शेतकरी बचाव पॅनेलचा दणदणीत विजय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपाध्यक्ष तानाजी पाटील, संचालक आर. आय. पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने दणदणीत विजय मिळवित १५ पैकी १० जागा जिंकल्या. अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या पोतदार पॅनेलने पाच जागांवर विजय संपादित केला.

अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील गट आमनेसामने उभे ठाकले होते. रविवारी सकाळी नऊ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. २,९३६ पैकी २,००५ जणांनी मतदान केले. मतदारांची संख्या वाढल्यामुळे उमेदवारांत धाकधूक निर्माण झाली होती. दुपारी ४ वाजता मतदान प्रक्रिया संपली. साडेचार वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.

मतमोजणीच्या पंधरा मिनिटातच सहकारी संस्था गटातून शेतकरी बचाव पॅनेलच्या सुनील अष्टेकर यांनी विजय संपादित केला. त्यांना ३३ पैकी २० मते मिळाली.

त्यानंतर अ वर्ग गटातील १३ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली. ही मतमोजणी लांबली. त्यामुळे उमेदवारांत चलबिचल दिसून आली. रात्री सव्वाआठ वाजता निवडणूक अधिकारी उपनिबंधक एस. मणी यांनी निकाल घोषित केला. या निकालातही विजय संपादित केला.

शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली. खुल्या गटातून विद्यमान अध्यक्ष अविनाश पोतदार, बाबुराव पिंगट, बसवंत मायानाचे या पोतदार गटाच्या उमेदवारांसह शेतकरी बचाव पॅनेलच्या शिवाजी कुट्रे, आर. घोषणाबाजी झाली. विजयाची घोषणा होताच उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »