाकार प्रभावी ठरू शकतो. त्यामुळेच देण्याचे साखर संघाने मोहीम स्वरूपात प्रयत्न सुरू केले आहे. बारामती येथे दुसऱ्या टप्प्यात १३ ते १४ मे रोजी उर्वरित जिल्ह्यांचे प्रशिक्षण होणार आहे. यात अहिल्यानगर, धाराशिव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या भागांतील कारखाने सहभागी होत आहेत, असे साखर संघाकडून सांगण्यात आले.